शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पोलिसांमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना मनस्ताप

By admin | Updated: October 18, 2014 01:27 IST

कुरखेडा, कोरची, धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातून पायपीट करीत बेसकॅम्पवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी...

देसाईगंज/मोहटोला : कुरखेडा, कोरची, धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातून पायपीट करीत बेसकॅम्पवर पोहोचलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी देसाईगंजपर्यंत वाहनाने सोडून देण्यास नकार दिल्याने प्रचंड मनस्ताप सहन करीत तब्बल दोन दिवसानंतर देसाईगंज येथे पोहोचता आले, असा आरोप निवडणूक कर्मचाऱ्यांनी केला आहे. निवडणूक आटोपल्यानंतर नियोजनाप्रमाणे पोलिसांनी सावरगाव मतदान केंद्र गाठले. या मतदान केंद्रावर मतदान केंद्राधिकारी यांच्यासह चार कर्मचारी कार्यरत होते. मात्र पोलिसांनी ईव्हीएम मशीन व केवळ मतदान केंद्राधिकारी यांनाच देसाईगंज येथे पोहोचविले. इतर तीन कर्मचारी सावरगाव येथेच दोन दिवसांपासून अडकून पडले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सदर कर्मचाऱ्यांचा फोन आऊट आॅफ कव्हरेज दाखवत होता. तर जो मतदान केंद्राधिकारी ईव्हीएम मशीन घेऊन आला होता, त्याच्याकडे निवडणुकीसंदर्भातील इतर कागदपत्रे व लिफाफे नसल्याने ईव्हीएम मशिनचा ताबा घेण्यास देसाईगंज येथील स्ट्राँग रूमच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे सदर अधिकारी सकाळी ११ वाजेपासून त्याच्या इतर साथीदारांची वाट बघत स्ट्राँगरूमच्या बाहेर दिवसभर ताटकळत बसला होता. सायंकाळी पोलिसांनी सावरगावचे लिफाफे देसाईगंज येथे आणले. मात्र कर्मचाऱ्यांचा पत्ता नव्हता. मालेवाडा व सुरसुंडी या बेस कॅम्पअंतर्गत असलेल्या १७ मतदान केंद्रावर ६८ कर्मचाऱ्यांनी निडणुकीची जबादारी पार पाडली. या सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावरून मतदान पार पाडल्यानंतर पोलीस संरक्षणात पायीच बेस कॅम्पवर आणण्यात आले. त्यानंतर १६ आॅक्टोबरच्या पहाटे मालेवाडा व सुरसुंंडी येथे हेलिकॉप्टर पाठवून या ठिकाणच्या १७ मतदान केंद्राधिकारी व ईव्हीएम मशीन आणण्यात आल्या. मतदान केंद्राधिकाऱ्यांनी निवडणुकीचे दस्ताऐवज सोबत ठेवण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यालाही विरोध केला. सदर केंद्राधिकारी देसाईगंज येथे पोहोचल्यानंतर याही कर्मचाऱ्यांना इतर दस्ताऐवज दिल्याशिवाय ईव्हीएम मशीन ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनाही ताटकळत राहावे लागले. कोटगुल, ग्यारापती बेस कॅम्पअंतर्गत येत असलेल्या निवडणुक कर्मचाऱ्यांची हिच स्थिती झाली. बेसकॅम्पवर १५ आॅक्टोबरपासून अडकुन पडलेल्या कर्मचाऱ्यांनी देसाईगंज येथे पोहोचवून देण्यासाठी पोलिसांना विनंती केली असता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही आदेश नसल्याने पोहोचवून देणार नाही, असे बजाविले. त्यामुळे बेस कॅम्पवरच्या शेकडो कर्मचाऱ्यांना दोन दिवसानंतर जीव धोक्यात घालून मिळेल त्या साधनाने देसाईगंज येथे पोहोचावे लागले. पोलिसांच्या या हेकेखोरीमुळे निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला असल्याने पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त केला आहे. निवडणूक विभागाने बेस कॅम्प तयार केले असले तरी या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नव्हती. कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे संपर्क केला असता, कुणीही प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाही. देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी भांबावलेल्या स्थितीत होते. ते कुठलीही माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे प्रशासनाकडून या संदर्भात कुणाचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही. (नगर प्रतिनिधी)