शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पैसेवारीचा यूटर्न शेतकऱ्यांच्या मुळावर

By admin | Updated: October 3, 2015 01:16 IST

सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने प्रथमच ६७ पैसेपेक्षा अधिक व कमी असलेल्या गावांची माहिती मागितली होती

५० च्या खाली असलेल्यां गावांनाच मिळणार लाभ : १ हजार ८५ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या वर ; सुधारित मागितली माहिती

लोकमत विशेषगडचिरोली : सत्तेत आलेल्या भाजपा सरकारने प्रथमच ६७ पैसेपेक्षा अधिक व कमी असलेल्या गावांची माहिती मागितली होती. या नवीन पद्धतीनुसार सुमारे ८० टक्के गावे दुष्काळग्रस्त घोषित करून त्यांना त्याप्रमाणे सोयीसवलती उपलब्ध करून द्याव्या लागतील, ही बाब लक्षात आल्यानंतर शासनाने युटर्न घेत जुन्या प्रमाणेच पैसेवारीचा घोषवारा पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नवीन निकषानुसार गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे १ हजार ८५ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या वर असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील पिकांची स्थिती लक्षात येण्याच्या उद्देशाने सप्टेंबर महिन्यात महसूल विभागाच्या मार्फतीने पाहणी करून पैसेवारी जाहीर केली जाते. यापूर्वी ५० पैसेपेक्षा कमी व जास्त असलेल्या गावांची पैसेवारी जाहीर केली जात होती. बहुतांश गावांची पैसेवारी ५० टक्क्यापेक्षा अधिक राहत असल्याने या गावाला दुष्काळाच्या काळात सरकारकडूून राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ मिळत नव्हता. त्याचबरोबर त्या गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळ जाहीर केला जात नव्हता. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनानुसार राज्य शासनाने यावर्षी प्रथमच ६७ पैसेपेक्षा अधिक व कमी असलेल्या गावांचा गोषवारा मागितला होता. या नवीन पद्धतीनुसार राज्यातील ८० टक्क्याहून अधिक गावांची पैसेवारी ६७ टक्क्यापेक्षा कमी असल्याचे दिसून आले. नवीन नियमानुसार या सर्व गावांना दुष्काळग्रस्त घोषित करून दुष्काळात राबवायच्या योजना या गावांमध्ये राबवाव्या लागल्या असत्या. त्यामुळे शासनावरील आर्थिक भार आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने जिल्हा प्रशासनाला आठ दिवसांतच नवीन आदेश निर्गमित करून ५० पैसेपेक्षा कमी व अधिक असलेल्या गावांची यादी मागितली आहे. सदर नियम शेतकऱ्यांच्या मुळावर बसण्याची शक्यता आहे. ५० टक्क्याच्या पैसेवारीनुसार गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १ हजार ६८८ गावांपैकी केवळ ३६७ गावांची पैसेवारी ५० टक्केपेक्षा कमी आहे. तर सुमारे १ हजार ८५ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास केवळ ३६७ गावांनाच दुष्काळग्रस्त घोषित करून तेथील शेतकऱ्यांना सवलती पुरविल्या जातील. त्यामुळे शासनाचा नवीन नियम शेतकऱ्यांच्या मूळावर बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शासनाच्या या धोरणाबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (नगर प्रतिनिधी)नवीन पद्धतीमुळे गावांची संख्या घटलीयापूर्वीच्या नजरअंदाज पाहणीत १ हजार ४४२ गावांची पैसेवारी ६७ पैशांपेक्षा कमी होती. तर फक्त १० गावांची पैसेवारी ६७ पैशांपेक्षा जास्त होती. यानुसार १ हजार ४४२ गावे दुष्काळग्रस्त म्हणून पात्र ठरली असती व त्यानुसार सोयीसवलती शासनाला राबवाव्या लागल्या असत्या. मात्र नवीन ५० पैसेवारीत केवळ ३६७ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी असून १ हजार ८५ गावांची पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे.