शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

वाढदिवशीच नाट्य कलावंताने घेतला अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST

झाडीपट्टी रंगभूमीवर गेली चार दशके माराेतराव बुल्ले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. नाटककार, लेखक, दिग्दर्शक, बाहुली नाट्य कलावंत तसेच ...

झाडीपट्टी रंगभूमीवर गेली चार दशके माराेतराव बुल्ले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. नाटककार, लेखक, दिग्दर्शक, बाहुली नाट्य कलावंत तसेच आदर्श पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक अशी त्यांची ख्याती हाेती; परंतु त्यांच्या आकस्मिक जाण्याने रंगभूमीत पाेकळी निर्माण झाली. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड हाेती. सुरुवातीला त्यांनी दंडारीत बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर कुरखेडा तालुक्यातील धनेगाव येथे ‘व्यंकोजी वाघ’ या नाटकात भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. बुल्ले यांनी पाैराणिक, ऐतिहासिक व लावणीप्रधान नाटकांमध्ये भूमिका साकारली. अल्प मानधनात त्यांनी गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश गावांत जाऊन भूमिका साकारल्या. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी नवनवीन उपक्रम राबविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेतर्फे त्यांना २००१ मध्ये जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यासह अन्य पुरस्कारही त्यांना मिळाले हाेते. ४ मे २०२१ रोजी त्यांचा ६२ वा वाढदिवस होता. नेहमीप्रमाणे प्रातर्विधी आटोपून त्यांनी आपली प्रसिद्ध भूमिका ‘व्यंकोजी वाघ’ नाटकातील संभाषण म्हणून दाखवले व सगळ्यांना हसविले. नंतर जेवण झाल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली व उपचाराकरिता नेत असताना काळाने अचानक झडप घातली व त्यांची प्राणज्योत मालवली. भारदस्त कलावंताचा वाढदिवशीच अंत झाल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे.