शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मेडीगड्डासाठी 138.91 हेक्टर शेतजमिनीचे भूसंपादन अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2022 22:41 IST

सन २०१६मध्ये तत्कालीन राज्यपाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणा सरकारच्या या प्रकल्पाकरिता हिरवा झेंडा दाखवून २३ ऑगस्ट २०१६ रोजी दोन्ही राज्यांमध्ये सिंचन प्रकल्पाचा करारनामा केला होता. त्यावेळी सिरोंचा तालुक्यातून या प्रकल्पासाठी विरोध झाला. परंतु, तत्कालीन पालकमंत्र्यांनी गावागावात समर्थन रॅली काढून मेडीगड्डा प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग सुकर केला. 

महेश आगुलालाेकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील मेडिगड्डा कालेश्वर प्रकल्पासाठी भूसंपादन केल्या जाणाऱ्या ३७३.८० हेक्टर शेतजमिनीपैकी १३८.९१ हेक्टर शेतजमिनीचे अधिग्रहण गेल्या तीन वर्षांपासून लालफितीत अडकले आहे. त्याचा फटका या भागातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. प्रकल्पाच्या वरच्या भागातील बॅक वाॅटरमुळे शेकडो हेक्टरवरील पीक पाण्याखाली जात आहे तर मेडीगड्डाच्या खालच्या भागातील शेकडो हेक्टर शेतकऱ्यांची शेतजमीन खरडून जाऊन गोदावरी नदीच्या पात्रात मिसळत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी भूमिहीन  होत  आहे.सन २०१६मध्ये तत्कालीन राज्यपाल आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेलंगणा सरकारच्या या प्रकल्पाकरिता हिरवा झेंडा दाखवून २३ ऑगस्ट २०१६ रोजी दोन्ही राज्यांमध्ये सिंचन प्रकल्पाचा करारनामा केला होता. त्यावेळी सिरोंचा तालुक्यातून या प्रकल्पासाठी विरोध झाला. परंतु, तत्कालीन पालकमंत्र्यांनी गावागावात समर्थन रॅली काढून मेडीगड्डा प्रकल्पाच्या उभारणीचा मार्ग सुकर केला. आज वास्तविक पाहता या प्रकल्पामुळे सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली जात आहे. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील शेतकरी मोबदल्यासाठी उपोषण करत आहेत.

आवश्यकता ३७८ हेक्टरची, पण खरेदी २३४.९१ हेक्टरचीच-    सन २०१६ ते २०१९ या कालावधीत मेडीगड्डा कालेश्वर सिंचन प्रकल्पाकरिता केलेल्या सर्वेक्षणांतर्गत या प्रकल्पासाठी ३७८ हेक्टर शेतजमीन लागणार असल्याने ती जमीन खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यावेळी तेलंगणा सरकारला हा प्रकल्प तेलंगणा राज्यातच नव्हे, तर संपूर्ण भारत देशात कौतुकाचा विषय करण्याची महत्त्वाकांक्षा लागली होती. त्यासाठी हा प्रकल्प दोन ते तीन वर्षांत उभा करण्यात आला. -    भूसंपादनाकरिता महाराष्ट्र राज्याकडील शेतजमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्यानुसार देताना जर पीडित शेतकरी समाधानी नसतील तर तेलंगणा सरकार पूर्णपणे थेट खरेदी करणार, असेही ठरले होते. त्यासाठी तेलंगणा सरकारने एकरी १०.५० लाख रुपये महाराष्ट्र सरकारकडे दिले. -    परंतु, ३७३.८० हेक्टर जमिनीपैकी केवळ २३४.९१ हेक्टर शेतजमीनच तेलंगणा सरकारने खरेदी केली. बाकीच्या १३८.९१ हेक्टर शेतजमिनीच्या मंजूर झालेला भूसंपादनांतर्गत प्रक्रिया स्थगित करून भूसंपादन प्रक्रियेसाठी पीडित शेतकऱ्यांना झुलविले जात आहे.

मेडिगड्डा प्रकल्पामुळे तीन वर्षांपासून मंजूर    झालेल्या जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया स्थगित ठेवली. ही प्रक्रिया २०१३च्या भूसंपादन कायद्यानुसार न करता सरळ, थेट खरेदी-विक्रीप्रमाणे करून एकरी २० लाख रुपये मोबदला देण्यात यावा.- रामप्रसाद शंकर रंगुवार, शेतकरी, आरडा

मेडिगड्डा प्रकल्पाच्या विसर्गामुळे खालच्या भागातील आसरअल्ली, अंकिसा, बालमुत्यमपल्ली, पोचमपल्ली व इतर गावांतील शेकडो हेक्टर शेतजमीन नष्ट होऊन गोदावरी नदीच्या पात्रात जात आहे. आतापर्यंत किती जमीन पात्रात गेली, याचे सर्वेक्षण झाले पाहिजे आणि पीडित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. तसेच मेडीगड्डाच्या खालच्या भागात संरक्षक भिंत उभारली पाहिजे.- चंद्रशेखर पुलगम, सामाजिक कार्यकर्ते, आसरअल्ली

 

टॅग्स :DamधरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प