शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप ट्रान्सफार्मरची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST

देसाईगंज : तालुक्यात दुबार-तिबार पीक लागवडीतून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुरू झालेली धडपड व यासाठी कृषिपंपांचा सुरू झालेला वापरच आता ...

देसाईगंज : तालुक्यात दुबार-तिबार पीक लागवडीतून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुरू झालेली धडपड व यासाठी कृषिपंपांचा सुरू झालेला वापरच आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठू लागल्याची गंभीर माहिती समोर येऊ लागली आहे. दरम्यान, तालुक्यातील एकही ट्रान्सफार्मर सुस्थितीत नसून ट्रान्सफार्मरमधील सर्वच फेजची ऐशीतैसी झालेली आहे. बऱ्याचदा लाईनमनअभावी शेतकऱ्यांनाच डीपी बाॅक्स हाताळावे लागत असल्याने याप्रती संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गाव तिथे लाईनमन असे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने अलीकडे कृषी क्षेत्रात प्रचंड चुरस निर्माण झाली असून, शासकीय स्तरावरून देण्यात आलेल्या सिंचन विहिरी, विंधन विहिरी बेरोजगारीवर मात करण्यासाठी पर्याय ठरू लागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी कृषी पंपांचा वापर करणे सुरू केले आहे. मात्र, एकाच लाईनमनकडे पाच-पाच गावांचा प्रभार असल्याने लावण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

तालुक्यात जराही ओव्हरलोड झाल्यास वारंवार फ्यूज उडणे ही समस्या नेहमीच झाली आहे. यामुळे सिंचन सुविधा प्रभावित होत आहे. ओव्हरलोडने फ्यूज अचानक उडतात. वारंवार हेच होत असल्याने गावागावांत फ्यूज तार टाकणारे तयार झाले आहेत. ते ओव्हरलोड झाल्यानंतरही न उडणारे ठोकळ स्वरुपाचे फ्यूज तार टाकतात. त्यामुळे ट्रान्सफार्मरमधील साहित्य जळून खाक होते. तालुक्यातील बहुतांश भागातील ट्रान्सफार्मर आतून भस्म झालेले आहेत. शेतकऱ्यांना लाईनमन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पर्यायाने गावातीलच ट्रान्सफार्मर हाताळणाऱ्या व्यक्तीला हाताशी धरून फ्यूज टाकून सिंचन सुविधा नियमित करावी लागते.

डीपी बाॅक्समधील फ्यूज लाॅकसिस्टीमचे असले तरी गरजेच्या वेळी डीपी बाॅक्स जबरदस्तीने उघडल्या जात असल्याने लाॅक तुटलेले दरवाजे सताड उघडे राहतात. त्या असुरक्षित डीपी रस्त्यांच्या कडेला वा शेतात सतार उघड्या असतात. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स :

अतिरिक्त लाईनमन देण्याची मागणी

लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. देसाईगंज तालुक्यातील बहुतांश भागातील ट्रान्सफार्मर दुरवस्थेत आहेत. या ट्रान्सफार्मरच्या आतील जळालेले फेज बदलून त्या जागी नवीन लावावे आणि डी.पी. बॉक्स कुलूपबंद करण्यात यावे व गावातील नेमलेल्या लाईनमनकडील गावांचा अतिरिक्त भार काढून त्या-त्या ठिकाणी अतिरिक्त लाईनमन देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.