शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

धान उघड्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:05 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सहकारी संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ६५ वर केंद्रावरून २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.

ठळक मुद्देएक लाख क्विंटल धानाला वादळी पावसाचा फटकामहामंडळातर्फे केंद्रावरून उचल करण्यास दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सहकारी संस्थांमार्फत गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ६५ वर केंद्रावरून २०१७-१८ च्या खरीप हंगामात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. यापैकी १ लाख ९६ हजार १०५ क्विंटल धान भरडाईसाठी पाठविण्यात आला आहे. तर १ लाख २० हजार क्विंटल धान उघड्यावर असल्याची माहिती महामंडळाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.रविवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी पाऊस झाल्याने जवळपास एक लाख क्विंटल धानाला पावसाचा फटका बसल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरमोरी तालुक्यात १० हजार ८९७ क्विंटल धान उघड्यावर आहे. कुरखेडा तालुक्यात ४२ हजार ४०१ क्विंटल, कोरची तालुक्यात ४२ हजार ५६५ क्विंटल, धानोरा तालुक्यात ९ हजार ४८८ क्विंटल, घोट परिसरात १५ हजार १९७ क्विंटल धान उघड्यावर आहे. तर आरमोरी तालुक्यात १७ हजार ४७४ क्विंटल धान गोदामात आहे. कुरखेडा तालुक्यात ५ हजार ७७६ क्विंटल, कोरची तालुक्यात ३३ हजार ५०५ क्विंटल, धानोरा तालुक्यात ३० हजार ८८३ क्विंटल, घोट परिसरात २३ हजार ८३५ क्विंटल तसेच अहेरी तालुक्यात ७८ हजार ५५४ क्विंटल असे एकूण १ लाख ९० हजार २९ क्विंटल धान गोदामा साठवून ठेवण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५ लाख ६ हजार ६८३ क्विंटल धानाची खरेदी २०१७-१८ च्या हंगामात करण्यात आली. आदिवासी विकास महामंडळांतर्गत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत ही धान खरेदी करण्यात आली. २०१७-१८ या वर्षाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या हाती धानाचे ४० ते ५० टक्केच उत्पादन आले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर धानाची फारशी आवक झाली नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आदिवासी विकास महामंडळाची धान खरेदी २ लाख क्विंटलने घटली असल्याची माहिती आदिवासी विकास महामंडळाकडून मिळाली आहे.गोदामाची वानवाआदिवासी विकास महामंडळांतर्गत आविका संस्थांच्या वतीने दरवर्षीच्या खरीप व रबी हंगामात मोठ्या प्रमाणात धान खरेदी केली जाते. मात्र महामंडळाकडे तसेच संस्थांकडे धानाची साठवणूक करण्यासाठी पुरेशी गोदाम व्यवस्था नाही. त्यामुळे महामंडळाला दरवर्षीच लाखो रूपयांचे नुकसान सहन करावे लागते.