शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

हे पाहा जावयाचे लाड, शासकीय कार्यालयांकडे अडीच काेटी बिल थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 5:00 AM

महापारेषण व इतर खासगी कंपन्यांकडून महवितरण नगदी स्वरूपात वीज खरेदी करते. मात्र, ग्राहकांना महिनाभर वीज पुरवठा केल्यानंतर वीजबिल पाठविले जाते. काही ग्राहक नियमितपणे वीजबिल भरतात. मात्र, काही ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. विजेची थकबाकी वाढल्याने महावितरणचा आर्थिक डाेलारा काेसळण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज पुरवठ्याची कामे करण्याबराेबरच वीजबिल वसुलीची जबाबदारीसुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर साेपविली आहे.

लाेकमत न्यूजन नेटवर्कगडचिराेली : सर्वसामान्य नागरिक महिनाभराचे वीजबिल भरले नाही तर त्याचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी सूचना देतात. मात्र, शासकीय कार्यालयांकडेसुद्धा महावितरणची थकबाकी सुमारे अडीच काेटी रुपये आहे. मात्र अजूनपर्यंत शासकीय कार्यालयाची वीज कापल्याचे ऐकिवात नाही. महापारेषण व इतर खासगी कंपन्यांकडून महवितरण नगदी स्वरूपात वीज खरेदी करते. मात्र, ग्राहकांना महिनाभर वीज पुरवठा केल्यानंतर वीजबिल पाठविले जाते. काही ग्राहक नियमितपणे वीजबिल भरतात. मात्र, काही ग्राहक याकडे दुर्लक्ष करतात. विजेची थकबाकी वाढल्याने महावितरणचा आर्थिक डाेलारा काेसळण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज पुरवठ्याची कामे करण्याबराेबरच वीजबिल वसुलीची जबाबदारीसुद्धा महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर साेपविली आहे. शासकीय कार्यालयांना खर्चासाठी वर्षातून एकदा अनुदान मिळते. त्यामुळे शासकीय कार्यालयांना तर वर्षभर उधार वीज द्यावी लागते. खर्च व उत्पन्न यांचा व्यवस्थित ताळमेळ जाेडत नसल्याने दिवंसेदिवस महावितरणची आर्थिक स्थिती अतिशय वाईट हाेत चालली आहे. ही स्थिती वेळीच सावरण्यासाठी वेळेवर वीज बिलांची वसुली हाेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.

शासकीय कार्यालयांची वीज का कापत नाही? सामान्य नागरिकांना त्रस्त करून साेडणारी महावितरण शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा का खंडित करत नाही, असा प्रश्न आहे. शासकीय कार्यालयासाठी लागणारे इतर साहित्य ज्याप्रमाणे नगदी स्वरूपात आणले जातात. तसेच वीजबिलासाठीही अगाेदरच अनुदानाची तरतूद करण्याची गरज आहे. महावितरण ही शासकीय कंपनी आहे. महावितरणने शासनाला सवय लावण्याची गरज आहे.

शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा अपव्यय

-    शासकीय कार्यालयांचे वीजबिल भरण्याची जबाबदारी शासनाकडे राहते. त्यामुळे शासकीय कार्यालयांमध्ये विजेचा माेठ्या प्रमाणात अपव्यय केला जाते. 

-    लाईट, पंखे, एसी व इतर उपकरणे अनावश्यक सुरू ठेवली जातात. अनेक अधिकारी घरी कूलरमध्ये राहतात. मात्र कार्यालयात एसीचा वापर करतात. अनुदानापेक्षा वीजबिल अधिक झाल्यानंतर पुन्हा अडचण वाढते.

२ काेटी ५२ लाख थकलेजिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांकडे सुमारे २ काेटी ५२ लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. वेळाेवेळी सूचना देऊन अनुदान नसल्याच्या कारणास्तव वीजबिल भरले जात नाही. ही गंभीर बाब आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज