शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नगर पंचायतींमध्ये पदभरती होणार

By admin | Updated: July 7, 2016 01:28 IST

गडचिरोली जिल्ह्यात १ मे २०१५ ला १० नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यानंतर या ठिकाणी निवडणुका होऊन नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यान्वित झाले.

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याचा परिणाम : आता १० नगर पंचायतीत नवे कर्मचारी गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात १ मे २०१५ ला १० नगर पंचायती अस्तित्वात आल्या. त्यानंतर या ठिकाणी निवडणुका होऊन नगराध्यक्ष व नगरसेवक कार्यान्वित झाले. मात्र नवीन निर्माण झालेल्या नगर पंचायतीमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामकाजाला गती देता आलेली नव्हती. यादृष्टीने गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रश्न वारंवार लावून धरला होता. राज्य सरकारने राज्यातील १०१ नगर परिषद व नगर पंचायतीमध्ये पदभरतीसाठी मान्यता प्रदान केली आहे. १४ जून २०१६ ला राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन नगर पंचायतींमध्ये नवीन पदभरतीला मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. ५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ८ नगर पंचायतीत १८ पदे, ५ ते १० हजार लोकसंख्या असलेल्या ३० नगर पंचायतीत २० पदे, १० ते २५ हजार लोकसंख्या असलेल्या ५६ नगर पंचायतीत २९ पदे व २५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ७ नगर परिषदांमध्ये ३९ पदे भरण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरची, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, चामोर्शी, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या नव्या नगर पंचायती निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी कायम मुख्याधिकारी नाहीत. याशिवाय कर्मचारीही नसल्याने कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. अहेरी येथील नगरसेवकांनी नगर पालिकेत पदभरती करावी, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे केली होती. त्यानंतर संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेत ना. अम्ब्रीशराव आत्राम यांनी वेळोवेळी मुख्यमंत्र्यांकडे या प्रश्नावर पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण राज्यासाठी पदभरतीचा हा निर्णय लागू केला आहे. याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील १० नगर पंचायतीनांही होणार आहे. चामोर्शी, अहेरी, कुरखेडा या तीन मोठ्या लोकसंख्येच्या नगर पंचायत असून कोरची, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, धानोरा या मध्यम पाच ते सात हजार लोकसंख्येच्या नगर पंचायती आहेत. त्यामध्ये आता विविध पदांची भरती होईल. या सर्व पदांच्या निर्मितीनंतर यांच्या वेतनश्रेण्याही राज्य सरकारने निश्चित केल्या असून सदर पदभरतीसाठी विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठन करण्यात येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)या पदांची होणार भरती१० नगर पंचायतीमध्ये लिपीक टंकलेखक ५ पदे, स्वच्छता निरिक्षक, गाळणी चालक/प्रयोगशाळा सहायक, पंप आॅपरेटर, विजतंत्री, जोडारी, तारतंत्री, वायरमन, शिपाई, मुकादम, व्हॉल्वमन प्रत्येक १ याप्रमाणे एकूण १३ पदे तसेच राज्यस्तरीय संवर्गातील सहायक कार्यालय अधीक्षक, कर निरीक्षक, लेखापाल, लेखा परीक्षक, स्थापत्य अभियंता (अ वर्ग), पाणी पुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता (वर्ग १) व नगररचनाकार सार्वजनिक बांधकाम (वर्ग १) आदी ७ पदांनाही मंजुरी देण्यात आली आहे. ज्यामधून एका नगर पंचायतीत २० पदे भरले जाणार आहेत. राज्य सरकारने सध्या नायब तहसीलदारांना प्रशासक म्हणून नगर पंचायतीमध्ये बसविले आहे. त्यानंतर आता राज्य सरकार या नगर पालिकांसाठी नवे मुख्याधिकारीही देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.