शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या

By admin | Updated: January 21, 2017 01:49 IST

केंद्र शासनाच्या किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे,

गडचिरोली : केंद्र शासनाच्या किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार १८ हजार रूपये वेतन देण्यात यावे, या मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सीटूूच्या नेतृत्वात व रमेशचंद्र दहिवडे यांच्या मार्गदर्शनात शुक्रवारी धरणे आंदोलन केले. केंद्र शासनाच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात २० जानेवारी रोजी देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी मार्गदर्शन करताना रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, ४४ व्या श्रमसंमेलनाचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी केले. या संमेलनादरम्यान तीन महत्त्वपूर्ण ठराव पारित करण्यात आले. यामध्ये योजना कर्मचारी स्वयंसेवक नाही. तर तो कामगार आहे. त्यांनाही किमान वेतन तथा सामाजिक सुरक्षा दिली पहिजे. या ठरावाचा समावेश होता. मात्र काँग्रेस सरकारने या ठरावाकडे दुर्लक्ष केले. भाजपा सरकारनेही काँग्रेस सरकारच्याच पावला पाऊल ठेवत आहे. केंद्र शासनाने पाच वर्षाच्या कार्यकाळात अंगणवाडी महिलांच्या मानधनात एकही वाढ केली नाही. केवळ फसव्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करीत आहे, असा आरोप केला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ उज्वला उंदीरवाडे व रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात उपमुख्य कार्यकारी अधिकारी लांबतुरे यांना भेटले व मागण्यांचे निवेदन सादर केले. मागण्यासंदर्भात चर्चा केली असता, स्थानिक स्तरावरील समस्या आपण तत्काळ सोडवू व वरिष्ठ स्तरावरील समस्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. आंदोलनाचे नेतृत्व माया नैनुरवार, आशा कोटांगले, लता कडुकर, मंदा चव्हाण, चंद्रकला कुंभारे, कौशल्या गौरकार, माया शेडमाके, सुमन तोकलवार, ललिता केदार यांनी केले. (नगर प्रतिनिधी) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या अंगणवाडी महिलांना किमान वेतन द्यावे, सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याकरिता पेन्शन प्राव्हिडंट फंड योजनेचा लाभ द्यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भराव्यात, वाढीव मानधनाची थकबाकी तत्काळ द्यावी, १० तारखेच्या आत मानधन द्यावे, अहेरी प्रकल्पातील चार वर्षांपासून थकीत असलेला टी.ए., डी.ए. देण्यात यावा, वाढत्या महागाईनुसार मानधनात वाढ करावी, भ्रष्टाचारी पर्यवेक्षिकांवर कारवाई करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.