शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

धानोरातील ३९ शाळा विजेविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 23:58 IST

विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांच्या मदतीने अध्यापन करावे, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले असले तरी धानोरा तालुक्यातील एकूण १८८ जिल्हा परिषद शाळांपैकी सुमारे ३९ शाळांमध्ये वीज उपलब्ध नाही.

ठळक मुद्देडिजिटल साधने धूळखात : पारंपरिक पद्धतीनेच अध्यापन सुरू

घनश्याम मशाखेत्री।लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांच्या मदतीने अध्यापन करावे, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले असले तरी धानोरा तालुक्यातील एकूण १८८ जिल्हा परिषद शाळांपैकी सुमारे ३९ शाळांमध्येवीज उपलब्ध नाही. यामध्ये १० शाळांमध्ये वीज पुरवठा नाही तर २९ शाळांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे शाळेने खरेदी केलेली डिजिटल साधने अजूनही धूळखात पडून आहेत.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सोयीसुविधांचा अभाव राहत असल्याने शहर व ग्रामीण भागातील पालकवर्ग खासगी कॉन्व्हेंटकडे वळत होते. परिणामी जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळा ओस पडायला लागल्या होत्या. मात्र आता शासनाने जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिकविल्यास विद्यार्थ्यांमधील चिकित्सकवृत्ती जागरूक होते. त्याचबरोबर डिजिटल साधनांमुळे अध्यापन सुधारण्यास मदत होत असल्याने शाळांनी डिजिटल साधने खरेदी करावी, असे निर्देश शिक्षण विभागाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. शाळांनी लोकसहभागातून डिजिटल साधने खरेदी केली. ही सर्व साधने चालविण्यासाठी शाळेमध्ये वीज पुरवठा असणे आवश्यक आहे. मात्र धानोरा तालुक्यातील १८८ जिल्हा परिषद शाळांपैकी सुमारे ३९ शाळांमध्ये वीज पुरवठा झालाच नाही. काही गावे अतिदुर्गम व जंगलव्याप्त असल्याने या गावांपर्यंत विद्युत पुरवठा झाला नाही. त्यामुळे शाळेतही वीज पोहोचली नाही. मात्र काही गावांमध्ये वीज पोहोचली असतानाही शाळेत वीज पुरवठा झाला नसल्याचे वास्तव आहे. शाळेत वीज नसल्याने शिक्षकांनी खरेदी केलेले साहित्य तसेच धूळखात पडून आहेत. परिणामी शिक्षक व विद्यार्थ्यांना पारंपरिक साधनांच्या मदतीनेच शिकवित आहेत. २९ शाळांचा वीज पुरवठा बिल न भरल्यामुळे खंडित करण्यात आला आहे. शाळांचे वीज बिल भरण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त होत नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा शाळा वीज बिल भरू शकत नाही. परिणामी वीज पुरवठा खंडित होतो.शाळेचा बहुतांश खर्च लोकवर्गणीतून करावा लागतो. दुर्गम भागातील आदिवासीबहुल गावातील पालक गरीब राहत असल्याने ते जास्त प्रमाणात लोकवर्गणीसुद्धा देऊ शकत नाही. परिणामी शाळेची आर्थिक परिस्थिती बेताची राहत असल्याने अधिकचे वीज बिल आल्यास शाळा सदर बिल भरू शकत नाही. शासनाने वीज बिल भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. धानोरा तालुक्याबरोबरच जिल्हाभरातील शाळांचीही हीच स्थिती आहे. शेकडो शाळांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.संरक्षक भिंतीअभावी शाळांच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर वाढलाधानोरा तालुक्यातील सुमारे ३७ शाळांना संरक्षक भिंत नाही. त्यामुळे शाळेच्या परिसरात मोकाट जनावरे, डुक्कर, कुत्रे यांचा वावर राहत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील बहुतांश शाळांकडे मोठ्या प्रमाणात पटांगण उपलब्ध आहे. या पटांगणात बगीचा लावणे शक्य असले तरी जनावरांपासून बगीचाचा बचाव करण्यासाठी संरक्षक भिंत आवश्यक आहे. संरक्षक भिंतच नसल्याने जागा पडीक आहे. सर्वशिक्षा अभियानच्या माध्यमातून यापूर्वी शाळाबांधकाम, संरक्षक भिंत बांधकाम यासाठी निधी उपलब्ध होत होता. आता हा निधी बंद झाल्याने अडचण वाढली आहे.

टॅग्स :Schoolशाळाelectricityवीज