शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिम आरक्षणासाठी संघर्ष हाच एकमेव पर्याय

By admin | Updated: January 14, 2015 23:08 IST

राज्यातील मुस्लिम समाज सर्व दृष्टीने मागासलेला आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण नसल्यामुळे मुस्लिम समाजाची प्रगती खुंटली आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष हाच एकमेव पर्याय आहे,

गडचिरोलीत मेळावा : हाजी अनवर अली यांचे प्रतिपादनगडचिरोली : राज्यातील मुस्लिम समाज सर्व दृष्टीने मागासलेला आहे. मुस्लिम समाजाला आरक्षण नसल्यामुळे मुस्लिम समाजाची प्रगती खुंटली आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष हाच एकमेव पर्याय आहे, असे प्रतिपादन हाजी अनवर अली यांनी केले.आरमोरी मार्गावरील पटवारी भवनात बुधवारी मुस्लिम समाज मेळावा पार पडला. यावेळी अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुश्ताक कुरेशी, महेबुब अली, अ‍ॅड. रफिक शेख, जमीर हकीम, हबीब खा पठाण, मुश्ताक हकीम आदी उपस्थित होते. मेळाव्याला मार्गदर्शन करताना अनवर अली पुढे म्हणाले, मुस्लिम आरक्षणाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे लावून धरण्यात आली आहे. मात्र तत्कालीन शासनाने आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. राज्यातील नवे सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यासाठी विलंब करीत आहे. सरकारकडून मुस्लिम समाजाला सहजासहजी आरक्षण मिळणार नाही, त्यामुळे मुस्लिम समाजबांधवांनी रस्त्यावर उतरून आंदोलन व संघर्ष करणे आवश्यक आहे, असे अनवर अली यावेळी म्हणाले. याप्रसंगी अ‍ॅड. रफीक शेख, महेबुब अली, मुश्ताक कुरेशी, मुश्ताक हकीम यांनी समाजाबद्दल आपले विचार मांडले. या बैठकीला जिल्ह्यातील मुस्लिम नेते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)