शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
3
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
4
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
5
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
6
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
7
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
8
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
9
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
10
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
11
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
12
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
13
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
14
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
15
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
16
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
17
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
18
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
19
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
20
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?

डांबरी रस्त्याचे उरले केवळ अवशेष

By admin | Updated: November 30, 2015 01:20 IST

गडचिरोली-राजनांदगाव या राज्य महामार्गाची मुरूमगाव ते सावरगाव पर्यंत मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले आहे.

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : मुरूमगाव-सावरगाव राज्य महामार्गाची दुरवस्थामुरूमगाव : गडचिरोली-राजनांदगाव या राज्य महामार्गाची मुरूमगाव ते सावरगाव पर्यंत मागील अनेक वर्षांपासून दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून गेले आहे. या मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले असून माती पसरली असल्याने सदर मार्ग खडीकरणाचा असावा, असे दिसून येत आहे. गडचिरोली-राजनांदगाव हा मार्ग छत्तीसगड व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा मार्ग आहे. छत्तीसगड राज्यात असलेल्या भिलाई येथे जाण्यासाठी सदर मार्ग सरळ पडत असल्याने महाराष्ट्रातील अनेक ट्रक व तेलंगणा राज्यात जाणारे ट्रेलर याच मार्गाने प्रवास करतात. या मार्गावरून लोखंडाने भरलेल्या जड वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे या मार्गाची नियमितपणे डागडुजी करणे आवश्यक आहे. मात्र मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी सदर मार्गावरील डांबर पूर्णपणे उखडून गेला आहे. डांबराची केवळ अवशेष या मार्गावर शिल्लक राहिले आहेत. या रस्त्याकडे एक नजर टाकल्यास सदर मार्गाचे खडीकरण केले असावे व तो उखडला असावा असे दिसून येते. वाहनाच्या मागे प्रचंड धूळ उडते. या मार्गाच्या बाजुला अनेक लहान-मोठी गावे आहेत. वाहन गेल्यानंतर धूळ उडत असल्याने या धुळीचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागतो. मोठ्या वाहनांच्या मागे एखादा दुचाकीस्वार सापडल्यास धुळीचा तडाखा त्यालाही बसतो. खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त आहेत. या मार्गावर अनेक अपघातही घडले आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती होणे आवश्यक आहे. (वार्ताहर)