शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

अवकाळी पावसाने भिजले केंद्रावरचे धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

धानाच्या मळणीला सुरूवात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आकस्मिक स्थितीत धान ठेवण्यासाठी शेडही तयार केले आहे. मात्र धानाची आवक वाढल्याने सदर शेड सुध्दा अपुरे पडत आहे. परिणामी काही धान उघड्यावरच ठेवले आहे.

ठळक मुद्देचामोर्शीत दमदार पाऊस : शेतकऱ्यांना बसणार फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहरात गुरूवारी रात्री झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेकडो शेतकऱ्यांचे धान ओलेचिंब झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.धानाच्या मळणीला सुरूवात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आकस्मिक स्थितीत धान ठेवण्यासाठी शेडही तयार केले आहे. मात्र धानाची आवक वाढल्याने सदर शेड सुध्दा अपुरे पडत आहे. परिणामी काही धान उघड्यावरच ठेवले आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. काही शेतकऱ्यांनी ताडपत्री झाकून धानाच्या पोत्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अपुरा ठरला. बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पाण्यात भिजले. जोपर्यंत लिलाव होऊन काटा होत नाही, तोपर्यंत सदर धानाची जबाबदारी शेतकऱ्याची राहते. अनेक शेतकऱ्यांच्या धानाचे लिलाव व काटे सुध्दा झाले नाहीत. धान भिजलेल्याचा तोटा शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे. मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणू नये, असे सूचना फलक कृषी उत्पन्न बाजार समितीने लावले आहे.पावसामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंदआदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत ५० पेक्षा अधिक आधारभूत धान खेरेदी केंद्र चालविले जात आहेत. मागील १५ दिवसांपासून धान खरेदीला वेग आला होता. मात्र मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तसेच गुरूवारी व शुक्रवारी जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पाऊसही झाला. काही शेतकऱ्यांचे धान अजूनही केंद्रावच आहे. अवकाळी पावसाने धान भिजले. जोपर्यंत धानाचा काटा होत नाही, तोपर्यंत धानाची जबाबदारी शेतकऱ्याची राहते. भिजलेले धान खरेदी करण्यास नकार दिल्यास याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्तता आहे. नवीन धान ेकेंद्रावर आणण्यास मनाई करावी मात्र जेवढे धान शेतकऱ्यांनी केंद्रावर आणले आहे. त्याचा काटा करून ते गोदामात ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसMarket Yardमार्केट यार्ड