शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने भिजले केंद्रावरचे धान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 06:00 IST

धानाच्या मळणीला सुरूवात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आकस्मिक स्थितीत धान ठेवण्यासाठी शेडही तयार केले आहे. मात्र धानाची आवक वाढल्याने सदर शेड सुध्दा अपुरे पडत आहे. परिणामी काही धान उघड्यावरच ठेवले आहे.

ठळक मुद्देचामोर्शीत दमदार पाऊस : शेतकऱ्यांना बसणार फटका

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : चामोर्शी शहरात गुरूवारी रात्री झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेकडो शेतकऱ्यांचे धान ओलेचिंब झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.धानाच्या मळणीला सुरूवात झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आकस्मिक स्थितीत धान ठेवण्यासाठी शेडही तयार केले आहे. मात्र धानाची आवक वाढल्याने सदर शेड सुध्दा अपुरे पडत आहे. परिणामी काही धान उघड्यावरच ठेवले आहे. गुरूवारी रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. काही शेतकऱ्यांनी ताडपत्री झाकून धानाच्या पोत्यांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न अपुरा ठरला. बऱ्याच शेतकऱ्यांचे धान पाण्यात भिजले. जोपर्यंत लिलाव होऊन काटा होत नाही, तोपर्यंत सदर धानाची जबाबदारी शेतकऱ्याची राहते. अनेक शेतकऱ्यांच्या धानाचे लिलाव व काटे सुध्दा झाले नाहीत. धान भिजलेल्याचा तोटा शेतकऱ्यांनाच सहन करावा लागणार आहे. मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणू नये, असे सूचना फलक कृषी उत्पन्न बाजार समितीने लावले आहे.पावसामुळे आधारभूत धान खरेदी केंद्र बंदआदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत ५० पेक्षा अधिक आधारभूत धान खेरेदी केंद्र चालविले जात आहेत. मागील १५ दिवसांपासून धान खरेदीला वेग आला होता. मात्र मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. तसेच गुरूवारी व शुक्रवारी जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पाऊसही झाला. काही शेतकऱ्यांचे धान अजूनही केंद्रावच आहे. अवकाळी पावसाने धान भिजले. जोपर्यंत धानाचा काटा होत नाही, तोपर्यंत धानाची जबाबदारी शेतकऱ्याची राहते. भिजलेले धान खरेदी करण्यास नकार दिल्यास याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्तता आहे. नवीन धान ेकेंद्रावर आणण्यास मनाई करावी मात्र जेवढे धान शेतकऱ्यांनी केंद्रावर आणले आहे. त्याचा काटा करून ते गोदामात ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

टॅग्स :RainपाऊसMarket Yardमार्केट यार्ड