शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पोलीस रस्ते, दळणवळण, वीज पुरवठा, दूरसंचारच्या अभावामुळे बेजार

By admin | Updated: January 20, 2015 00:04 IST

गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील दुर्गम भाग म्हणून एटापल्ली तालुका ओळखला जातो. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस जवान स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. मात्र त्यांच्या जीवाची किमत काय,

गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील दुर्गम भाग म्हणून एटापल्ली तालुका ओळखला जातो. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस जवान स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. मात्र त्यांच्या जीवाची किमत काय, असा प्रश्न त्यांना उपलब्ध करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवरून कुणालाही पडू शकतो. एटापल्ली तालुक्यातील सर्वच संवेदनशील पोलीस स्टेशनमधील शिपाई विविध समस्यांना तोंड देत आहे. एकीकडे कुटुंबापासून दूर राहत जीव धोक्यात घालून देशाच्या रक्षणाकरिता कर्तव्य बजावित आहे तर दुसरीकडे विविध समस्यांमुळे ते तणावात जगत आहेत.अनेक भागात पोलिसांना राहण्यासाठी वसाहतीचीही सुविधा नाही. आरोग्याचाही प्रश्न कायम सतावत असतोे. नक्षलग्रस्त भागातील जवानांना सोयीसुविधा पुरविण्याचा दावा वेळोवेळी शासन करीत असले तरी दुर्गम भागात राहणारे पोलीस जवान सध्या अनंत अडचणी सहन करीत आहे. एटापल्ली तालुक्यात एटापल्ली, गट्टा, कसनसूर, जारावंडी हे जुने पोलीस ठाणे आहेत. मागील दोन वर्षाच्या काळात हालेवारा, हेडरी, बुर्गी हे नवे पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. एटापल्ली तालुका हा नक्षली कारवायांच्यादृष्टीने अतिसंवेदनशिल भाग आहे. एटापल्ली गाव वगळता अन्यत्र कुठेही दूरसंचार सेवा पोहोचलेली नाही. तसेच रस्ते व दळणवळणाचा अभाव, वीज पुरवठा अशा अनेक समस्या सामान्य जनतेप्रमाणेच पोलीस जवानांसाठीही अडचणीच्या ठरत आहे. एटापल्लीत पोलीस ठाण्यासाठी किंवा वसाहतीसाठी नव्याने जागा घेतो म्हटले तरीही गावाबाहेर ती घ्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. १९८० च्या वनकायद्यामुळे पोलीस वसाहतीसाठी दुर्गम भागात जागा मिळणे कठीण आहे. नव्याने जे पोलीस ठाणे निर्माण झाले त्यांना चार ते पाच एकर जागा देण्यात आली आहे. गट्टा येथे पोलीस वसाहतीचे काम निर्माणाधिन आहे. एटापल्ली तालुक्यात पोलीस उपनिरिक्षक व काही पोलीस कर्मचारी हे मुंबई, पुणे, औरंगाबाद नाशिक व मराठवाडा भागातून बदलीवर आलेले आहे. ते येथे किमान तीन वर्ष सेवा देतात. त्यानंतर येथून बदलून जातात. परंतु बदलीवर येताना एटापल्ली तालुक्यात पोलीस ठाण्याच्या परिसरात क्वॉर्टर नसल्याने ते आपले कुटुंब आणू शकत नाही. परिवाराविना त्यांना येथे राहावे लागते. कुटुंब सोडून येथे सेवा बजाविताना त्यांच्या मन:स्थितीवरही परिणाम होतो, असे अनेकजण खासगीत सांगतात. जे कर्मचारी येथे कुटुंबासह आहेत, ते ही सोयीसुविधांच्या अभावी कसेबसे दिवस काढून आपले कर्तव्य पार पाडतात.