शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या

By admin | Updated: January 21, 2017 01:49 IST

केंद्र शासनाच्या किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे,

गडचिरोली : केंद्र शासनाच्या किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सीटूूच्या नेतृत्वात व रमेशचंद्र दहिवडे यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी धरणे आंदोलन केले. केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात २० जानेवारी रोजी देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, ४४ व्या श्रमसंमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले. या संमेलनादरम्यान तीन महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामध्ये योजना कर्मचारी स्वयंसेवक नाही. तर तो कामगार आहे. त्यांनाही किमान वेतन तथा सामाजिक सुरक्षा दिली पहिजे. या ठरावाचा समावेश होता. मात्र काँग्रेस सरकारने या ठरावाकडे दुर्लक्ष केले. भाजपा सरकारनेही काँग्रेस सरकारच्याच पावला पाऊल ठेवत आहे. केंद्र शासनाने पाच वर्षाच्या कार्यकाळात अंगणवाडी महिलांच्या मानधनात एकही वाढ केली नाही. केवळ फसव्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ उज्वला उंदीरवाडे व रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात उपमुख्य कार्यकारी अधिकारी लांबतुरे यांना भेटले व मागण्यांचे निवेदन सादर केले. मागण्यासंदर्भात चर्चा केली असता, स्थानिक स्तरावरील समस्या आपण तत्काळ सोडवू व वरिष्ठ स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. आंदोलनाचे नेतृत्व माया नैनुरवार, आशा कोटांगले, लता कडुकर, मंदा चव्हाण, चंद्रकला कुंभारे, कौशल्या गौरकार, माया शेडमाके, सुमन तोकलवार, ललिता केदार यांनी केले. (नगर प्रतिनिधी) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या अंगणवाडी महिलांना किमान वेतन द्यावे, सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याकरिता पेन्शन प्राव्हिडंट फंड योजनेचा लाभ द्यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्यात, वाढीव मानधनाची थकबाकी तत्काळ द्यावी, १० तारखेच्या आत मानधन द्यावे, अहेरी प्रकल्पातील चार वर्षांपासून थकीत असलेला टी.ए., डी.ए. देण्यात यावा, वाढत्या महागाईनुसार मानधनात वाढ करावी, भ्रष्टाचारी पर्यवेक्षिकांवर कारवाई करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.