शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

पोलीस रस्ते, दळणवळण, वीज पुरवठा, दूरसंचारच्या अभावामुळे बेजार

By admin | Updated: January 20, 2015 00:04 IST

गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील दुर्गम भाग म्हणून एटापल्ली तालुका ओळखला जातो. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस जवान स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. मात्र त्यांच्या जीवाची किमत काय,

गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील दुर्गम भाग म्हणून एटापल्ली तालुका ओळखला जातो. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस जवान स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. मात्र त्यांच्या जीवाची किमत काय, असा प्रश्न त्यांना उपलब्ध करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवरून कुणालाही पडू शकतो. एटापल्ली तालुक्यातील सर्वच संवेदनशील पोलीस स्टेशनमधील शिपाई विविध समस्यांना तोंड देत आहे. एकीकडे कुटुंबापासून दूर राहत जीव धोक्यात घालून देशाच्या रक्षणाकरिता कर्तव्य बजावित आहे तर दुसरीकडे विविध समस्यांमुळे ते तणावात जगत आहेत.अनेक भागात पोलिसांना राहण्यासाठी वसाहतीचीही सुविधा नाही. आरोग्याचाही प्रश्न कायम सतावत असतोे. नक्षलग्रस्त भागातील जवानांना सोयीसुविधा पुरविण्याचा दावा वेळोवेळी शासन करीत असले तरी दुर्गम भागात राहणारे पोलीस जवान सध्या अनंत अडचणी सहन करीत आहे. एटापल्ली तालुक्यात एटापल्ली, गट्टा, कसनसूर, जारावंडी हे जुने पोलीस ठाणे आहेत. मागील दोन वर्षाच्या काळात हालेवारा, हेडरी, बुर्गी हे नवे पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. एटापल्ली तालुका हा नक्षली कारवायांच्यादृष्टीने अतिसंवेदनशिल भाग आहे. एटापल्ली गाव वगळता अन्यत्र कुठेही दूरसंचार सेवा पोहोचलेली नाही. तसेच रस्ते व दळणवळणाचा अभाव, वीज पुरवठा अशा अनेक समस्या सामान्य जनतेप्रमाणेच पोलीस जवानांसाठीही अडचणीच्या ठरत आहे. एटापल्लीत पोलीस ठाण्यासाठी किंवा वसाहतीसाठी नव्याने जागा घेतो म्हटले तरीही गावाबाहेर ती घ्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. १९८० च्या वनकायद्यामुळे पोलीस वसाहतीसाठी दुर्गम भागात जागा मिळणे कठीण आहे. नव्याने जे पोलीस ठाणे निर्माण झाले त्यांना चार ते पाच एकर जागा देण्यात आली आहे. गट्टा येथे पोलीस वसाहतीचे काम निर्माणाधिन आहे. एटापल्ली तालुक्यात पोलीस उपनिरिक्षक व काही पोलीस कर्मचारी हे मुंबई, पुणे, औरंगाबाद नाशिक व मराठवाडा भागातून बदलीवर आलेले आहे. ते येथे किमान तीन वर्ष सेवा देतात. त्यानंतर येथून बदलून जातात. परंतु बदलीवर येताना एटापल्ली तालुक्यात पोलीस ठाण्याच्या परिसरात क्वॉर्टर नसल्याने ते आपले कुटुंब आणू शकत नाही. परिवाराविना त्यांना येथे राहावे लागते. कुटुंब सोडून येथे सेवा बजाविताना त्यांच्या मन:स्थितीवरही परिणाम होतो, असे अनेकजण खासगीत सांगतात. जे कर्मचारी येथे कुटुंबासह आहेत, ते ही सोयीसुविधांच्या अभावी कसेबसे दिवस काढून आपले कर्तव्य पार पाडतात.