शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाहन उलटून १८ जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ककोडी येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी २३ जनावरे टीएस-३१-टीओ-७०३ या क्रमांकाच्या सहाचाकी कंटेनर ट्रकमध्ये कोंबून नेली जात होती. दरम्यान भीमपूर नाल्याच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात १८ जनावरे जागीच ठार झाले तर जीवंत पाच पैकी दोन जनावरे गंभीर जखमी झाले.

ठळक मुद्देकत्तलीसाठी हैदराबादकडे जात होती : भीमपूर नाल्याच्या वळणावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कत्तलीसाठी हैदराबाद येथे जनावरे नेणारे वाहन उलटल्याने या अपघातात १८ जनावरे जागीच ठार तर दोन जनावरे गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास कोरचीपासून तीन किमी अंतरावर असलेल्या भीमपूर नाल्याच्या वळणावर घडली.गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ककोडी येथून हैदराबाद येथे कत्तलीसाठी २३ जनावरे टीएस-३१-टीओ-७०३ या क्रमांकाच्या सहाचाकी कंटेनर ट्रकमध्ये कोंबून नेली जात होती. दरम्यान भीमपूर नाल्याच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात १८ जनावरे जागीच ठार झाले तर जीवंत पाच पैकी दोन जनावरे गंभीर जखमी झाले. सदर बैलाचे मालक व व्यापारी नागपूर येथील असल्याची माहिती आहे. या घटनेसंदर्भात कोरची पोलीस ठाण्यात वाहनचालक फारूख शेख, नासिर शेख रा.बल्लारपूर (चंद्रपूर) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे सोबत असलेले दोन आरोपी घटनास्थळावरून फरार झाले आहेत. त्यांच्या विरोधातही कोरची पोलीस ठाण्यात ५ नोव्हेंबर रोजी भादंविचे कलम २७९, ४२७, ९, ११, ५ (अ) (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.इमरान शेख रा.गडचांदूर असे वाहन मालकाचे नाव आहे. भीमपूर गावाजवळ विरूद्ध दिशेने येत असलेल्या चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रोडखाली उतरून शेतशिवारात घुसला.अपघात झाल्याचे कळताच कोरचीच्या पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळ गाठले. जखमी झालेल्या ट्रकचालक व वाहकाला त्यांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर वाहनामध्ये मृत पावलेल्या जनावरांना जेसीबीच्या सहाय्याने व लोकांच्या मदतीने ट्रकच्या बाहेर काढण्यात आले.मृत जनावरांचे भीमपूर जंगल परिसरात नेऊन शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेवगडे, डॉ.खंडाते, डॉ.गावित, डॉ.दुधकुवर यांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडली. जखमी असलेल्या जनावरावर औषधोपचार करून त्यांना कोंडवाड्यात ठेवण्यात आले. सदर घटनेचा अधिक तपास प्रभारी पोलीस अधिकारी विनोद गोडबोले करीत आहेत.यापूर्वीही ट्रक फसल्याने २५ जनावरे बचावलीयापूर्वी कोरची तालुक्यातून ट्रकमधून २५ जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक सुरू होती. सदर ट्रक गुप्तेकसा गावाजवळ फसला. त्यावेळी लोकांनी पुढाकार घेऊन येथील जनावरे पकडली व त्यांची सुटका केली. याशिवाय कोरची येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बोरी येथील अवैध कत्तीसाठी जाणाऱ्या जनावरांना सापळा रचून जनावरांनी भरलेले दोन ट्रक पकडले होते. या दोन्ही प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आरोपीविरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही हा प्रकार थांबलेला नाही.२५ ठाण्यांची हद्द पार करून जनावरांची तस्करीकोरची तालुक्यातील बोरी, घुगवा, बोटेकसा, कोटरा तसेच कोरची पोलीस ठाण्याच्या सीमेलगत असलेल्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोकोडी, चिपोटा, मांगाटोला हे नागपूर येथील कसायांचे माहेरघर आहे. दररोज एक ते दोन ट्रक भरून येथून जनावरे कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या तीन जिल्ह्यातील २५ पेक्षा अधिक पोलीस स्टेशनची हद्द ओलांडून जनावरे हैदराबादपर्यंत नेली जातात.आम्ही हजार रुपये मजुरीने शेख या जनावर तस्कराकडे काम करतो, मिसपिरीवरून जनावरे वाहनात टाकून कोरची, कुरखेडा, देसाईगंज, नागभिड, सिंदेवाही, मूल, चंद्रपूर ते आंध्रप्रदेशाच्या सीमेपर्यंत नेऊन देण्याचे काम आमच्याकडे आहे, असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या वाहनचालकाने पोलिसांना सांगितले. आंध्रप्रदेशाच्या सीमेवरून दुसºया वाहनाच्या सहाय्याने जनावरे हैदराबादला नेले जातात, अशी माहिती त्याने पोलिसांनी दिली.कोरची तालुक्यातून दुवा, बोरी, कोटगूल तसेच गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड तसेच छत्तीसगडमधील दिसपूर येथून अवैधरित्या नागपूर तसेच हैदराबादकडे कत्तलीसाठी पाळीव जनावरांची तस्करी केली जाते. शेकडो गायी, बैल कसायाच्या तावडीत सापडत असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Accidentअपघात