शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

भामरागड-कोठी मार्गाची दुर्दशा

By admin | Updated: January 27, 2015 23:33 IST

तालुक्यातील भामरागड-कोठी-गट्टा या मार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वाहनधारक त्रस्त झाले असून बांधकाम विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

भामरागड : तालुक्यातील भामरागड-कोठी-गट्टा या मार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे परिसरातील वाहनधारक त्रस्त झाले असून बांधकाम विभागाप्रती तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भामरागड तालुक्यातील भामरागड-कोठी-गट्टा हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. भामरागड तालुक्यात ग्रामीण भागात कार्यरत असलेले बहुतांश कर्मचारी याच मार्गाने ये-जा करतात. मागील चार वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरूस्तीच केली नाही. दोन वर्षापूर्वीच या मार्गावरील डांबर उखडले होते. तेव्हाच या मार्गाची दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली होती. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मागील वर्षी बांधकाम विभागाने हुलेर गावाजवळ दोन किमी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्यानंतर सदर काम समोर सरकलेच नाही. डागडुजी करण्यात आलेला रस्ता सुद्धा अल्पावधीतच उखडला आहे. नक्षलग्रस्त भागात रस्ते बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त होतो. सदर निधी दरवर्षीच खर्च झाला असल्याचे दाखविण्यात येते. मात्र दुर्गम भागातील रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. त्यामुळे आलेला पैसा जातो कुठे, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. लोकप्रतिनिधी, अधिकारी व कंत्राटदार संगणमताने रस्त्यांचे बांधकाम न करताच परस्पर पैसे लाटत असावे, असाही आरोप केला जात आहे. नक्षल समस्येला हद्दपार करून दुर्गम भागातील नागरिकांचा विकास करण्यासाठी दुर्गम भागातील रस्त्यांचे काम होणे आवश्यक आहे. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी भामरागड परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)