शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

अर्धवट पुलामुळे बसला पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

आठवडाभरापासून अहेरी उपविभागात जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील दोन महिने तुरळक पावसाने गेल्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अहेरी लगतच्या गडअहेरी नाल्यावर कमी उंचीचा पूल असल्याने या भागातील पुलावरून पाणी वाहत आहे.

ठळक मुद्देगडअहेरी नाल्याला भेट; परिसराच्या १२ गावातील संपर्क तुटला

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुका मुख्यालयाजवळ असलेल्या गडअहेरी नाल्यातून भरपूर पाणी वाहत असल्याने परिसराच्या १० ते १२ गावांचा संपर्क तुटला आहे. गडअहेरी येथील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. त्यामुळे पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील गावांचा संपर्क तुटतो. यावर्षीही त्याचा फटका बसला.आठवडाभरापासून अहेरी उपविभागात जोरदार पाऊस येत आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. यावर्षीच्या खरीप हंगामातील दोन महिने तुरळक पावसाने गेल्यानंतर ९ ऑगस्टपासून पावसाने जिल्ह्यात जोर धरला आहे. अहेरी उपविभागातील भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती अद्यापही कायम आहे. अहेरी लगतच्या गडअहेरी नाल्यावर कमी उंचीचा पूल असल्याने या भागातील पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे परिसराच्या १० ते १२ गावातील संपर्क तुटला आहे. ही पूर परिस्थिती पाहण्यासाठी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी गडअहेरी नाल्यावर भेट देऊन माहिती जाणून घेतली.गडअहेरी नाल्यासह परिसरातील नाल्यांना पूर आल्याने या भागातील आवागमन बंद आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पूर परिस्थितीमुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर जाता येत नाही.कमी उंचीच्या पुलामुळे नागरिकांना मागील अनेक वर्षांपासून त्रास सहन करावा लागत आहे. नवीन पुलाचे काम झाल्याशिवाय समस्या दूर होणार नाही. या सर्व गंभीर समस्यांची माहिती जि. प. अध्यक्षांनी याप्रसंगी घेतली. यावेळी अहेरी येथील आदिवासी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :floodपूरRainपाऊस