शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांनी श्रमदानातून उपसला सार्वजनिक विहिरीतील गाळ

By admin | Updated: May 6, 2016 01:11 IST

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरी बुजल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

आसरअल्ली ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांनीच केली विहिरींची स्वच्छता आसरअल्ली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली गावात ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरी बुजल्यामुळे गेल्या महिनाभरापासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून ग्रामस्थांनी पुढाकार घेउन श्रमदानातून बोरगुड्डम वार्डातील सार्वजनिक विहिरींमधील गाळ उपसून स्वच्छता केली.अत्यल्प पावसामुळे यंदा सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, झिंगानूर परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी शेकडो विहिरी आत्ताच कोरड्या पडल्या आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना नाल्यातून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. आसरअल्ली गावातही उन्हाळ्यात भिषण पाणी टंचाई जाणवत आहे. परिणामी नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरू आहे. आसरअल्ली येथील बोरगुड्डम वार्डातील महसूल विभागाच्या इमारतीजवळची ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर गेल्या अनेक वर्षांपासून बुजली होती. या संदर्भात वार्डातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारी केल्या व या विहिरींतील गाळ उपसण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष करीत कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे वार्डातीलच महिला, पुरूष व मुलांनी एकत्र येऊन श्रमदानातून विहिरीतील गाळ उपसण्याचे काम केले. चार दिवस सदर काम केल्यावर या विहिरीला पाणी लागले. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात पाण्याची सुविधा झाली आहे. (वार्ताहर)आठवडाभरापासून वीजबत्ती गूल; नळ पाणी पुरवठा ठप्पअवकाळी वादळी पावसामुळे आसरअल्ली भागातील वीज खांब वाकले तसेच काही ठिकाणच्या तारा लोंबकळत आहेत. परिणामी आसरअल्ली येथील वीज पुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद आहेत. यामुळे ग्रामपंचायतीच्या वतीने होणारा नळ पाणी पुरवठा बंद झाला आहे. परिणामी गावात प्रचंड पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मात्र या साऱ्या प्रकाराकडे ग्रामपंचायत प्रशासन व महावितरणचे कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत.बोरगुडम वार्डात पाणी टंचाई तीव्र होणारआसरअल्ली गावातील बोरगुडम येथील नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन श्रमदानातून सार्वजनिक विहिरींची गाळ उपसा करून स्वच्छता केली. त्यामुळे या विहिरीला काही प्रमाणात पाणी लागले आहे. मात्र ग्रामपंचायत या विहिरींचे खोलीकरण न केल्यास १५ दिवसानंतर पुन्हा या वार्डात पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे.