शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

१९१ गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:17 IST

भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये १९१ गावांमधील विहिरींची पाणी पातळी एक ते दोन मीटर पर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषीत केली असून त्यामध्ये सर्वाधिक गडचिरोली तालुक्यातील ४४ गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देभूजल सर्वेक्षण विभागाचा निष्कर्ष : उन्हाळ्यात भूजल पातळी एक ते दोन मीटरने घटली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीमध्ये १९१ गावांमधील विहिरींची पाणी पातळी एक ते दोन मीटर पर्यंत खाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाने या गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषीत केली असून त्यामध्ये सर्वाधिक गडचिरोली तालुक्यातील ४४ गावांचा समावेश आहे.गडचिरोली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पर्जन्यमान अधिक आहे. त्याचबरोबर भूगर्भातील पाण्याचा उपसाही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे पाणी टंचाईची झळ गडचिरोली जिल्ह्याला कमी प्रमाणात बसत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव आहे. प्रामुख्याने एप्रिल महिन्यापासून थोडीफार पाणी टंचाई निर्माण होण्यास सुरूवात होऊन ती मे व जून या कालावधीपर्यंत कायम राहते. मात्र इतर जिल्ह्यांप्रमाणे टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल, अशी भयानक स्थिती राहत नाही.गडचिरोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १०११.३३ मिमी एवढे आहे. मात्र २०१७ च्या पावसाळ्यात सरासरी पेक्षा ३४३.४५ मिमी कमी पर्जन्यमान झाले. याचा परिणाम यावर्षीच्या उन्हाळ्यात दिसून आला. विशेष म्हणजे, आॅक्टोबर महिन्यानंतर पावसाने कायमची विश्रांती घेतली. त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होऊन यावर्षी पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाईची झळ काही गावांना बसण्यास सुरूवात झाली.पाणी टंचाईग्रस्त गावे घोषीत करण्याबाबत तीन टप्पे पाडले जातात. यामध्ये पहिला टप्पा आॅक्टोबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीचा आहे. या कालावधीत भूजल पातळी सरासरीपेक्षा चार मीटरने कमी झाल्यास सदर गावे टंचाईग्रस्त मानली जातात. मात्र या निकषात गडचिरोली जिल्ह्यातील एकही गाव मोडले नाही. जानेवारी ते मार्च २०१८ या दुसऱ्या टप्प्यातही गडचिरोली जिल्ह्यातील एकही गाव टंचाईग्रस्त नाही. तिसरा टप्पा एप्रिल ते जून या कालावधीतील आहे. या टप्प्यात भूजल पातळी एक ते दोन मीटरने घटल्यास सदर गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषीत केली जातात. यानुसार १९१ गावांमधील भूजलाची पातळी एक ते दोन मीटरने घटली असल्याने या गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई प्रशासनाने जाहीर केली आहे. या गावांवर प्रशासनाचे विशेष लक्ष राहणार आहे.रूपांतरीत खडकामुळे भूजलसाठा वाढीस अडचणगडचिरोली जिल्ह्याचा भूभाग प्रामुख्याने रूपांतरीत खडकाने बनला आहे. सदर खडकाची खोली २० ते ३० मीटर एवढे आहे. सदर खडकात अत्यंत कमी प्रमाणात छिद्र राहतात. त्यामुळे पाण्याचे वहन होत नाही. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्याच्या भूगर्भात मातीचे प्रमाण अधिक आढळते. मातीसुध्दा पाणी साठवून ठेवत असली तरी वहन करत नाही. माती व खडकाच्या गुणधर्मामुळे गडचिरोली जिल्ह्यातील विहिरी पावसाळ्यात तुडूंब भरतात. मात्र पावसाळा संपताच कोरड्या पडण्यास सुरूवात होते. सुदैवाने पर्जन्यमान अधिक आहे व भूगर्भातील पाण्याचा उपसा कमी आहे. त्यामुळे पाणी टंचाई पाहिजे त्या प्रमाणात निर्माण होत नाही.तीव्र पाणी टंचाई नाहीज्या गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे घोषीत करण्यात आले आहेत. त्या गावांमधील पाणी पातळी दोन मीटरपेक्षा कमी झाली नाही. त्यामुळे सदर गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार नाही, असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई