शहरं
Join us  
Trending Stories
1
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
2
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
3
२९ महानगरपालिकांचे विरोधक आहे तरी कोण हेच कळेना! महायुती, मविआचेही तीनतेरा
4
२०२६ मध्ये निफ्टी ३२,००० आणि सेन्सेक्स १,०७,००० च्या पातळीवर पोहोचू शकतो; काय आहे ब्रोकरेजचं टार्गेट?
5
महापालिका निवडणूक 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) भाजपासोबत! काँग्रेस पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी; शिंदेसेना, उद्धवसेना, वंचितचे 'एकला चलो रे'
6
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
7
आमदारांच्या कुटुंबातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह; माघार घेणार?
8
सावधान! स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
9
Stock Market Today: नव्या सीरिजची दमदार सुरुवात; Sensex २०० अंकांनी वधारला, मेटल शेअर्समध्ये मोठी तेजी
10
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
11
१० वर्षांपासून रखडलेली ८०सी ची मर्यादा यंदा वाढणार का? पाहा काय आहेत प्रमुख मागण्या
12
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
13
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
14
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
15
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
16
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
17
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
18
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
19
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
20
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदी बंदने वाताहत

By admin | Updated: May 27, 2014 00:51 IST

पूर्व विदर्भातील धान पिकाचे मागील हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते. खरीप पिकात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्‍यांनी उन्हाळी धान पिकाची

 शेतकरी अडचणीत : उन्हाळी धान विक्री करण्याचे संकट

गडचिरोली : पूर्व विदर्भातील धान पिकाचे मागील हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले होते. खरीप पिकात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकर्‍यांनी उन्हाळी धान पिकाची लागवड केली. सध्या उन्हाळी धान पिकाचे उत्पादन निघत असतांनाच राज्य शासनाने ८ मे रोजीच्या शासन निर्णयानूसार १५ मे पासून शासकीय धान खरेदी केंद्र बंद करण्याचे निर्देश दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे उन्हाळी धान पिकाची विक्री कुठे करावी, असा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे. खरीप पिकात झालेले पिकाचे नुकसान उन्हाळी पिकात भरून काढण्याच्या विवंचनेत शेतकरी असतांना धान्य खरेदी केंद्र बंद करण्याच्या शासनाच्या आदेशामुळे शेतकर्‍यांच्या धानाला योग्य भाव मिळणे कठीण झाले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शासनाने धानाला बोनस जाहीर केला होता. परंतु आता उन्हाळी धान पिकाला हमी भावही मिळत नसल्याने राज्य शासनाचे धान उत्पादकांविषयी असलेले दुटप्पी धोरण पुढे येत आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये उन्हाळी धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या उन्हाळी पीक अंतिम टप्प्यात असतांना शासनाच्या ८ मे रोजीच्या निर्णयाने धान उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा मावळल्या आहेत. शासनाच्या या निर्णयानूसार १५ मे २०१४ पासून शासकीय धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकर्‍यांचे किती प्रमाणात नुकसान झाले हे प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते अशावेळी उन्हाळी धान पिकाच्या माध्यमातून शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती स्थिर करण्याचा प्रयत्न उन्हाळी पिकांमधून केला जाणार होता. परंतु ऐनवेळी काढलेल्या शासन निर्णयामुळे धान उत्पादक शेतकर्‍यांच्या मुलभूत हक्कांवरच शासनाने आघात केला आहे. १८ आॅक्टोबरच्या शासन निर्णयानूसार ३० जूनपर्यंत शासकीय धान खरेदी केंद्र सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. हे आदेश कायम असतांना ८ मे रोजी आचार संहितेदरम्यान काढलेला शासन निर्णयही न उलगडणारे कोडेच आहे. उन्हाळी धान पिकातून शासकीय हमी भावासह बोनसच्या अपेक्षा शेतकर्‍यांना होत्या. शासनाचे ११ आॅक्टोबरचे आदेशही तसेच होते. परंतु ऐनवेळी काढलेल्या आदेशामुळे धान उत्पादक शेतकर्‍यांसमोरील समस्या वाढल्या आहेत. सद्यस्थितीत धानाला १३१० रूपये हमीभाव असतांना १ हजार ते ११०० रूपयांच्या अत्यल्प दरात धान्य विक्री करावी लागते. शासनाने निवडणुका तोंडावर असतांना १८ फेब्रुवारीला २०१३-१४ च्या खरीप हंगामासाठी २०० रूपये बोनस जाहीर केल्याने उन्हाळी धान पिकासाठी शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु निवडणुका संपताच शासनाने घुमजाव करीत धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले. यावरून शासनाचे धान उत्पादक शेतकर्‍यांविषयी असलेले धोरण लक्षात येते. महत्वाची बाब म्हणजे शासनाने बोनसही खरीप हंगामाच्या ३ महिन्यानंतर जाहीर केला होता. त्यामुळे बोनसचा लाभ अत्यल्प धान उत्पादक शेतकर्‍यांना झाला. उन्हाळी धान पिकाच्या माध्यमातून आर्थिक बळकटीच्या आशा शेतकर्‍यांना असतांना शासनाने धान उत्पादकांच्या आशेवर पाणी फेरले. त्यामुळे शासनाच्या धोरणाचा फटका शेतकर्‍यांना बसणार आहे.