शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मनस्ताप

By admin | Updated: October 18, 2014 01:27 IST

कुरखेडा, कोरची, धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातून पायपीट करीत बेसकॅम्पवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी...

देसाईगंज/मोहटोला : कुरखेडा, कोरची, धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातून पायपीट करीत बेसकॅम्पवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी देसाईगंजपर्यंत वाहनाने सोडून देण्यास नकार दिल्याने प्रचंड मनस्ताप सहन करीत तब्बल दोन दिवसानंतर देसाईगंज येथे पोहोचता आले, असा आरोप निवडणूक कर्मचाऱ्यांनी केला आहे. निवडणूक आटोपल्यानंतर नियोजनाप्रमाणे पोलिसांनी सावरगाव मतदान केंद्र गाठले. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राधिकारी यांच्यासह चार कर्मचारी कार्यरत होते. मात्र पोलिसांनी ईव्हीएम मशीन व केवळ मतदान केंद्राधिकारी यांनाच देसाईगंज येथे पोहोचविले. इतर तीन कर्मचारी सावरगाव येथेच दोन दिवसांपासून अडकून पडले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर कर्मचाऱ्यांचा फोन आऊट आॅफ कव्हरेज दाखवत होता. तर जो मतदान केंद्राधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन आला होता, त्याच्याकडे निवडणुकीसंदर्भातील इतर कागदपत्रे व लिफाफे नसल्याने ईव्हीएम मशिनचा ताबा घेण्यास देसाईगंज येथील स्ट्राँग रूमच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे सदर अधिकारी सकाळी ११ वाजेपासून त्याच्या इतर साथीदारांची वाट बघत स्ट्राँगरूमच्या बाहेर दिवसभर ताटकळत बसला होता. सायंकाळी पोलिसांनी सावरगावचे लिफाफे देसाईगंज येथे आणले. मात्र कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. मालेवाडा व सुरसुंडी या बेस कॅम्पअंतर्गत असलेल्या १७ मतदान केंद्रावर ६८ कर्मचाऱ्यांनी निडणुकीची जबादारी पार पाडली. या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरून मतदान पार पाडल्यानंतर पोलीस संरक्षणात पायीच बेस कॅम्पवर आणण्यात आले. त्यानंतर १६ आॅक्टोबरच्या पहाटे मालेवाडा व सुरसुंंडी येथे हेलिकॉप्टर पाठवून या ठिकाणच्या १७ मतदान केंद्राधिकारी व ईव्हीएम मशीन आणण्यात आल्या. मतदान केंद्राधिकाऱ्यांनी निवडणुकीचे दस्ताऐवज सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यालाही विरोध केला. सदर केंद्राधिकारी देसाईगंज येथे पोहोचल्यानंतर याही कर्मचाऱ्यांना इतर दस्ताऐवज दिल्याशिवाय ईव्हीएम मशीन ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनाही ताटकळत राहावे लागले. कोटगुल, ग्यारापती बेस कॅम्पअंतर्गत येत असलेल्या निवडणुक कर्मचाऱ्यांची हिच स्थिती झाली. बेसकॅम्पवर १५ आॅक्टोबरपासून अडकुन पडलेल्या कर्मचाऱ्यांनी देसाईगंज येथे पोहोचवून देण्यासाठी पोलिसांना विनंती केली असता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही आदेश नसल्याने पोहोचवून देणार नाही, असे बजाविले. त्यामुळे बेस कॅम्पवरच्या शेकडो कर्मचाऱ्यांना दोन दिवसानंतर जीव धोक्यात घालून मिळेल त्या साधनाने देसाईगंज येथे पोहोचावे लागले. पोलिसांच्या या हेकेखोरीमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला असल्याने पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवडणूक विभागाने बेस कॅम्प तयार केले असले तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे संपर्क केला असता, कुणीही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाही. देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी भांबावलेल्या स्थितीत होते. ते कुठलीही माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे प्रशासनाकडून या संदर्भात कुणाचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (नगर प्रतिनिधी)