शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

अखेर मिळाले पंचनाम्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:58 IST

निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही. एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुसरीकडे गडचिरोलीसह राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत होता.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचे तांडव : पीकांच्या नुकसानीची पाहणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच सत्ता स्थापनेत सर्वजण व्यस्त असताना मंगळवार दि.२९ रोजी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने गुरूवारी (दि.३१) हे आदेश जारी केले. त्यामुळे येत्या आठवड्यात पंचनाम्यांना वेग येणार आहे. मात्र पंचनाम्यांना उशिर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होणार का? याबद्दल शंकाही व्यक्त होत आहे.निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही.एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुसरीकडे गडचिरोलीसह राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत होता. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. कापूस, सोयाबीन, धान, तीळ आदी खरिपाची पिके निघण्याच्या मार्गावर असताना अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कमी कालावधीच्या धानाच्या कापलेल्या कडपा पाण्यात भिजत आहेत.सतत आठ दिवस बांधीत पाणी साचून असल्याने सदर धान पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मध्यम कालावधीचे धान परिपक्व झाले आहे. पावसामुळे या धानाची कापणी लांबली आहे. तर जास्त कालावधीचे धान आता निसवले आहे. जोराच्या वादळ वाºयामुळे हे धान जमिनीवर कोसळले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. कापसाचे बोंड फुटले आहेत. पावसात भिजून त्यांचेही नुकसान झाले आहे. हातात आलेले पिक नष्ट होताना बघून शेतकºयाची चिंता वाढली आहे. मात्र निसर्गासमोर हतबल होण्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नसल्याने तो केवळ पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहे.शेतकरी अडचणीत आला असताना मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचीत आमदार सत्ता स्थापनेच्या कामात व्यस्त आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या लागल्या. आता दिवाळीच्या सुट्या संपल्या असल्या तरी अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयांमध्ये रूजू झालेले नाहीत. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान होऊनही पंचनामे होऊ शकले नाही.आपल्या कार्यक्षेत्रात नुकसान झाल्याचे माहित असतानाही अनेक कर्मचारी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे अनेकांनी अजूनही पंचनामे केले नाही. पंचनाम्यांना उशीर झाल्यास मदत मिळण्यास विलंब होणार हे सत्य आहे. निवडणुकीत मते मागण्यासाठी शेतकऱ्यांबाबत कळवळा दाखविणारे सरकार निवडणुकीनंतर मात्र आपले कर्तव्य विसरते हेच यावरून दिसून येते.-तर शेतकरी राहतील मदतीपासून वंचितमागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळवाºयासह पाऊस होत आहे. तसेच खरीप पिके निघण्याच्या मार्गावर असताना पाऊस आल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कुठेही ‘अतिवृष्टी’ झालेली नाही. मात्र राज्याच्या महसूल व वनविभागाने २९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या पत्रात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ ऑक्टोबर रोजी काढलेल्या पत्रात ऑक्टोबरमध्ये ‘अतिवृष्टी’मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे या संभ्रमाचे वातावरण आहे. या पत्राचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही, त्या ठिकाणी काहीच नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी