शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

शेतकऱ्यांना त्वरित भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

मुलचेरा शिवसेना तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : शिवसेनेतर्फे मुलचेरा तहसीलदारांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या अवकाळी पावसामुळे हाती आलेले पीक नष्ट झाले. वादळी पावसामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकºयांना त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.मुलचेरा शिवसेना तालुका शाखेच्या वतीने सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना शेतकºयांना करावा लागत आहे. अनेक शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना न्याय देणे आवश्यक आहे. प्रशासनाने सदर लाभार्थ्यांची नावे यादीत टाकून सन्मान योजनेचा लाभ द्यावा, केंद्र शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत निम्मी खर्च झाली नाही. त्यामुळे शिल्लक असलेला निधी शेतकऱ्यांना द्यावा. तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत कामे सुरू करून त्वरित शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावे, कामे सुरू केल्यास रोजगारासाठी बाहेर स्थलांतर होणार नाही. अतिवृष्टीमुळे तसेच विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे बराचसा पैसा उपाययोजना करण्यात गेला. त्यामुळे सध्या रबी हंगामासाठी बी-बियाणे व खते खरेदी करण्याकरिता शेतकऱ्यांकडे पैसे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावे तसेच योग्य उपाययोजना कराव्या, पीक विम्याचे पैसे सरसकट शेतकऱ्यांना द्यावे, संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, तसेच हेक्टरी मदत न देता प्रति एकरी मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करावी, शेतकऱ्यांच्या स्थितीचा विचार करून त्वरित उपाययोजना प्रशासनस्तरावरून कराव्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.निवेदन देताना तालुका प्रमुख नीलकमल मंडल, शहर प्रमुख दिगंबर गावडे व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.धानोरा तहसील कार्यालयावर शिवसैनिकांची धडकशिवसेना तालुका शाखा धानोराच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाºयांच्या नावे २५ आॅक्टोबर रोजी सोमवारला निवेदन देण्यात आले. संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम शेतकºयांना त्वरित द्यावी, व्यापारी, सावकारी कर्ज माफ करावे, कृषिपंपाचे वीज बिल माफ करावे, शेतकऱ्यांच्या मुलाची फी माफ करावी, बँकांनी कर्जमाफी होईपर्यंत कर्ज वसुली थांबविण्यात यावी, विद्यार्थी व विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासाची सुविधा मोफत करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर निवेदन तहसीलदार के.वाय.कुनारपवार यांनी स्वीकारले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोद्दार, सुनील पोरेड्डीवार, शिवसेना तालुका प्रमुख चंद्रशेखर उईके, नंदू कुमरे, वासुदेव शेडमाके, मुकेश बोडगेवार, नकूल बोरीकर, उमेश वड्डे, अनिकेत फलके, पुरूषोत्तम चिंचोलकर, प्रेम उंदीरवाडे, माहिन शेख, शोहेब शेख, प्रवीण बोडगेवार, देवराव मोगरकर, तुळशिदास कुकुडकर, प्रशांत धुडसे, विनोेद मेश्राम हजर होते.

टॅग्स :Socialसामाजिक