शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी धानपीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 01:30 IST

तोंडाजवळ आलेला हातातला घास कुणी हिसकावून न्यावा, अगदी तशीच अवस्था जिल्ह्यातील गावांमध्ये झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे जड व मध्यम प्रतीचे धानपीक पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंताग्रस्त : देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव परिसरातील पीक

लोकमत न्यूज नेटवर्कविसोरा : तोंडाजवळ आलेला हातातला घास कुणी हिसकावून न्यावा, अगदी तशीच अवस्था जिल्ह्यातील गावांमध्ये झाली आहे. देसाईगंज तालुक्यातील विहीरगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे जड व मध्यम प्रतीचे धानपीक पाण्याअभावी करपण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.सप्टेंबर महिन्याच्या २० तारखेला पाऊस झाला. हा दिवस वगळता संपूर्ण म्हिना कोरडा गेला. त्यामुळे येथील शेतातल्या धानाला सिंचन सुविधा होऊ शकली नाही परिणामी धान करपले. धान करपल्याने बळीराजा नि:शब्द असून सरकारने मदत देण्याची मागणी विहीरगावच्या शेतकऱ्यांकडून होत आहे.खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतकरी बांधव धानपिकाची रास येईपर्यंतच्या संपूर्ण खर्चाचा हिशोब करून आधीच जुळवाजुळव करण्याचा जिवतोड प्रयत्न करतो. त्यासाठी मागील हंगामातील धान विकणे, रब्बी पीक विकणे, बँकेचे कर्ज अशा पद्धतीने पैसे उभारून पेरणी पूर्व मशागत, सेंद्रिय खत टाकणे, नांगरणी, बी-बियाणे खरेदी, पेरणी, रासायनिक खत टाकणे, चिखलणी, मजुरांची तजवीज, रोवणी, पुन्हा कीटकनाशक फवारणी, निंदण करीत असतो. या दरम्यान पाऊस नसल्यास पाण्यासाठी कृषिपंप, डिझेल इंजिनची व्यवस्था करणे, कापणी, बांधणी, मळणी यंत्र शोधून मळणी करणे आणि अखेर धान रास घरी आणणे.यासर्व प्रक्रियेतून गेल्यावर धानपीक हातात येते. मात्र या टप्प्यात पावसाने दडी मारल्यास, अतिवृष्टीने बुडाल्यास, रोगाने पीक नष्ट झाल्यास धानावर केलेला हजारो रुपयांचा खर्च तोट्यात जातो. अगदी हीच परिस्थिती तालुक्यातील पूर्वेकडील विहीरगाव व परिसरात दिूसन येत आहे. आॅगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत पावसाने योग्य साथ दिली. त्यामुळे धान जोमात होता परंतु पूर्ण सप्टेंबर महिन्यात २० तारखेचा उत्तरा नक्षत्राचा पाऊस वगळल्यास सप्टेंबर महिना पावसाविना गेला. याचा प्रतिकूल परिणाम धानावर झाला.देसाईगंज तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात सिंचन सुविधा न होऊ शकल्याने हजारो रुपये खर्चून जपलेले धानपीक डोळ्यादेखत करपल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी विहीरगावच्या शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस