शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
5
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
6
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
7
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
9
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
10
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
11
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
12
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
13
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
14
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
15
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
16
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
17
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
18
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
19
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
20
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार

कृषिपंप ट्रान्सफार्मरची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST

देसाईगंज : तालुक्यात दुबार-तिबार पीक लागवडीतून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुरू झालेली धडपड व यासाठी कृषिपंपांचा सुरू झालेला वापरच आता ...

देसाईगंज : तालुक्यात दुबार-तिबार पीक लागवडीतून भरघोस उत्पन्न घेण्यासाठी सुरू झालेली धडपड व यासाठी कृषिपंपांचा सुरू झालेला वापरच आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठू लागल्याची गंभीर माहिती समोर येऊ लागली आहे. दरम्यान, तालुक्यातील एकही ट्रान्सफार्मर सुस्थितीत नसून ट्रान्सफार्मरमधील सर्वच फेजची ऐशीतैसी झालेली आहे. बऱ्याचदा लाईनमनअभावी शेतकऱ्यांनाच डीपी बाॅक्स हाताळावे लागत असल्याने याप्रती संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गाव तिथे लाईनमन असे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने अलीकडे कृषी क्षेत्रात प्रचंड चुरस निर्माण झाली असून, शासकीय स्तरावरून देण्यात आलेल्या सिंचन विहिरी, विंधन विहिरी बेरोजगारीवर मात करण्यासाठी पर्याय ठरू लागल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी कृषी पंपांचा वापर करणे सुरू केले आहे. मात्र, एकाच लाईनमनकडे पाच-पाच गावांचा प्रभार असल्याने लावण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

तालुक्यात जराही ओव्हरलोड झाल्यास वारंवार फ्यूज उडणे ही समस्या नेहमीच झाली आहे. यामुळे सिंचन सुविधा प्रभावित होत आहे. ओव्हरलोडने फ्यूज अचानक उडतात. वारंवार हेच होत असल्याने गावागावांत फ्यूज तार टाकणारे तयार झाले आहेत. ते ओव्हरलोड झाल्यानंतरही न उडणारे ठोकळ स्वरुपाचे फ्यूज तार टाकतात. त्यामुळे ट्रान्सफार्मरमधील साहित्य जळून खाक होते. तालुक्यातील बहुतांश भागातील ट्रान्सफार्मर आतून भस्म झालेले आहेत. शेतकऱ्यांना लाईनमन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने पर्यायाने गावातीलच ट्रान्सफार्मर हाताळणाऱ्या व्यक्तीला हाताशी धरून फ्यूज टाकून सिंचन सुविधा नियमित करावी लागते.

डीपी बाॅक्समधील फ्यूज लाॅकसिस्टीमचे असले तरी गरजेच्या वेळी डीपी बाॅक्स जबरदस्तीने उघडल्या जात असल्याने लाॅक तुटलेले दरवाजे सताड उघडे राहतात. त्या असुरक्षित डीपी रस्त्यांच्या कडेला वा शेतात सतार उघड्या असतात. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बाॅक्स :

अतिरिक्त लाईनमन देण्याची मागणी

लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार आहे. देसाईगंज तालुक्यातील बहुतांश भागातील ट्रान्सफार्मर दुरवस्थेत आहेत. या ट्रान्सफार्मरच्या आतील जळालेले फेज बदलून त्या जागी नवीन लावावे आणि डी.पी. बॉक्स कुलूपबंद करण्यात यावे व गावातील नेमलेल्या लाईनमनकडील गावांचा अतिरिक्त भार काढून त्या-त्या ठिकाणी अतिरिक्त लाईनमन देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.