शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

शारीरिक अंतर तारक, तर भावनिक अंतर ठरू शकते मारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:00 IST

गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ४० हजारांपेक्षा जास्त लोक आले आहेत. त्यातील १५ हजारांपेक्षा जास्त लोक रेड झोनमधून आले आहेत. काही दिवसांपासून रेड झोनमधून आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात राहणे आवश्यक केले आहे. अर्थात हे सर्व लोक कोरोनाचे रुग्ण नसले तरी त्यांना जर कोरोनाची बाधा झालेली असेल तर ती त्यांच्यापुरती मर्यादित राहावी, इतरांना त्यांच्यापासून बाधा होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे.

ठळक मुद्देआजार नियंत्रणासाठी सकारात्मक राहा : विलगीकरणातील लोकांवर मात्र मानसिक दडपण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून सामाजिक जीवन बदलून टाकणाऱ्या कोरोना विषाणुची पावले आता सर्वाधिक काळ ग्रीन झोनमध्ये राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यातही पडली आहेत. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची परिस्थिती आणखीच बिकट झाली आहे. गडचिरोलीच्या रानावनात फिरणाºया कणखर नागरिकांना कोरोनाचा विषाणू सहजपणे आपल्या कवेत घेणे शक्य नाही, मात्र कोरोनाच्या भितीपोटी शारीरिक अंतरासोबत ठेवले जात असलेले भावनिक अंतर सामान्य नागरिकालाही रुग्ण बनविण्यास कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या महिनाभरात जिल्ह्यात ४० हजारांपेक्षा जास्त लोक आले आहेत. त्यातील १५ हजारांपेक्षा जास्त लोक रेड झोनमधून आले आहेत. काही दिवसांपासून रेड झोनमधून आलेल्या सर्वांना संस्थात्मक विलगिकरण कक्षात राहणे आवश्यक केले आहे. अर्थात हे सर्व लोक कोरोनाचे रुग्ण नसले तरी त्यांना जर कोरोनाची बाधा झालेली असेल तर ती त्यांच्यापुरती मर्यादित राहावी, इतरांना त्यांच्यापासून बाधा होऊ नये हा त्यामागील उद्देश आहे. मात्र विलगिकरण कक्षात ठेवलेले लोक जणूकाही कोरोनाबाधित रुग्णच आहेत आणि त्यांना कोरोना झाला म्हणजे त्यांनी काहीतरी अपराध केला आहे, अशा भावनेतून त्यांच्याकडे लोक पाहात आहेत. विशेष म्हणजे विलगिकरण कक्षात किंवा संशयित म्हणून रुग्णालयात दाखल केलेले लोक स्वॅब नमुन्याचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर निश्चिंतपणे घरी जातात. पण संशयमुक्त झाल्यानंतरही लोक त्यांच्यापासून अंतर ठेवून वागत आहेत. ही बाब अनेकांना कोड्यात टाकत आहे.विषाणूची बाधा होऊ नये म्हणून एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवण्याचा नियम पाळण्याची सवय आता पुढील अनेक महिने सर्वांनाच करावी लागणार आहे. मात्र हे करताना एकमेकांबद्दलचा जिव्हाळा, आपलेपणा, माणुसकी कमी झाल्यास त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाहेर जिल्ह्यातून स्वगावी परतलेल्या मजूरवर्गासह अनेकांना गावात घेण्यासही लोक तयार होत नव्हते. यासाठी आरोग्य विभागाला योग्य ती जनजागृती करावी लागणार आहे.त्यांना हवी होम क्वॉरंटाईनची मुभाजिल्ह्यात सद्यस्थितीत ८ हजार ७३५ लोक संस्थात्मक विलगिकरणात आहेत. ज्या लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही विलगिकरण कक्षात आणून १४ दिवस ठेवले जात आहे. रुग्णसंख्या वाढल्यास विलगिकरण कक्षासाठी शाळा-वसतिगृहे कमी पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर क्षेत्रातून आलेल्या व्यक्तींना, जर त्यांच्या निवासस्थानी विलगिकरण कक्षाप्रमाणे स्वतंत्र खोली, स्वच्छतागृह आणि इतरांचा संपर्क येणार नाही अशी व्यवस्था असेल तर गृह विलगिकरणाची मुभा देणे गरजेचे आहे. यामुळे शासकीय यंत्रणेवरचा ताण कमी होऊन संबंधित व्यक्तीलाही विलगिकरण कक्षातील वातावरणामुळे होणारा रुग्णासारखा आभास होणार नाही.मायेच्या उपचारातून मिळते सकारात्मक ऊर्जाअनेक ठिकाणच्या विलगिकरण कक्षात ५ ते १० जणांसाठी एकच शौचालय, स्रानगृह आहे. शिवाय जेवणासाठी डबा आणून देणाºया लोकांचा एखाद्या बाधित व्यक्तीशी संपर्क येऊन त्यांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याऊलट घरी विलगिकरणाची पुरेशी सोय असणाºयांना ती मुभा दिल्यास कौटुंबिय मायेतून संबंधित व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळून ती व्यक्ती ठणठणीत राहू शकते. याचा आरोग्य प्रशासनाने गांभिर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या