शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

By admin | Updated: January 6, 2015 23:00 IST

नगरपालिकेला उशिरा का होईना, प्लास्टिकच्या दुष्परिणामाविषयी जाग आली असून गडचिरोली नगर परिषदेने संपूर्ण शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत प्लास्टिक

दुकानदारांना नोटीस : शहरात व्यापक प्रमाणात जनजागृतीगडचिरोली : नगरपालिकेला उशिरा का होईना, प्लास्टिकच्या दुष्परिणामाविषयी जाग आली असून गडचिरोली नगर परिषदेने संपूर्ण शहर प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. त्याअंतर्गत प्लास्टिक न वापरण्याविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या वापरणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.शहरातील बहुतांश दुकानदार व नागरिक प्लास्टिकचा अनावश्यक वापर करतात. त्यामुळे शहरी कचऱ्यात सर्वाधिक प्रमाण प्लास्टिकचे असल्याचे दिसून येते. प्लास्टिकचे किमान ५०० वर्षे विघटन होत नसल्याने भविष्यात प्लास्टिकचा कचरा पर्यावरणासाठी घातक ठरू शकतो, ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर यापूर्वीच बंदी आणली आहे. याची सक्त अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रत्येक महानगरपालिकेला व नगर परिषदेला देण्यात आले आहेत. मात्र गडचिरोली नगर परिषदेने सदर सूचना आजपर्यंत फारशी गांभिर्याने न घेता, प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवला. त्यामुळे शहरवासीयांकडून प्लास्टिकचा अनावश्यक वापर सुरूच ठेवला होता. डम्पिंग यार्डमध्ये प्लास्टिकचाच कचरा सर्वाधिक असून सदर कचऱ्याची विल्हेवाट लावणे अशक्य झाले असल्याचे लक्षात आल्यानंतर गडचिरोली नगर परिषद प्रशासनाचे डोळे उघडले. प्लास्टिकच्या वापरावर बंदी न घातल्यास भविष्यात फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल, हे लक्षात आल्यानंतर प्लास्टिकमुक्तीचा संकल्प नगर परिषदेने केला आहे. प्लास्टिकमुक्तीला नागरिकांचा सहभाग लाभावा, यासाठी शहरातून ध्वनीक्षेपक, पत्रके यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. भाजीपाला घेण्यासाठी जाताना कापडी पिशवी घेऊनच जावे, अनावश्यक प्लास्टिकचा वापर करू नये, घरातील प्लास्टिक नालीमध्ये न फेकता कचराकुंडी किंवा घंटागाडीमध्येच टाकावे, प्लास्टिक फेकून देताना आढळून आल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. त्याचबरोबर शहरातील भाजीपाला विक्रेते, हॉटेल दुकानदार, किराणा दुकानदार, जनरल स्टोअर्स यांना नोटीस बजावून ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या प्लास्टिक वापरणाऱ्या दुकानदांरावर ५०० रूपयांचा दंड ठोकण्याचाही इशारा दिला आहे. नागरिकांना प्लास्टिकच्या वापराची सवय झाली आहे. ही सवय तोडण्यासाठी नगर परिषदेला दंड व जनजागृती या दोन्ही साधनांचा परिणामकारक वापर करावा, अन्यथा प्लास्टिक निर्मूलन फार्स ठरण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)