शहरं
Join us  
Trending Stories
1
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
2
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
3
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
4
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
5
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
6
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
7
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
8
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
9
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
10
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
11
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
12
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
13
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
14
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
15
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
17
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
18
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
19
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
20
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस रस्ते, दळणवळण, वीज पुरवठा, दूरसंचारच्या अभावामुळे बेजार

By admin | Updated: January 20, 2015 00:04 IST

गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील दुर्गम भाग म्हणून एटापल्ली तालुका ओळखला जातो. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस जवान स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. मात्र त्यांच्या जीवाची किमत काय,

गडचिरोली जिल्ह्यात संवेदनशील दुर्गम भाग म्हणून एटापल्ली तालुका ओळखला जातो. नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलीस जवान स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. मात्र त्यांच्या जीवाची किमत काय, असा प्रश्न त्यांना उपलब्ध करण्यात येणाऱ्या सोयीसुविधांवरून कुणालाही पडू शकतो. एटापल्ली तालुक्यातील सर्वच संवेदनशील पोलीस स्टेशनमधील शिपाई विविध समस्यांना तोंड देत आहे. एकीकडे कुटुंबापासून दूर राहत जीव धोक्यात घालून देशाच्या रक्षणाकरिता कर्तव्य बजावित आहे तर दुसरीकडे विविध समस्यांमुळे ते तणावात जगत आहेत.अनेक भागात पोलिसांना राहण्यासाठी वसाहतीचीही सुविधा नाही. आरोग्याचाही प्रश्न कायम सतावत असतोे. नक्षलग्रस्त भागातील जवानांना सोयीसुविधा पुरविण्याचा दावा वेळोवेळी शासन करीत असले तरी दुर्गम भागात राहणारे पोलीस जवान सध्या अनंत अडचणी सहन करीत आहे. एटापल्ली तालुक्यात एटापल्ली, गट्टा, कसनसूर, जारावंडी हे जुने पोलीस ठाणे आहेत. मागील दोन वर्षाच्या काळात हालेवारा, हेडरी, बुर्गी हे नवे पोलीस ठाणे निर्माण करण्यात आले आहे. एटापल्ली तालुका हा नक्षली कारवायांच्यादृष्टीने अतिसंवेदनशिल भाग आहे. एटापल्ली गाव वगळता अन्यत्र कुठेही दूरसंचार सेवा पोहोचलेली नाही. तसेच रस्ते व दळणवळणाचा अभाव, वीज पुरवठा अशा अनेक समस्या सामान्य जनतेप्रमाणेच पोलीस जवानांसाठीही अडचणीच्या ठरत आहे. एटापल्लीत पोलीस ठाण्यासाठी किंवा वसाहतीसाठी नव्याने जागा घेतो म्हटले तरीही गावाबाहेर ती घ्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. १९८० च्या वनकायद्यामुळे पोलीस वसाहतीसाठी दुर्गम भागात जागा मिळणे कठीण आहे. नव्याने जे पोलीस ठाणे निर्माण झाले त्यांना चार ते पाच एकर जागा देण्यात आली आहे. गट्टा येथे पोलीस वसाहतीचे काम निर्माणाधिन आहे. एटापल्ली तालुक्यात पोलीस उपनिरिक्षक व काही पोलीस कर्मचारी हे मुंबई, पुणे, औरंगाबाद नाशिक व मराठवाडा भागातून बदलीवर आलेले आहे. ते येथे किमान तीन वर्ष सेवा देतात. त्यानंतर येथून बदलून जातात. परंतु बदलीवर येताना एटापल्ली तालुक्यात पोलीस ठाण्याच्या परिसरात क्वॉर्टर नसल्याने ते आपले कुटुंब आणू शकत नाही. परिवाराविना त्यांना येथे राहावे लागते. कुटुंब सोडून येथे सेवा बजाविताना त्यांच्या मन:स्थितीवरही परिणाम होतो, असे अनेकजण खासगीत सांगतात. जे कर्मचारी येथे कुटुंबासह आहेत, ते ही सोयीसुविधांच्या अभावी कसेबसे दिवस काढून आपले कर्तव्य पार पाडतात.