शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

अखेर मिळाले पंचनाम्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:58 IST

निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही. एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुसरीकडे गडचिरोलीसह राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत होता.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचे तांडव : पीकांच्या नुकसानीची पाहणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच सत्ता स्थापनेत सर्वजण व्यस्त असताना मंगळवार दि.२९ रोजी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने गुरूवारी (दि.३१) हे आदेश जारी केले. त्यामुळे येत्या आठवड्यात पंचनाम्यांना वेग येणार आहे. मात्र पंचनाम्यांना उशिर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होणार का? याबद्दल शंकाही व्यक्त होत आहे.निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही.एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुसरीकडे गडचिरोलीसह राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत होता. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. कापूस, सोयाबीन, धान, तीळ आदी खरिपाची पिके निघण्याच्या मार्गावर असताना अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कमी कालावधीच्या धानाच्या कापलेल्या कडपा पाण्यात भिजत आहेत.सतत आठ दिवस बांधीत पाणी साचून असल्याने सदर धान पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मध्यम कालावधीचे धान परिपक्व झाले आहे. पावसामुळे या धानाची कापणी लांबली आहे. तर जास्त कालावधीचे धान आता निसवले आहे. जोराच्या वादळ वाºयामुळे हे धान जमिनीवर कोसळले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. कापसाचे बोंड फुटले आहेत. पावसात भिजून त्यांचेही नुकसान झाले आहे. हातात आलेले पिक नष्ट होताना बघून शेतकºयाची चिंता वाढली आहे. मात्र निसर्गासमोर हतबल होण्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नसल्याने तो केवळ पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहे.शेतकरी अडचणीत आला असताना मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचीत आमदार सत्ता स्थापनेच्या कामात व्यस्त आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या लागल्या. आता दिवाळीच्या सुट्या संपल्या असल्या तरी अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयांमध्ये रूजू झालेले नाहीत. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान होऊनही पंचनामे होऊ शकले नाही.आपल्या कार्यक्षेत्रात नुकसान झाल्याचे माहित असतानाही अनेक कर्मचारी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे अनेकांनी अजूनही पंचनामे केले नाही. पंचनाम्यांना उशीर झाल्यास मदत मिळण्यास विलंब होणार हे सत्य आहे. निवडणुकीत मते मागण्यासाठी शेतकऱ्यांबाबत कळवळा दाखविणारे सरकार निवडणुकीनंतर मात्र आपले कर्तव्य विसरते हेच यावरून दिसून येते.-तर शेतकरी राहतील मदतीपासून वंचितमागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळवाºयासह पाऊस होत आहे. तसेच खरीप पिके निघण्याच्या मार्गावर असताना पाऊस आल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कुठेही ‘अतिवृष्टी’ झालेली नाही. मात्र राज्याच्या महसूल व वनविभागाने २९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या पत्रात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ ऑक्टोबर रोजी काढलेल्या पत्रात ऑक्टोबरमध्ये ‘अतिवृष्टी’मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे या संभ्रमाचे वातावरण आहे. या पत्राचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही, त्या ठिकाणी काहीच नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी