शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: राज्यात ९ वाजेपर्यंत ६.३३ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
Credit Cardच्या १६ अंकांमध्ये लपलीयेत 'ही' ४ रहस्यं; काहीच लोकांना माहितीये याचा अर्थ, पाहा
6
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
7
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
8
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
9
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
10
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
11
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
12
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
13
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
14
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
15
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
16
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
17
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
18
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
19
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
20
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 

पाेलिसांनी ४०७ किलाे गांजा केला नष्ट, १३ कारवायांमध्ये केली जप्तीची कारवाई

By दिगांबर जवादे | Published: February 22, 2024 10:08 PM

गडचिराेली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. दाेन्ही राज्यांच्या सीमेलगतचा भाग नक्षल प्रभावित व घनदाट जंगलाने व्यापला आहे.

गडचिरोली: जिल्ह्यातील विविध पाेलिस स्टेशनतर्फे १३ कारवाया करून जप्त करण्यात आलेला सुमारे ४०७ किलाे गांजा पाेलिसांनी नष्ट केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीच्या मार्गदर्शनात सदर गांजा नष्ट करण्यात आला.

गडचिराेली जिल्ह्याची सीमा छत्तीसगड राज्याला लागून आहे. दाेन्ही राज्यांच्या सीमेलगतचा भाग नक्षल प्रभावित व घनदाट जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे पाेलिस या भागात सहजासहजी पाेहाेचत नाहीत. याचा गैरफायदा छत्तीसगड राज्यातील नागरिकांकडून घेतला जातो. शासनाने प्रतिबंधित केलेल्या गांजाची शेती करतात. पुढे हा गांजा गडचिराेली जिल्हा मार्गे राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये पाठवला जातो. गाेपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवून पाेलिसांनी कारवाया केल्या.

गडचिराेली पाेलिस स्टेशनच्या पाेलिसांनी ४, आसरअल्ली २, अहेरी ३, चामाेर्शी, धानाेरा, मुलचेरा, रेपनपल्ली पाेलिस स्टेशनने एक अशा एकूण १३ कारवाया करून ४०७ क्विंटल गांजा जप्त केला आहे. अमली पदार्थ नाश समितीच्या परवानगीनंतर गांजा नष्ट करण्यात आला आहे. अमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलिस अधीक्षक नीलोत्पल, सदस्य अपर पोलिस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, पोलिस उपअधीक्षक विश्वास जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पाेलिस निरीक्षक उल्हास भुसारी, रासायनिक विश्लेषक विलास शिवाजी ठानगे, वजन मापे विभागाचे निरीक्षक प्रकाश उके, जिल्हा परिषद गडचिरोली येथील पंच लाचुलू मडावी, अक्षय राऊत यांच्या परवागनीनंतर गांजा नष्ट करण्यात आला.

गांजा नष्ट करण्याची कारवाई करतेवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, पाेलिस उपनिरीक्षक सरिता मरकाम, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस अंमलदार नरेश सहारे, दीपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, शुक्राचारी गवई, राकेश सोनटक्के, हेमंत गेडाम, सुनील पुठ्ठावार, माणिक दुधबळे, उमेश जगदाळे, माणिक निसार, मनोहर टोगरवार यांनी केली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थGadchiroliगडचिरोली