शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

आलापल्लीत पोलिसांचा लाठीमार

By admin | Updated: August 17, 2015 01:05 IST

सर्वत्र भारतीय स्वातंत्र्याचा ६८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ध्वजारोहण आटोपून शाळेतील मुली घरी परत जात असताना ....

मुलींच्या टवाळकीवरून घडले प्रकरण : काही काळ तणावाची परिस्थितीआलापल्ली : सर्वत्र भारतीय स्वातंत्र्याचा ६८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना ध्वजारोहण आटोपून शाळेतील मुली घरी परत जात असताना काही टवाळखोर मुलांनी येथील मुख्य चौकात टिंगलटवाळकी केल्याच्या बाबीवरून पोलिसांनी चौकातील काही युवकांवर सौम्य स्वरूपाचा लाठीमार केल्याची घटना घडली.प्राप्त माहितीनुसार, शनिवारला ध्वजारोहण आटोपून शाळेतील काही मुली मुख्य चौकातून घरी परत जात होत्या. दरम्यान चौकात जमलेल्या काही टवाळखोर मुलांनी त्यांची टिंगलटवाळकी केली. या प्रकाराची माहिती काही लोकांनी आलापल्ली पोलीस चौकीला दिली. त्यानंतर पोलीस चौकीतील दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या ठिकाणी जमाव होता. या जमावातील काही युवकांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याची माहिती अहेरी पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानंतर अहेरीचे पोलीस निरिक्षक संजय मोरे हे आलापल्लीच्या मुख्य चौकात दाखल झाले. त्यांच्या समक्ष येथील काही युवकांनी गोंधळ घातला व पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे पोलीस निरिक्षक मोरे यांनी दोन युवकांना आपल्या वाहनात बसवून पोलीस ठाण्याला घेऊन गेले. त्यानंतर गावकरी व व्यापारी संतप्त गावकरी व व्यापाऱ्यांनी आलापल्लीची बाजारपेठ बंद केली. दरम्यान मुख्य रस्त्यावर टायर जाळून रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी येथील सर्व मुख्य मार्ग बंद करण्यात आले. जोपर्यंत ठाणेदार मोरे स्वत: आलापल्ली येऊन माफी मागणार तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. ठाणेदार मोरे यांनी या संदर्भात चर्चा करण्यासाठी काही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलविले. मात्र गावकऱ्यांनी याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रणय अशोक व ठाणेदार संजय मोरे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कोणतीही सूचना न देता पोलिसांनी लाठीमार सुरू केला. यावेळी काही जणांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी बळाचा वापर करून नाहक लाठीमार करून काही जणांना अटक केल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)दोषींवर कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देशपोलिसांकडून काही नागरिकांवर लाठीमार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपला नागपूरचा दौरा रद्द करून गडचिरोलीवरून थेट आलापल्ली गाठली. त्यांनी गावकरी, व्यापारी यांच्याशी चर्चा केली व स्वत: पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याशी संपर्क साधून झालेल्या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. या प्रकरणात जे अधिकारी व कर्मचारी दोषी असतील त्यांची चौकशी करून दोन दिवसात कारवाई करावी. तसेच अटक केलेल्यांना पोलिसांनी तत्काळ सोडून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी दिले. नागरिकांनी स्वत:हून कोणताही कायदा हातात न घेता पोलिसांना मदत करावी, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून अटक केलेल्यांना नागरिकांना सोडून दिले.