शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

अखेर मिळाले पंचनाम्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 23:58 IST

निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही. एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुसरीकडे गडचिरोलीसह राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत होता.

ठळक मुद्देअवकाळी पावसाचे तांडव : पीकांच्या नुकसानीची पाहणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागताच सत्ता स्थापनेत सर्वजण व्यस्त असताना मंगळवार दि.२९ रोजी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने गुरूवारी (दि.३१) हे आदेश जारी केले. त्यामुळे येत्या आठवड्यात पंचनाम्यांना वेग येणार आहे. मात्र पंचनाम्यांना उशिर होत असल्यामुळे शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होणार का? याबद्दल शंकाही व्यक्त होत आहे.निवडणुकीच्या थकव्याने प्रशासकीय अधिकारी सध्या दिवाळीच्या सुट्यांमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस शेतातील पीकांचे नुकसान करीत असतानाही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तातडीने निघू शकले नाही.एकीकडे निवडणूक निकाल लागताच दुसरीकडे गडचिरोलीसह राज्यात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत होता. पावसाचा जोर अजूनही कायम आहे. कापूस, सोयाबीन, धान, तीळ आदी खरिपाची पिके निघण्याच्या मार्गावर असताना अधूनमधून पाऊस कोसळत असल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कमी कालावधीच्या धानाच्या कापलेल्या कडपा पाण्यात भिजत आहेत.सतत आठ दिवस बांधीत पाणी साचून असल्याने सदर धान पूर्णपणे नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मध्यम कालावधीचे धान परिपक्व झाले आहे. पावसामुळे या धानाची कापणी लांबली आहे. तर जास्त कालावधीचे धान आता निसवले आहे. जोराच्या वादळ वाºयामुळे हे धान जमिनीवर कोसळले आहे. त्यामुळे याही धानाच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. कापसाचे बोंड फुटले आहेत. पावसात भिजून त्यांचेही नुकसान झाले आहे. हातात आलेले पिक नष्ट होताना बघून शेतकºयाची चिंता वाढली आहे. मात्र निसर्गासमोर हतबल होण्याशिवाय त्याच्याकडे काहीच पर्याय नसल्याने तो केवळ पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करीत आहे.शेतकरी अडचणीत आला असताना मुख्यमंत्र्यांसह नवनिर्वाचीत आमदार सत्ता स्थापनेच्या कामात व्यस्त आहेत. २४ ऑक्टोबरपर्यंत प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त होते. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या लागल्या. आता दिवाळीच्या सुट्या संपल्या असल्या तरी अनेक अधिकारी व कर्मचारी कार्यालयांमध्ये रूजू झालेले नाहीत. अशा परिस्थितीत पिकांचे नुकसान होऊनही पंचनामे होऊ शकले नाही.आपल्या कार्यक्षेत्रात नुकसान झाल्याचे माहित असतानाही अनेक कर्मचारी शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा करीत होते. त्यामुळे अनेकांनी अजूनही पंचनामे केले नाही. पंचनाम्यांना उशीर झाल्यास मदत मिळण्यास विलंब होणार हे सत्य आहे. निवडणुकीत मते मागण्यासाठी शेतकऱ्यांबाबत कळवळा दाखविणारे सरकार निवडणुकीनंतर मात्र आपले कर्तव्य विसरते हेच यावरून दिसून येते.-तर शेतकरी राहतील मदतीपासून वंचितमागील आठ दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. वादळवाºयासह पाऊस होत आहे. तसेच खरीप पिके निघण्याच्या मार्गावर असताना पाऊस आल्याने पिकांचे मोठे नुकसान होत आहे. मात्र कुठेही ‘अतिवृष्टी’ झालेली नाही. मात्र राज्याच्या महसूल व वनविभागाने २९ ऑक्टोबर रोजी काढलेल्या पत्रात, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाने ३१ ऑक्टोबर रोजी काढलेल्या पत्रात ऑक्टोबरमध्ये ‘अतिवृष्टी’मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे, असे म्हटले आहे. त्यामुळे या संभ्रमाचे वातावरण आहे. या पत्राचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांनी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही, त्या ठिकाणी काहीच नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाकडे पाठविल्यास शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी