शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी विद्यार्थ्यांची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती ठरली कुचकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 19:36 IST

यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा कळस

- मनोज ताजने 

गडचिरोली : केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत पहिली ते दहावीत शिकणाºया ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना राज्य सरकारने २०१९-२० या शैक्षणिक सत्रापासून राज्यात लागू केली. परंतू यावर्षीचे शालेय सत्र संपण्यासाठी आता अवघे काही महिने शिल्लक असताना या योजनेचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांना मिळू शकला नाही. समाजकल्याण विभागाच्या ढिगाळ कारभाराचा फटका या योजनेच्या अंमलबजावणीला बसला आहे.

राज्य शासनाने २७ मे २०१९ रोजी शासन आदेश काढून केंद्र सरकारची ही योजना राज्यात लागू केली. या योजनेत ५० टक्के वाटा केंद्राचा तर ५० टक्के राज्य सरकारचा आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांची उत्पन्न मर्यादा वार्षिक २.५० लाख आहे त्या पहिली ते दहावीपर्यंत शिकणाºया इतर मागासवर्गीय प्रवर्गातील (ओबीसी) विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चास मदत व्हावी म्हणून या योजनेतून दरमहा १०० रुपये (१० महिन्यांसाठी) आणि तदर्थ अनुदान म्हणून वार्षिक ५०० रुपये असे वर्षाकाठी प्रत्येकी १५०० रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय निवासी शाळेत राहणाºया विद्यार्थ्यांना महिन्याकाठी ५०० आणि तदर्थ अनुदान ५०० असे मिळून वर्षाकाठी ५५०० रुपये मिळणार आहेत.

संबंधित शाळांनी या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे पाठवायचे होते.  त्यांच्यामार्फत हे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने समाजकल्याण आयुक्तालयाकडे पाठवायचे होते. मात्र शालेय सत्र सुरू होऊन सहा महिने झाले तरी ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे ज्या उद्देशाने ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना द्यायची होती तो उद्देश साध्य करणे यावर्षी तरी शक्य होताना दिसत नाही.

किती अनुदानाची गरज याचा हिशेबच तयार नाही

विशेष म्हणजे योजनेचे पहिलेच वर्ष असल्यामुळे या योजनेत बसणारे किती लाभार्थी आहेत आणि त्यांच्या शिष्यवृत्तीपोटी किती रकमेचा बोजा राज्य शासनावर पडणार याचाही अंदाज अद्याप घेण्यात आलेला नसल्याची माहिती समाजकल्याण आयुक्तालयाकडून मिळाली. सर्व प्रस्ताव मिळाल्यानंतर त्याचा हिशेब करून तेवढ्या अनुदानाची मागणी राज्य शासनाकडे आणि नंतर केंद्र शासनाकडे केली जाईल. ते अनुदान लगेच मिळेल की नाही, याचीही शाश्वती नाही. त्यामुळे हे शालेय सत्र संपेपर्यंत तरी ही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार का? याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आता म्हणतात, ऑफलाईन प्रस्ताव द्या

या योजनेचे प्रस्ताव ऑनलाईन पाठवायचे होते, पण अद्याप ते शक्य झाले नाही. आता बराच उशिर झाला असल्यामुळे यावर्षी ऑफलाईन पद्धतीने तातडीने प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश समाजकल्याण संचालनालयाने नुकतेच दिले आहेत. शासनाकडून रक्कम मंजूर होऊन येताच ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे आता तरी हे काम समाजकल्याण विभाग तातडीने मार्गी लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीOBCअन्य मागासवर्गीय जातीGadchiroliगडचिरोली