शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

वाढदिवशीच नाट्य कलावंताने घेतला अखेरचा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST

झाडीपट्टी रंगभूमीवर गेली चार दशके माराेतराव बुल्ले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. नाटककार, लेखक, दिग्दर्शक, बाहुली नाट्य कलावंत तसेच ...

झाडीपट्टी रंगभूमीवर गेली चार दशके माराेतराव बुल्ले यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. नाटककार, लेखक, दिग्दर्शक, बाहुली नाट्य कलावंत तसेच आदर्श पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक अशी त्यांची ख्याती हाेती; परंतु त्यांच्या आकस्मिक जाण्याने रंगभूमीत पाेकळी निर्माण झाली. देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. त्यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड हाेती. सुरुवातीला त्यांनी दंडारीत बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर कुरखेडा तालुक्यातील धनेगाव येथे ‘व्यंकोजी वाघ’ या नाटकात भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. बुल्ले यांनी पाैराणिक, ऐतिहासिक व लावणीप्रधान नाटकांमध्ये भूमिका साकारली. अल्प मानधनात त्यांनी गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश गावांत जाऊन भूमिका साकारल्या. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी नवनवीन उपक्रम राबविले. त्यांच्या या कार्याची दखल घेत जिल्हा परिषदेतर्फे त्यांना २००१ मध्ये जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यासह अन्य पुरस्कारही त्यांना मिळाले हाेते. ४ मे २०२१ रोजी त्यांचा ६२ वा वाढदिवस होता. नेहमीप्रमाणे प्रातर्विधी आटोपून त्यांनी आपली प्रसिद्ध भूमिका ‘व्यंकोजी वाघ’ नाटकातील संभाषण म्हणून दाखवले व सगळ्यांना हसविले. नंतर जेवण झाल्यावर त्यांची प्रकृती अचानक बिघडली व उपचाराकरिता नेत असताना काळाने अचानक झडप घातली व त्यांची प्राणज्योत मालवली. भारदस्त कलावंताचा वाढदिवशीच अंत झाल्याने हळहळ व्यक्त हाेत आहे.