शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

धान उघड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:05 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सहकारी संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ६५ वर केंद्रावरून २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

ठळक मुद्देएक लाख क्विंटल धानाला वादळी पावसाचा फटकामहामंडळातर्फे केंद्रावरून उचल करण्यास दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सहकारी संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ६५ वर केंद्रावरून २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी १ लाख ९६ हजार १०५ क्विंटल धान भरडाईसाठी पाठविण्यात आला आहे. तर १ लाख २० हजार क्विंटल धान उघड्यावर असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी पाऊस झाल्याने जवळपास एक लाख क्विंटल धानाला पावसाचा फटका बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरमोरी तालुक्यात १० हजार ८९७ क्विंटल धान उघड्यावर आहे. कुरखेडा तालुक्यात ४२ हजार ४०१ क्विंटल, कोरची तालुक्यात ४२ हजार ५६५ क्विंटल, धानोरा तालुक्यात ९ हजार ४८८ क्विंटल, घोट परिसरात १५ हजार १९७ क्विंटल धान उघड्यावर आहे. तर आरमोरी तालुक्यात १७ हजार ४७४ क्विंटल धान गोदामात आहे. कुरखेडा तालुक्यात ५ हजार ७७६ क्विंटल, कोरची तालुक्यात ३३ हजार ५०५ क्विंटल, धानोरा तालुक्यात ३० हजार ८८३ क्विंटल, घोट परिसरात २३ हजार ८३५ क्विंटल तसेच अहेरी तालुक्यात ७८ हजार ५५४ क्विंटल असे एकूण १ लाख ९० हजार २९ क्विंटल धान गोदामा साठवून ठेवण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी २०१७-१८ च्या हंगामात करण्यात आली. आदिवासी विकास महामंडळांतर्गत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत ही धान खरेदी करण्यात आली. २०१७-१८ या वर्षाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती धानाचे ४० ते ५० टक्केच उत्पादन आले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाची फारशी आवक झाली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी २ लाख क्विंटलने घटली असल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाकडून मिळाली आहे.गोदामाची वानवाआदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थांच्या वतीने दरवर्षीच्या खरीप व रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. मात्र महामंडळाकडे तसेच संस्थांकडे धानाची साठवणूक करण्यासाठी पुरेशी गोदाम व्यवस्था नाही. त्यामुळे महामंडळाला दरवर्षीच लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागते.