शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

घरचे साधे पाणी बरे, पण काेराेनाकाळात कॅन नकाेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 11:00 IST

Gadchiroli news थंड पाणी विक्रीच्या व्यवसायाला उन्हाळ्यात सुगीचे दिवस असतात. मात्र गतवर्षीपासून आतापर्यंत काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे इतर व्यवसायांसाेबतच आरओ वाॅटरच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे या वर्षी थंड पाण्याचा हा व्यवसाय १० टक्क्यांच्या आतच आहे.

ठळक मुद्देसंसर्गाच्या भीतीने आरओ वाॅटरचा व्यवसाय मंदावला

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : थंड पाणी विक्रीच्या व्यवसायाला उन्हाळ्यात सुगीचे दिवस असतात. मात्र गतवर्षीपासून आतापर्यंत काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे इतर व्यवसायांसाेबतच आरओ वाॅटरच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे या वर्षी थंड पाण्याचा हा व्यवसाय १० टक्क्यांच्या आतच आहे.

काेराेना महामारीमुळे यंदा विवाह समारंभ, वाढदिवस, बारसे आदी काैटुंबिक तसेच सार्वजनिक कार्यक्रम पूर्णत: बंद आहेत. कार्यक्रम हाेत असले तरी माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने ते पार पाडले जात आहेत. त्यामुळे अशा कार्यक्रमात थंड पाण्याच्या कॅनची मागणी हाेत नसल्याचे व्यावसायिकांनी सांगितले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हाेणारे माेठे कार्यक्रम पूर्णत: बंद असल्याने थंड पाण्याच्या कॅनची मागणी प्रचंड घटली असून, काेराेनामुळे ८० ते ९० टक्के व्यवसाय बुडाला आहे.

पालिकेकडे २६ प्रकल्पांची नाेंद

गडचिराेली नगरपालिकेच्या हद्दीत जवळपास २५ आरओ वाॅटर प्लॅन्ट आहेत. पालिकेकडे या २६ आरओ वाॅटर प्लॅन्टची नाेंद आहे. गडचिराेली शहरात मुख्य बाजारपेठेसह कॅम्प एरिया, गाेकुलनगर, हनुमान वाॅर्ड, सर्वाेदय वाॅर्ड, रामनगर, काॅम्प्लेक्स, गांधी वाॅर्ड व इतर भागात आरओ वाॅटर प्लॅन्ट आहेत. मध्यंतरीच्या काळात पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नाेव्हेंबर महिन्यात शहरातील आरओ प्लॅन्ट व्यावसायिकांना नाेटीस बजावली हाेती. तेव्हा काही दिवस व्यवसाय पूर्णत: बंद हाेता.

सकाळी हाेताे पुरवठा

शहरात मागणी केलेल्या ग्राहकांना आरओ वाॅटर प्लान्टधारक चारचाकी वाहनाद्वारे थंड पाण्याचे कॅन सकाळच्या सुमारास ११ वाजेपर्यंत पाेहाेचवित आहेत.

काेराेनाची पहिली लाट मार्च महिन्यापासून सुरू झाली. मागील वर्षीचा संपूर्ण उन्हाळा काेराेना संकटातच गेला. आता काेराेनाची दुसरी लाट सुरू असून संसर्ग अधिकच वाढत आहे. काेराेनामुळे गेल्या वर्षी व या वर्षीसुद्धा आरओ वाॅटरचा व्यवसाय बुडाला आहे. या वर्षी गरजू माेजक्या ग्राहकांनाच पाण्याचे कॅन पाेहाेचविले जात आहेत.

- मिलिंद जुआरे, व्यावसायिक, आरमाेरी

उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज अधिक भासते. आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात चार ते पाच महिने दरराेज पाण्याचे एक ते दाेन कॅन मागवत असताे. मात्र यंदा काेराेना संसर्गाच्या भीतीमुळे घरचे नळाचेच पाणी पीत आहाेत. पूर्वीसारखे आता काेराेनाकाळात थंड पाण्याचे कॅनही सहजासहजी घरपाेच मिळत नाहीत. त्यामुळे माठातील थंडगार पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात आहे.

- समीर रायपुरे, ग्राहक

आमच्या दुकानात ग्राहक व इतर सर्वांसाठी थंड पाण्याचे कॅन उन्हाळ्यात येत हाेते. आता काेराेना महामारीच्या संकटात लाॅकडाऊनमुळे दुकान बंद असल्याने पाण्याचे कॅन बंद करण्यात आले आहेत. काेराेना संसर्गाबाबत आम्ही सर्व कुटुंबीय काळजी घेत असून, घरी मागविण्यात येणारे पाण्याचे कॅनही बंद केले आहेत. घरच्या फिल्टरमधील पाणीच वापरले जात आहे.

- सुभाष चुनारकर, ग्राहक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस