शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

पाथरगोटावासीयांचा निवडणुकीवर बहिष्कार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 06:00 IST

पाथरगोटा हे गाव पळसगाव ग्रामपंचायतअंतर्गत येते. पाथरगोटा गावातून सहा सदस्य निवडून दिले जातात. पळसगाव ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. पाथरगोटा गावात एकही अनुसूचित जमातीचे कुटुंब नाही. तरीही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असल्याने दरवर्षी अनुसूचित जमातीचाच सरपंच बनते. हा पाथरगोटावासीयांवर अन्याय आहे. पेसा अंतर्गत प्राप्त झालेला निधी केवळ अनुसूचित जमाती असलेल्या प्रभागात म्हणजे पळसगाव येथेच खर्च केला जाते.

ठळक मुद्देविकास कामांमध्ये अन्याय : २५ वर्षांपासून पाठपुरावा; स्वतंत्र ग्रामपंचायतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी/जोगीसाखरा : आरमोरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पाथरगोटा येथील गावकऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा दिला आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचेमार्फत शासनाला पाठविले आहे.पाथरगोटा हे गाव पळसगाव ग्रामपंचायतअंतर्गत येते. पाथरगोटा गावातून सहा सदस्य निवडून दिले जातात. पळसगाव ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येते. पाथरगोटा गावात एकही अनुसूचित जमातीचे कुटुंब नाही. तरीही ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असल्याने दरवर्षी अनुसूचित जमातीचाच सरपंच बनते. हा पाथरगोटावासीयांवर अन्याय आहे. पेसा अंतर्गत प्राप्त झालेला निधी केवळ अनुसूचित जमाती असलेल्या प्रभागात म्हणजे पळसगाव येथेच खर्च केला जाते. त्यामुळे दोन गावांमध्ये अधूनमधून वाद निर्माण होते. ग्रामपंचायतीला प्राप्त होणाºया निधीचे दोन्ही गावांना समान वितरण होणे आवश्यक आहे. मात्र पाथरगोटा गावावर नेहमीच अन्याय केला जाते. पाथरगोटा गावात अजूनही रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी आदी सुविधांचा अभाव आहे. पाथरगोटा हे मोठे गाव आहे. येथील नागरिकांना प्रत्येक कामासाठी तीन किमीची पायपीट करीत पळसगाव येथे जावे लागते.२५ वर्षांपूर्वी पाथरगोटाला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा द्यावा, असा ठराव ग्रामसभेने घेऊन तो शासनाकडे पाठविला. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. पळसगाव गटग्रामपंचायतीत राहून पाथरगोटाचा विकास होणे अशक्य आहे. त्यामुळे २९ मार्च रोजी ग्रामपंचायतसाठी होणाºया मतदानावर सर्व गावकरी बहिष्कार टाकतील, असे ठरविण्यात आले आहे.गावात सभा घेऊन हा निर्णय घेण्यात आला. गावात स्वाक्षरी अभियान राबविले जात असून गावकऱ्यांच्या स्वाक्षºयांचे निवेदन शासनाला पाठविले जाणार आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक