शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

जनतेच्या कामांना प्राधान्य द्या

By admin | Updated: May 11, 2015 01:27 IST

शहरातील विविध समस्यांची भरमार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करण्याची वेळ येऊ नये याकरिता कर्मचाऱ्यांनी जनतेच्या विविध समस्या लक्षात घेऊन ..

आरमोरी : शहरातील विविध समस्यांची भरमार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करण्याची वेळ येऊ नये याकरिता कर्मचाऱ्यांनी जनतेच्या विविध समस्या लक्षात घेऊन त्या त्वरित निकाली काढण्याकरिता प्राधान्य द्यावे, असे निर्देश तहसीलदार तथा नगर पंचायतीचे प्रशासक दिलीप फुलसुंगे यांनी दिले. नगर पंचायतीच्या निर्मितीनंतर पार पडलेल्या पहिल्या बैठकीला ग्रामसेवक एन. ए. डाखरे, वरिष्ठ लिपिक तोरणकर उपस्थित होते. बैठकीत शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान शहरातील अंतर्गत रस्ते, साफसफाई, व अन्य समस्यांवर चर्चा करण्यात आली. सभेला कर्मचारी, सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी उपस्थित होते.ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये झाले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातही यापुढे वाढ होणार आहे. परिणामी नगर पंचायतीच्या कामांचा विस्तार वाढणार आहे. नगर पंचायत झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह आहे. शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा येथील जनता बाळगूण आहे. ही अपेक्षा पूर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांनीही काम करावे. पुढील महिन्यापासून पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नालीची चांगल्या पध्दतीने साफसफाई होईल, याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष घालावे. रस्त्याच्या बाजुला पडलेला कचरा उचलण्याला विशेष प्राधान्य द्यावे, अन्यथा याच कचऱ्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात रोग पसरण्याची शक्यता आहे. प्रत्येक नागरिकाच्या घरासमोर घंटागाडी उभी ठेवून कचरा गोळा केल्यास शहरात कचरा निर्माण होणार नाही. कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांचे काम शक्यतो लवकर करावे, हे करीत असताना नियमांचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे निर्देश नगर पंचायतीचे प्रशासक दिलीप फुलसुंगे यांनी दिले. (प्रतिनिधी)