शहरं
Join us  
Trending Stories
1
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
2
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
3
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
4
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
5
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
6
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
7
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
8
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
9
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
12
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
13
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
14
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
16
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
17
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
18
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
19
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
20
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 

धान उघड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:05 AM

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सहकारी संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ६५ वर केंद्रावरून २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

ठळक मुद्देएक लाख क्विंटल धानाला वादळी पावसाचा फटकामहामंडळातर्फे केंद्रावरून उचल करण्यास दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सहकारी संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ६५ वर केंद्रावरून २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी १ लाख ९६ हजार १०५ क्विंटल धान भरडाईसाठी पाठविण्यात आला आहे. तर १ लाख २० हजार क्विंटल धान उघड्यावर असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी पाऊस झाल्याने जवळपास एक लाख क्विंटल धानाला पावसाचा फटका बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरमोरी तालुक्यात १० हजार ८९७ क्विंटल धान उघड्यावर आहे. कुरखेडा तालुक्यात ४२ हजार ४०१ क्विंटल, कोरची तालुक्यात ४२ हजार ५६५ क्विंटल, धानोरा तालुक्यात ९ हजार ४८८ क्विंटल, घोट परिसरात १५ हजार १९७ क्विंटल धान उघड्यावर आहे. तर आरमोरी तालुक्यात १७ हजार ४७४ क्विंटल धान गोदामात आहे. कुरखेडा तालुक्यात ५ हजार ७७६ क्विंटल, कोरची तालुक्यात ३३ हजार ५०५ क्विंटल, धानोरा तालुक्यात ३० हजार ८८३ क्विंटल, घोट परिसरात २३ हजार ८३५ क्विंटल तसेच अहेरी तालुक्यात ७८ हजार ५५४ क्विंटल असे एकूण १ लाख ९० हजार २९ क्विंटल धान गोदामा साठवून ठेवण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी २०१७-१८ च्या हंगामात करण्यात आली. आदिवासी विकास महामंडळांतर्गत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत ही धान खरेदी करण्यात आली. २०१७-१८ या वर्षाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती धानाचे ४० ते ५० टक्केच उत्पादन आले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाची फारशी आवक झाली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी २ लाख क्विंटलने घटली असल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाकडून मिळाली आहे.गोदामाची वानवाआदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थांच्या वतीने दरवर्षीच्या खरीप व रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. मात्र महामंडळाकडे तसेच संस्थांकडे धानाची साठवणूक करण्यासाठी पुरेशी गोदाम व्यवस्था नाही. त्यामुळे महामंडळाला दरवर्षीच लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागते.