शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

ग्रामस्थांनी श्रमदानातून उपसला सार्वजनिक विहिरीतील गाळ

By admin | Updated: May 6, 2016 01:11 IST

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरी बुजल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

आसरअल्ली ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनीच केली विहिरींची स्वच्छता आसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरी बुजल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी पुढाकार घेउन श्रमदानातून बोरगुड्डम वार्डातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ उपसून स्वच्छता केली.अत्यल्प पावसामुळे यंदा सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, झिंगानूर परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी शेकडो विहिरी आत्ताच कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नाल्यातून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. आसरअल्ली गावातही उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. आसरअल्ली येथील बोरगुड्डम वार्डातील महसूल विभागाच्या इमारतीजवळची ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर गेल्या अनेक वर्षांपासून बुजली होती. या संदर्भात वार्डातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी केल्या व या विहिरींतील गाळ उपसण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष करीत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वार्डातीलच महिला, पुरूष व मुलांनी एकत्र येऊन श्रमदानातून विहिरीतील गाळ उपसण्याचे काम केले. चार दिवस सदर काम केल्यावर या विहिरीला पाणी लागले. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात पाण्याची सुविधा झाली आहे. (वार्ताहर)आठवडाभरापासून वीजबत्ती गूल; नळ पाणी पुरवठा ठप्पअवकाळी वादळी पावसामुळे आसरअल्ली भागातील वीज खांब वाकले तसेच काही ठिकाणच्या तारा लोंबकळत आहेत. परिणामी आसरअल्ली येथील वीज पुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद आहेत. यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने होणारा नळ पाणी पुरवठा बंद झाला आहे. परिणामी गावात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र या साऱ्या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन व महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत.बोरगुडम वार्डात पाणी टंचाई तीव्र होणारआसरअल्ली गावातील बोरगुडम येथील नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन श्रमदानातून सार्वजनिक विहिरींची गाळ उपसा करून स्वच्छता केली. त्यामुळे या विहिरीला काही प्रमाणात पाणी लागले आहे. मात्र ग्रामपंचायत या विहिरींचे खोलीकरण न केल्यास १५ दिवसानंतर पुन्हा या वार्डात पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.