शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांनी नीतिमत्ता विकली

By admin | Updated: September 27, 2014 23:15 IST

महाराष्ट्रात बऱ्याच कालावधीनंतर प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांकडे उमेदवारांचीही टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे या पक्षातून त्या

गोंधळाची स्थिती : सर्वसामान्य मतदारांमध्ये उमटली प्रतिक्रियागडचिरोली : महाराष्ट्रात बऱ्याच कालावधीनंतर प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांकडे उमेदवारांचीही टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे या पक्षातून त्या पक्षात गेलेल्या उमेदवारांना आपल्या पक्षाची उमेदवारी दिली जात आहे. यामध्ये राजकीय पक्षनेत्यांनी आपली नीतिमत्ता खुुंटीला टांगुन ठेवल्याचे दिसून येत आहे. याबाबत मतदारांमध्येही प्रचंड चर्चा असून राजकीय पक्षाच्या अशा भूमिकांमुळे मतदार राजा सारेकाही स्तब्धपणे पाहत आहे. आजवर महाराष्ट्रात जवळजवळ पाच ते सहा निवडणुका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तसेच यापेक्षा अधिक निवडणुका शिवसेना-भाजप युती एकत्रितपणे लढले. परंतु यावेळी विधानसभेच्या निवडणुका हे प्रमुख चार पक्ष तसेच अन्य पक्षही स्वबळावर लढत आहे. बऱ्याच मतदारासंघांमध्ये राजकीय पक्षांकडे उमेदवारही नाही. काँग्रेससारख्या पक्षाकडे संपूर्ण मतदार संघासाठी उमेदवार भेटून जातील, अशी परिस्थिती आहे. मात्र बहुतांश: राजकीय पक्षांना दुसरीकडून उमेदवार आयात करावे लागत आहे. या घटनाक्रमामुळे काँग्रेस पक्षाचे गेल्या अनेक वर्षापासून निष्ठावान असलेले कार्यकर्ते या निवडणुकीत दुसऱ्या पक्षाकडे गेलेले मतदारांना पाहायला मिळत आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेचे सलग १५ वर्ष सदस्य राहिलेले काँग्रेस पक्षाकडून जि. प. सभापती राहिलेले माजी खासदार मारोतराव कोवासे यांचे कट्टर समर्थक केसरी पाटील उसेंडी या निवडणुकीत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार झाले आहेत. केसरीपाटील उसेंडी यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे तिकीट मागितले होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सेनेचा दरवाजा जवळ केला आहे व भगवा दुपट्टा खांद्यावर घेऊन आता ते मतदारांसमोर जाणार आहेत. सेवानिवृत्त सनदी अधिकारी राहिलेले नारायण वटी यांचा संपूर्ण परिवार कुरखेडा तालुक्यात काँग्रेसशी निष्ठा वाहिलेला आहे. वटी यांचे सासरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून या भागात सर्वपरिचित आहे. तसेच वटी यांचे भाऊही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आजवर काम करीत आलेले आहे. हेच वटी यावेळी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी गेले होते. परंतु त्यांना उमेदवारी मिळाली नाही. वटी यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेत आरमोरी विधानसभा क्षेत्रातून मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. यापूर्वी भाजपकडून निवडणूक लढविलेले विलास कोडाप यांनी यावेळी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली होती. जिल्हास्तरावर त्यांनी निरीक्षकांनाही भेटून उमेदवारीचा दावा केला होता. मात्र आता ते बहुजन समाज पक्षाचे उमेदवार झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातच ही परिस्थिती उद्भवली असे नाही. तर राज्यातही असेच सर्वत्र चित्र आहे. ज्यांच्या कुटुंबाच्या पिढ्यानपिढ्या एका पक्षाची सेवा करण्यात गेल्या ते लोक आज वेगवेगळ्या पक्षाकडून उमेदवारी घेऊन लढत असल्याचे चित्र सर्वसामान्य मतदारांना दिसत आहे. यांच्यासाठी पक्षनिष्ठाही गहाण झाल्या आहेत.नीतिमत्ताही भ्रष्ट झाली की काय, अशी दुदैवी स्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पक्ष स्वबळावर लढत असल्याने निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता मतदान राजालाच खरा प्रतिनिधी निवडावा लागणार आहे. या घटना घडामोडीत मतदार राजा स्थितप्रज्ञ आहे व तो सारे चित्र अवलोकन करीत आहे. पक्ष बदलणारे तसेच एकाच पक्षातून वेगवेगळ्या मतदार संघात उभे असलेले एकाच कुटुंबातील उमेदवार हा ही एक चर्चेचा विषय आहे, अशी परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे मतदार राजा आपला खरा निकाल या निवडणुकीत देईल, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)