शहरं
Join us  
Trending Stories
1
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
2
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
3
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
4
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
5
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
6
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
7
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
8
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
9
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
10
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
11
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
12
मराठी कलाकारांसमोर राज ठाकरेंकडून बॉलिवूडच्या ए.आर.रहमानचं कौतुक, सांगितला 'तो' प्रसंग
13
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
14
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं," उद्धव ठाकरेंचं सूचक विधान
15
Raj Thackeray : जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
16
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
17
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
18
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
19
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
20
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहरत असलेले पीक काही भागात पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. प्रत्यक्षात या पिकास सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु पिकाच्या सुरुवातीच्या काळात जास्त पाऊस पडल्यामुळे पीक पिवळे पडत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा फवारणीवर भर : धान उत्पादक शेतकऱ्यांकडे तणनाशक फवारणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या काही भागातील सोयाबीन पीक पिवळे पडत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा पिकांवरील रोग नसून, सुरुवातीला या पिकाला कमी पाण्याची आवश्यकता असताना काही भागात पावसाचे पाणी शेतात साचल्याने पीके पिवळे पडत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. उगवलेल्या सोयाबिन पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहरत असलेले पीक काही भागात पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. प्रत्यक्षात या पिकास सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु पिकाच्या सुरुवातीच्या काळात जास्त पाऊस पडल्यामुळे पीक पिवळे पडत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारावर नियंत्रणासाठी शेतात साचत असलेले पाणी बाहेर काढावे. यामुळे पिकाचे संरक्षण होईल, शिवाय पिकाची चांगली वाढही होईल, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.चामोर्शी व आरमोरी तालुक्यात धान शेतीसोबतच सोयाबीन पिकाची शेती प्राधान्याने केली जात आहे. वैरागड भागात यंदा सोयाबीनची पेरणी बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आहे. सोयाबीन पिकाच्या शेतीला धानाच्या तुलनेत लागवडीचा खर्च कमी येत असल्याने अनेक शेतकरी आता सोयाबीन पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. पेरणी झाल्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस बरसला. सोयाबीनचे पीक उगवले असून त्यावर रोग दिसून येत आहे.९३ हेक्टर क्षेत्रात उगवले सोयाबीनचे पीकगडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळूण एकूण २७१ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीन पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ९३ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, सिरोंचा या तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. वैरागड परिसरातील शेतजमीन सोयाबीन पिकासाठी पोषक असल्याने येथे लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सध्यास्थितीत सोयाबीन अंकुरले असून पिकाला पाने दिसून येत आहेत. सोयाबीन पिकावरील रोग नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी, असे सांगितले जात आहे. काही धान उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील कचरा नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहेत.

टॅग्स :agricultureशेती