शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
5
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
6
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
7
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
8
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
9
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
10
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
11
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
12
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
13
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
14
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
15
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
16
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
17
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
18
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
19
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
20
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा

१६८८ गावांसाठी फक्त तीन अग्निशमन बंब

By admin | Updated: May 17, 2017 01:18 IST

तब्बल ३५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १६८८ महसुली गावांतील

आगप्रतिबंधक उपाययोजना वाऱ्यावर : १० पैकी एकाही नगर पंचायतीत व्यवस्था नाही मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : तब्बल ३५० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत पसरलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १६८८ महसुली गावांतील नागरिकांना आगीपासून वाचविण्यासाठी केवळ ३ अग्निशमन बंब आहेत. या तीन बंबांच्या भरोशावर जिल्ह्याच्या कोणत्याही गावात जाऊन आग नियंत्रणात आणणे कठीणच नाही तर अशक्य आहे. त्यामुळे आगीच्या घटना घडल्यास जिल्ह्यातील १० लाख ७३ हजार नागरिक असुरक्षित आहेत. जिल्हाभरात केवळ गडचिरोली आणि देसाईगंज या दोन नगर परिषदांमध्ये अग्निशमन यंत्रणा आहे. त्यातही गडचिरोली नगर परिषदेच्या दोन अग्निशमन गाड्यांपैकी एक गाडी बंद अवस्थेत आहे. त्यामुळे गडचिरोलीतील एक आणि देसाईगंजमधील दोन अशा एकूण तीन अग्निशमन बंबांवर (गाड्यांवर) संपूर्ण जिल्ह्यातील १६८८ गावांमधील आगी विझविण्याची जबाबदारी येऊन पडत आहे. जिल्ह्यातील ७६ टक्के भाग जंगलाने व्यापलेला आहे. अनेक गावांत अजूनही जंगलातील लाकडे आणून चुलीवर स्वयंपाक केला जातो. ग्रामीण भागातील बहुतांश घरेही सिमेंट-काँक्रिटची नसून कुडाची आहेत. त्यामुळे आग लागण्याची शक्यता जास्त असते. शिवाय आग लागल्यानंतर ती झपाट्याने पसरते. अनेक वेळा हवेच्या झोताने ही आग अनेक घरांना कवेत घेण्याची शक्यता असते. अशावेळी २०० किलोमीटवरून अग्निशमन बंब त्या गावात पोहोचेपर्यंत आगीत सर्वकाही स्वाहा होते. अशा परिस्थितीत गावातील लोकांनाच धावपळ करीत बकेटने पाणी मारून ती आग कशीबशी विझवावी लागते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांसाठी गडचिरोली आणि देसाईगंज येथील अग्निशमन बंब कुचकामी ठरत आहेत. जिल्हा प्रशासनाने आगीसारख्या आपत्तीतून जिल्हावासीयांना संरक्षण देण्यासाठी तातडीने सर्व नगर पंचायतींमध्ये अग्नीशमन व्यवस्था करणे गरजेचे आहे. नगर पंचायतींचा निधी गेला कुठे? जिल्ह्याच्या दक्षिण टोकावरील सिरोंचा व अहेरी नगर पंचायतींमध्ये अग्निशमन दलाची व्यवस्था व वाहन खरेदीसाठी जिल्हा विकास निधीतून सन २०१५-१६ मध्ये ७५-७५ लाख रुपये निधी देण्यात आला होता. मात्र एक वर्ष होऊन गेले तरी त्या नगर पंचायतींमध्ये अद्याप अग्निशमन वाहन आलेले नाही. त्यामुळे हा निधी गेला कुठे? वाहन खरेदीसाठी एवढा विलंब का? असे प्रश्न अनुत्तरित आहेत. जिल्ह्यात अग्निशमन यंत्रणा पुरेशा प्रमाणात नाही हे खरे आहे. नगर पंचायतींमध्ये ही व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र अग्निशमन वाहन महागडे राहात असल्यामुळे नगर पंचायतींकडे ते वाहन खरेदीसाठी पैसे नाहीत. त्यामुळे गावकरी स्वत: आपल्या स्तरावर आगी विझवितात. - कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अहेरी आणि सिरोंचा नगर पंचायतींना अग्निशमन वाहन खरेदीसाठी २०१५-१६ मध्ये निधी दिला आहे. त्यांनी त्यासाठी टेंडरही बोलविले होते. पण अद्याप वाहन खरेदी झालेली नाही. - गजेंद्र भोयर, जिल्हा न.पा.प्रशासन अधिकारी प्रत्येक न.पं.मध्ये व्यवस्था असावी नगर पंचायत व नगर परिषद अधिनियमान्वये प्रत्येक नगर परिषदांसोबतच प्रत्येक नगर पंचायतींमध्ये अग्निशमन यंत्रणा असणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १० नगर पंचायती आहेत. परंतु अद्याप एकाही नगर पंचायतीमध्ये ही व्यवस्था नाही. जिल्ह्यात विविध कामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना या व्यवस्थेसाठीच जिल्हा नियोजन समितीकडे पैसे नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.