शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

ओबीसींच्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

By admin | Updated: March 5, 2016 01:23 IST

जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यात याव्या, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १ मार्च रोजी मुंबई येथे भेट घेऊन ....

मुंबईत भेट : ओबीसी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची माहितीगडचिरोली : जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या समस्या सोडविण्यात याव्या, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची १ मार्च रोजी मुंबई येथे भेट घेऊन त्यांच्यासोबत ओबीसींच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा घडवून आणली असल्याची माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ओबीसी व भटक्या विमुक्त प्रवर्गातील जनतेचे स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी व ती जाहीर करावी, राज्यपालांची अधिसूचना रद्द करावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करावे, पाचवीपासून ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकात २३ डिसेंबर २०१५ पासून उपोषणाला सुरुवात केली होती. सतत ६० दिवस आंदोलन करण्यात आले. १ मार्च रोजी ओबीसी समाज संघटनेचे अध्यक्ष रमेश मडावी व ओबीसी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. अशोक लांजेवार यांनी आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. भेटीदरम्यान गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या समस्या मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्या. आरक्षणाची समस्या सहा महिन्यात निकाली काढू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर इतरही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ६० दिवस चाललेले आंदोलन मागे घेण्यात आले आहे. सहा महिन्यांत समस्या न सुटल्यास आणखी आंदोलन करण्याचा तसेच उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. पत्रकार परिषदेला प्रवीण घाटे, रमेश भुरसे, रमेश उप्पलवार, केशव सामृतवार यांच्यासह ओबीसी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.दारू व तंबाखूमुक्तीसाठी सर्चला पाच कोटींचा निधीदारू तसेच तंबाखूमुक्तीसाठी सर्च या संस्थेला २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षांसाठी पाच कोटी रूपये आदिवासी विकास विभागाने मंजूर केले आहेत. याबाबतचे पत्र आदिवासी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून आदिवासी उपयोजनेंतर्गत येणाऱ्या नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत जिल्हा वार्षिक उपयोजनेतून निधी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश दिले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही सदर निधी कसा काय मंजूर करण्यात आला, ही बाब आपण मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सदर निधी व्यसनमुक्ती समितीसाठी देण्यात आला आहे, अशी माहिती आपणाला दिली. मात्र आदिवासी विकास विभागाने गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांना दिलेले पत्र व मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य यामध्ये तफावत असल्याचा आरोप प्रा. अशोक लांजेवार यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे.