शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

सोयाबीनवर रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 05:00 IST

यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहरत असलेले पीक काही भागात पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. प्रत्यक्षात या पिकास सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु पिकाच्या सुरुवातीच्या काळात जास्त पाऊस पडल्यामुळे पीक पिवळे पडत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा फवारणीवर भर : धान उत्पादक शेतकऱ्यांकडे तणनाशक फवारणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या काही भागातील सोयाबीन पीक पिवळे पडत असल्याने शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा पिकांवरील रोग नसून, सुरुवातीला या पिकाला कमी पाण्याची आवश्यकता असताना काही भागात पावसाचे पाणी शेतात साचल्याने पीके पिवळे पडत असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. उगवलेल्या सोयाबिन पिकावर विविध रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली आहे. बहरत असलेले पीक काही भागात पिवळे पडू लागले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. प्रत्यक्षात या पिकास सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते, परंतु पिकाच्या सुरुवातीच्या काळात जास्त पाऊस पडल्यामुळे पीक पिवळे पडत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकारावर नियंत्रणासाठी शेतात साचत असलेले पाणी बाहेर काढावे. यामुळे पिकाचे संरक्षण होईल, शिवाय पिकाची चांगली वाढही होईल, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.चामोर्शी व आरमोरी तालुक्यात धान शेतीसोबतच सोयाबीन पिकाची शेती प्राधान्याने केली जात आहे. वैरागड भागात यंदा सोयाबीनची पेरणी बऱ्याच शेतकऱ्यांनी केली आहे. सोयाबीन पिकाच्या शेतीला धानाच्या तुलनेत लागवडीचा खर्च कमी येत असल्याने अनेक शेतकरी आता सोयाबीन पिकाच्या लागवडीकडे वळले आहेत. पेरणी झाल्यानंतर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस बरसला. सोयाबीनचे पीक उगवले असून त्यावर रोग दिसून येत आहे.९३ हेक्टर क्षेत्रात उगवले सोयाबीनचे पीकगडचिरोली जिल्ह्यात बाराही तालुके मिळूण एकूण २७१ हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सोयाबीन पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यावर्षीच्या खरीप हंगामात ९३ हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, सिरोंचा या तालुक्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठे आहे. वैरागड परिसरातील शेतजमीन सोयाबीन पिकासाठी पोषक असल्याने येथे लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. सध्यास्थितीत सोयाबीन अंकुरले असून पिकाला पाने दिसून येत आहेत. सोयाबीन पिकावरील रोग नियंत्रित करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार फवारणी करावी, असे सांगितले जात आहे. काही धान उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील कचरा नष्ट करण्यासाठी तणनाशकाची फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहेत.

टॅग्स :agricultureशेती