शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

भामरागड-कोठी मार्गाची दुर्दशा

By admin | Updated: January 27, 2015 23:33 IST

तालुक्यातील भामरागड-कोठी-गट्टा या मार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वाहनधारक त्रस्त झाले असून बांधकाम विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भामरागड : तालुक्यातील भामरागड-कोठी-गट्टा या मार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वाहनधारक त्रस्त झाले असून बांधकाम विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भामरागड तालुक्यातील भामरागड-कोठी-गट्टा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. भामरागड तालुक्यात ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. मागील चार वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरूस्तीच केली नाही. दोन वर्षापूर्वीच या मार्गावरील डांबर उखडले होते. तेव्हाच या मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली होती. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मागील वर्षी बांधकाम विभागाने हुलेर गावाजवळ दोन किमी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर सदर काम समोर सरकलेच नाही. डागडुजी करण्यात आलेला रस्ता सुद्धा अल्पावधीतच उखडला आहे. नक्षलग्रस्त भागात रस्ते बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होतो. सदर निधी दरवर्षीच खर्च झाला असल्याचे दाखविण्यात येते. मात्र दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे आलेला पैसा जातो कुठे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी व कंत्राटदार संगणमताने रस्त्यांचे बांधकाम न करताच परस्पर पैसे लाटत असावे, असाही आरोप केला जात आहे. नक्षल समस्येला हद्दपार करून दुर्गम भागातील नागरिकांचा विकास करण्यासाठी दुर्गम भागातील रस्त्यांचे काम होणे आवश्यक आहे. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी भामरागड परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)