शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

५० हजार बियाण्यांचे रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

‘करू जतन वनांचे व पर्यावरणाचे, बदलवू भविष्य जगाचे’ या उक्तीनुसार जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती कोरची, यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ५० हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम मोहगाव येथील नर्सरी पटांगण व परिसरात पार पाडला. या ठिकाणी पहिल्यांदाच सीताफळाच्या बियांचे रोपण करण्यात आले. सीताफळाच्या बिया रूजण्यास कमी पाणी लागतो. गुरेढोरे तसेच वन्य प्राणी सीताफळाच्या रोपट्यांना खात नाही.

ठळक मुद्देसीताफळ लागवडीचा प्रयोग : जिल्हा परिषद व कोरची पंचायत समितीचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : दरवर्षी वन विभागामार्फत वृक्षारोपण केले जाते. परंतु या रोपट्यांचे संरक्षण व संवर्धन होत नसल्याने लागवडीनंतर वर्षभरातच रोपे नष्ट होतात. अनेकदा मोकाट जनावरे रोपटी फस्त करतात. तर काही रोपटी पाण्याअभावी करपतात. हा प्रकार टाळण्यासाठी कमी पाण्याची आवश्यकता असलेली व जनावरे न खाणारी सीताफळाची रोपटी लावण्याचा संकल्प कोरची पंचायत समितीने केला. या अंतर्गत मोहगाव येथील नर्सरी व परिसरात सीताफळाच्या ५० हजार बियाण्यांचे रोपण बुधवारी करण्यात आले.‘करू जतन वनांचे व पर्यावरणाचे, बदलवू भविष्य जगाचे’ या उक्तीनुसार जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती कोरची, यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ५० हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम मोहगाव येथील नर्सरी पटांगण व परिसरात पार पाडला. या ठिकाणी पहिल्यांदाच सीताफळाच्या बियांचे रोपण करण्यात आले. सीताफळाच्या बिया रूजण्यास कमी पाणी लागतो. गुरेढोरे तसेच वन्य प्राणी सीताफळाच्या रोपट्यांना खात नाही. कोरची तालुक्यातील वातावरण या वृक्षासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे एकाच दिवसात पन्नास हजार सीताफळ बियाणे लावण्यात आली. तालुक्यात सीताफळ बियांची वृक्ष लागवड करणे हा राज्यातील पहिलाच प्रयोग असण्याची शक्यता आहे. यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्यासह ग्रामसेवक, ग्राम पंचायत कर्मचारी ग्रामरोजगार सेवक, महिला बचत गट यांच्या सहभागातून व श्रमदानातून वृक्ष लागवड करण्यात आले. यावेळी कोरची पंचाय समिती सभापती श्रावनकुमार मातलाम, गटविकास अधिकारी देविदास देवरे, उपसभापती सुशीला जमकातन, सदस्य कचरी काटेगे, सदाराम नुरुटी, सहायक गटविकास अधिकारी एस. आर. टिचकुले, विस्तार अधिकारी राजेश फाये, कृषी अधिकारी विनोद पांचाळ, विस्तार अधिकारी निखिल बाबर, राहुल कोपुलवार, आशिष भोयर, दामोधर पटले हजर होते.

टॅग्स :forest departmentवनविभाग