शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

कोट्यवधीच्या दारूतस्करीनंतरही बडे ‘म्होरके’ अटकेच्या बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:36 IST

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवैध दारू वाहतूक आणि साठा करणाऱ्यांवर मोठ्या कारवाया केल्या. मात्र दारूबंदीच्या या जिल्ह्यात दारूतस्करी करणारे खरे ‘म्होरके’ अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नसून त्यांच्याकडून दारूतस्करीचे काम सुरूच आहे.

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने अवैध दारू वाहतूक आणि साठा करणाऱ्यांवर मोठ्या कारवाया केल्या. मात्र दारूबंदीच्या या जिल्ह्यात दारूतस्करी करणारे खरे ‘म्होरके’ अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नसून त्यांच्याकडून दारूतस्करीचे काम सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांच्या त्या कारवाया केवळ दिखावा होत्या की काय, अशी शंका उपस्थित केली जात आहे.गेल्या २९ नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील मोसम गावाजवळ दोन वाहनांमधून येणाऱ्या हजारांवर दारूच्या पेट्या एलसीबीच्या पथकाने पकडल्या होत्या. त्या केवळ एक दिवसाच्या कारवाईत १ कोटी २८ लाख रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला होता. त्यावरून वर्षभरात किती रुपयांची दारू या दारूतस्कराकडून आणल्या जात असेल याचा अंदाज येतो.या प्रकरणातील मुख्य आरोपी चामोर्शी येथील आरोपी धर्मा रॉय अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मात्र त्याचे दारूचे व्यवहार अजूनही बिनबोभाटपणे सुरू आहेत.विशेष म्हणजे हे प्रकरण ताजे असताना सदर आरोपी प्रकृती ठिक नसल्यामुळे उपचार घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मग वैद्यकीय उपचारानंतर पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून तो गायब झाला कसा? हा प्रश्न अनुत्तरित आहे.दुसऱ्या एका प्रकरणात डिसेंबर महिन्यात कोरची येथील दारू पुरवठादार निर्मल धमगाये याचा ४९ लाखांचा माल विशेष पथकाने पकडला होता; मात्र तोसुद्धा अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या दारू तस्करांचा शोध स्थानिक ठाण्याच्या पोलिसांसोबत विशेष पथकही घेते. तरीही कोणालाच त्याचा सुगावा लागू नये, हे पोलिसांचे अपयशच असल्याचे मानले जात आहे.कारवाईदरम्यान गाडीसोबत असलेल्या चालक आणि मदतनिसाला पकडायचे, पण खऱ्या म्होरक्यांना पुढील व्यवहारासाठी मोकळे राहू द्यायचे असे सूत्र वापरले जात असल्याचे बोलले जाते.चामोर्शी, कोरची आणि आरमोरी केंद्रप्राप्त माहितीनुसार, जिल्हाभरात अनधिकृतपणे दारूचा पुरवठा करण्यासाठी चामोर्शी, आष्टी, कोरची, आरमोरी तसेच चामोर्शी तालुक्यातील कुरूड हे प्रमुख केंद्र आहेत. याशिवाय जिल्ह्याच्या दक्षिण भागातही काही ठिकाणी दारू तस्करांचे मोठे केंद्र आहे. या ठिकाणी छत्तीसगड, तेलंगणासह मध्यप्रदेश व हरियाणातील दारू चोरट्या मार्गाने येते. रात्रीच्या अंधारात हा सर्व खेळ चालतो. पण यातील अनेक केंद्र अजून कारवाईच्या टप्प्यात आलेले नाहीत. ज्या प्रमाणात दारूची वाहतूक करून साठा व विक्री केली जाते त्या प्रमाणात पोलिसांकडून झालेल्या कारवाया अगदीच नगण्य आहेत. यातून पोलीस ठाणेच नाही तर कारवाई करणारे पथकही मालामाल होत आहे.नक्षल सेलच्या अधिकाºयाकडे दारूबंदीचे काम का?काही दिवसांपूर्वी एलसीबीच्या पथकाचे नियंत्रण पाहणारे वरिष्ठ अधिकारी आणि पथकावर एका पूर्वाश्रमीच्या दारू विक्रेत्याने पत्रपरिषद घेऊन गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक (प्रशासन) महेंद्र पंडीत यांची बदली नक्षल सेल (आॅपरेशन) मध्ये करण्यात आली. तर नक्षल सेलमधून अतिरिक्त पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी यांची बदली पंडीत यांच्याजागी करण्यात आली. मात्र दारूबंदीच्या कारवायांचे नियंत्रण अजूनही पंडीत यांच्याकडेच ठेवण्यात आले. नक्षल सेलसारखा महत्वाचा विभाग सांभाळताना त्यांच्याकडे दारूबंदीच्या कारवायांची जबाबदारी देण्याचा हेतू काय? अशी शंका उपस्थित केली जात आहे.झालेल्या कारवाया म्हणजे हिमनगाचे टोकदारूच्या व्यसनापासून नवीन पिढीला परावृत्त करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली. मात्र ही दारूबंदी नावाचीच राहिली आहे. प्रत्यक्षात दिवसागणित दारू पुरवठा, विक्रीसह पिणाऱ्यांचेही प्रमाण वाढत आहे. ठिकठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्यांना विश्वासात घेऊनच हे सर्व चालत असले तरी आता स्थानिक गुन्हे शाखेकडून केल्या जात असलेल्या कारवायांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहात आहे. प्रत्यक्षात झालेल्या कारवाया हे केवळ हिमनगाचे टोक असून प्रत्यक्षात दारूचे व्यवहार कितीतरी पटीने जास्त आहेत. असे असताना एखादी कारवाई दाखवून संबंधित तस्कराच्या पुढील व्यवहारांवर पांघरून घालायचे असा गोरखधंदा सुरू आहे.