शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जिल्ह्यात नगर पंचायतींमध्ये पदभरती होणार

By admin | Updated: July 7, 2016 01:28 IST

गडचिरोली जिल्ह्यात १ मे २०१५ ला १० नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यानंतर या ठिकाणी निवडणुका होऊन नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यान्वित झाले.

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याचा परिणाम : आता १० नगर पंचायतीत नवे कर्मचारी गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात १ मे २०१५ ला १० नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यानंतर या ठिकाणी निवडणुका होऊन नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यान्वित झाले. मात्र नवीन निर्माण झालेल्या नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाजाला गती देता आलेली नव्हती. यादृष्टीने गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न वारंवार लावून धरला होता. राज्य सरकारने राज्यातील १०१ नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये पदभरतीसाठी मान्यता प्रदान केली आहे. १४ जून २०१६ ला राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन नगर पंचायतींमध्ये नवीन पदभरतीला मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. ५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ८ नगर पंचायतीत १८ पदे, ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या ३० नगर पंचायतीत २० पदे, १० ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या ५६ नगर पंचायतीत २९ पदे व २५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७ नगर परिषदांमध्ये ३९ पदे भरण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या नव्या नगर पंचायती निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी कायम मुख्याधिकारी नाहीत. याशिवाय कर्मचारीही नसल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. अहेरी येथील नगरसेवकांनी नगर पालिकेत पदभरती करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत ना. अम्ब्रीशराव आत्राम यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे या प्रश्नावर पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी पदभरतीचा हा निर्णय लागू केला आहे. याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील १० नगर पंचायतीनांही होणार आहे. चामोर्शी, अहेरी, कुरखेडा या तीन मोठ्या लोकसंख्येच्या नगर पंचायत असून कोरची, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा या मध्यम पाच ते सात हजार लोकसंख्येच्या नगर पंचायती आहेत. त्यामध्ये आता विविध पदांची भरती होईल. या सर्व पदांच्या निर्मितीनंतर यांच्या वेतनश्रेण्याही राज्य सरकारने निश्चित केल्या असून सदर पदभरतीसाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)या पदांची होणार भरती१० नगर पंचायतीमध्ये लिपीक टंकलेखक ५ पदे, स्वच्छता निरिक्षक, गाळणी चालक/प्रयोगशाळा सहायक, पंप आॅपरेटर, विजतंत्री, जोडारी, तारतंत्री, वायरमन, शिपाई, मुकादम, व्हॉल्वमन प्रत्येक १ याप्रमाणे एकूण १३ पदे तसेच राज्यस्तरीय संवर्गातील सहायक कार्यालय अधीक्षक, कर निरीक्षक, लेखापाल, लेखा परीक्षक, स्थापत्य अभियंता (अ वर्ग), पाणी पुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (वर्ग १) व नगररचनाकार सार्वजनिक बांधकाम (वर्ग १) आदी ७ पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामधून एका नगर पंचायतीत २० पदे भरले जाणार आहेत. राज्य सरकारने सध्या नायब तहसीलदारांना प्रशासक म्हणून नगर पंचायतीमध्ये बसविले आहे. त्यानंतर आता राज्य सरकार या नगर पालिकांसाठी नवे मुख्याधिकारीही देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.