शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

एसटी बसेस भंगार... छत गळतीमुळे प्रवासी त्रस्त, छत्री उघडून नागरिकांचा प्रवास

By गेापाल लाजुरकर | Updated: June 28, 2023 14:43 IST

अहेरी आगारातील बसेसची स्थिती : चांगल्या बसेस पाठविण्याकडे दुर्लक्ष

गडचिरोली : अहेरी उपविभागातील नागरिकांकरिता प्रवासासाठी एकमेव साधन एसटी महामंडळाची बस आहे. मात्र या बसेसची अवस्था अतिशय बिकट असून बसेसचे छत गळत असल्याने प्रवाशांना बसेसमध्ये छत्री घेऊस बसावे लागत आहे. या स्थितीचा प्रत्यय अहेरी-सिरोंचा मार्गाने जाणाऱ्या एका बसेसमध्ये आला.

अहेरी उपविभागातील सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा, अहेरी येथील प्रवाशांना खड्डेमय रस्त्यानीच प्रवास करावा लागत आहे. पाचही तालुक्यांमधील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे बसेससुद्धा भंगार झाल्या आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अनेक उपक्रम व कार्यक्रम साजरे होत आहेत. मात्र, अहेरी उपविभागातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा मिळाल्या नाहीत. अनेक ठिकाणी पक्के रस्ते, वीज, राहण्याची पक्की सोय म्हणून घर, शिक्षण आणि आरोग्य या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. लांब पल्ल्याच्या मार्गावर चांगल्या बसेस सोडणे गरजेचे आहे. तरीही चांगल्या बसेस पाठविण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

अहेरी बसस्थानकातून सिरोंचा येथे मला जायचे होते. सदर बसमध्ये मी बसले. काही वेळेतच पाऊस सुरू झाला. आमच्या अंगावर पाणी पडत होते. त्यामुळे बसमधे छत्री उघडावी लागली. परंतु ज्यांच्याजवळ छत्री नव्हती ते प्रवासी पावसाच्या पाण्यामुळे भिजले.

- प्रवासी

अहेरी उपविभागातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. छोटी दुरुस्ती आगार पातळीवर करण्यात येत आहे. मोठ्या दुरुस्तीसाठी त्या बसेस विभागीय कार्यशाळेतच दुरुस्ती करणे आवश्यक आहे. खड्ड्यांमुळे बसेसची बॉडी खिळखिळी होत आहे. त्यामुळे अहेरी आगाराला नवीन २५ बसेस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी महामंडळाकडे केली आहे.

- चंद्रभूषण घागरगुंडे, आगार व्यवस्थापक अहेरी

--

टॅग्स :state transportएसटीroad transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाGadchiroliगडचिरोलीaheri-acअहेरी