शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

३ पासून धान खरेदी केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट हे पाच उपप्रादेशिक कार्यालय आहे. या पाचही उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५० वर आविका संस्था संलग्नित आहेत. या संस्थांमार्फत दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत भावानुसार धानाची खरेदी केली जाते.

ठळक मुद्देकार्यवाही अंतिम टप्प्यात : आदिवासी विकास महामंडळाच्या ५० केंद्रांना मंजुरी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विकास कार्यकारी (आविका) संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी धान खरेदी केली जाते. खरीप हंगाम २०१९-२० या हंगामात विकेंद्रीत खरेदी योजनेअंतर्गत धानाची खरेदी करण्यासाठी महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयातर्फे ५१ केंद्रांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. यापैकी ५० केंद्र मंजूर करण्यात आल्याची माहिती आहे. सदर ५० केंद्र ३ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट हे पाच उपप्रादेशिक कार्यालय आहे. या पाचही उपप्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ५० वर आविका संस्था संलग्नित आहेत. या संस्थांमार्फत दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत भावानुसार धानाची खरेदी केली जाते.गडचिरोली जिल्ह्यात हलके, मध्यम व जड या तीन प्रतीच्या धानपिकाची लागवड केली जाते. दिवाळी सणापासून हलक्या धानाची कापणी व बांधणीचे काम सुरू आहे. काही शेतकऱ्यांच्या धानाची कापणी व बांधणीचे काम आटोपले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊस बरसत असल्याने शेतकºयांची चिंता वाढली आहे. काही शेतकऱ्यांच्या हलक्या धानाचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी लगबगीने बांधणी करून पुंजने टाकले. मळणीनंतर हलक्या धानाची शेतकरी विक्री करीत असतात. मात्र अवकाळी पावसाची स्थिती कायम असल्याने शेतकरी सध्या तरी मळणीचे काम हाती घेणार नाही. परिणामी हलक्या धानाच्या खरेदीच्या हंगामास यावर्षी उशिरा सुरूवात होणार आहे.आसमानी संकट मिटल्याशिवाय जिल्ह्यातील शेतकरी मळणी करून हलक्या प्रतीचे धान आविका संस्थेच्या केंद्रावर आणणार नाही. असे असले तरी खरीप हंगामात धानाची खरेदी करण्यासाठी आदिवासी विकास महामंडळासह आविका संस्थांनी कार्यवाही पूर्ण केली आहे.साधारणत: ३ नोव्हेंबरपासून कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा, घोट आदी तालुक्यातील धान खरेदी केंद्र टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. हलक्या प्रतीच्या धानाचे पीक प्रामुख्याने आरमोरी, कुरखेडा तसेच कोरची तालुक्यात घेतले जाते. जिल्ह्याच्या दक्षिण भागात म्हणजे अहेरी उपविभागात तसेच गडचिरोली व चामोर्शी तालुक्यात मध्यम व जड प्रतीच्या धानाचे पीक अधिकाधिक घेतले जाते. धान खरेदी केंद्र लवकर सुरू न झाल्यास शेतकºयांना आपला धान व्यापाऱ्यांना विकून आर्थिक अडचण भागवावी लागणार आहे.यंदा धानाच्या भावात ६५ रुपयांनी वाढशासनाने यंदा धानाचा हमीभाव जाहीर केला असून मागील वर्षीच्या तुलनेत धानाच्या भावात ६५ रुपयांनी वाढ केली आहे. यावर्षी सर्वसाधारण धानाला प्रतीक्विंटल १ हजार ८३५ रुपये हमीभाव जाहीर केला असून याच दराने आदिवासी विकास महामंडळ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने खरेदी केंद्रावर धानाची खरेदी करण्यात येणार आहे. गतवर्षी महामंडळाच्या केंद्रावर साधारण धानाला प्रतिक्विंटल १ हजार ७५० रुपये भाव देण्यात आला होता. धानाचा भाव वाढल्याबाबतचा शासन निर्णय ९ सप्टेंबर २०१९ रोजी राज्य शासनाने निर्गमित केला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड