शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

झालेला खर्च द्या, अन् गाई घेऊन जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2019 05:00 IST

लष्कराच्या फ्रिजवल गाई शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात सोमवारी (दि.१६) येथील वळू माता संगोपन केंद्रात झालेली बैठक कोणत्याही ठोस निष्कर्शाविना संपली. यावेळी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने त्यांच्याकडील गाई शेतकऱ्यांना देण्यासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चापोटी प्रतिगाय १९ हजार ५०० रुपये देण्याची अट टाकली. मात्र पैसे देण्यास शेतकऱ्यांनी ठाम नकार दिला. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यांची एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देफार्मर्स कंपनीची भूमिका : शेतकऱ्यांचा पैसे देण्यास नकार, गाई वाटपाचा निर्णय अधांतरीच

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : लष्कराच्या फ्रिजवल गाई शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात सोमवारी (दि.१६) येथील वळू माता संगोपन केंद्रात झालेली बैठक कोणत्याही ठोस निष्कर्शाविना संपली. यावेळी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने त्यांच्याकडील गाई शेतकऱ्यांना देण्यासाठी आतापर्यंत झालेल्या खर्चापोटी प्रतिगाय १९ हजार ५०० रुपये देण्याची अट टाकली. मात्र पैसे देण्यास शेतकऱ्यांनी ठाम नकार दिला. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी पाच सदस्यांची एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी मिळालेल्या भारतीय लष्कराच्या गायींसंदर्भात निर्णय घेण्यासाठी भागधारक शेतकऱ्यांची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सोमवारी देसाईगंज जवळच्या वळू माता संगोपन केंद्रात आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने तहसीलदार डी.टी.सोनवाने, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त वाय.एस.वंजारी, जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी सचिन भोयर, फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक घनश्याम तिजारे यांच्यासह १०० वर शेतकरी उपस्थित होते.गेल्या ८ ऑगस्ट २०१९ ला पुणे येथे झालेल्या बैठकीत ५०० फ्रिजवल गायी वळू माता संगोपन केंद्र येथे देण्याचे ठरले होते. त्यातील १०० गायी वळू माता केंद्रात आणि ४०० गायी शेतकरी बांधव यांना देण्याचे निश्चित झाले. सदर गायी शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह फार्मर्स ऑफ गोंडवाना प्रोड्युसर कंपनीने प्रस्ताव सादर केला होता. याच कंपनीने गोंडवाना नावाने दुधाचा ब्रँड तयार करणार असल्याचेही प्रस्तावात म्हटले होते. मात्र दोन महिन्याहून जास्त कालावधी उलटूनसुद्धा त्या गायी शेतकऱ्यांना मिळाल्या नाहीत.पशुसंवर्धन उपायुक्त वंजारी यांनी बैठकीचे प्रयोजन सांगितल्यानंतर शेतकºयांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. त्याला कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक उत्तरे मिळाली. कंपनीच्या संचालकांनी कंपनीची ध्येयधोरणे सांगितली. मात्र बहुतांश भागधारक शेतकऱ्यांना शासन आणि कंपनी यांच्या धोरणाबद्दल काहीच माहीत नव्हते. शेतकºयांनी सांगितले की, आमच्या घरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे कर्मचारी येऊन आधार कार्ड मागून घेऊन गेले. गायीची मागणी केल्यावर मात्र नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी कंपनीच्या संचालकांनी आपली बाजू सांगताना शासनाने गायी दिल्यापासून आजपर्यंत प्रत्येक गायीवर वाहतूक आणि चारापाण्याच्या खर्चापोटी प्रत्येक गायीमागे १९,५०० रुपये खर्च झाल्याचे सांगून हे पैसे द्या आणि गायी न्या, अशी भूमिका मांडली. त्यात आणखी दोन-चार हजार रुपये वाढतील, असेही कंपनीने सांगितले. यामुळे चांगलाच गोंधळ झाला. हा प्रस्ताव शेतकºयांनी मान्य केला नाही.पाच सदस्यांची समिती गठितया बैठकीला जिल्हाधिकारी येणार या आशेने बरेच शेतकरी उपस्थित होते. त्या शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाली असून आम्ही एकही रुपया कंपनीला देणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला. शेवटी भागधारक शेतकरी राजेंद्र झरकर, हिरालाल अवसरे, रमेश सुकारे, भाग्यवान पारधी आणि सुधाकर लाडे हे पाच सदस्य असलेली समिती गठित करण्यात आली. ही समिती जिल्हाधिकारी, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक