शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

दिना धरणात केवळ ४५ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:52 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील दिना धरणात सद्य:स्थितीत केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देकाटकसरीने वापर करा : सिंचन विभागाकडून पाण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील दिना धरणात सद्य:स्थितीत केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शेतकºयांनी पाण्याचा जपून वापर न केल्यास धानपीक अडचणीत येण्याची शक्यता आहे.दिना धरणातील पाण्याने चामोर्शी तालुक्यातील सुमारे ४० किमी अंतरावरील शेतजमिनीला पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणाच्या पाण्याने हजारो हेक्टर शेतजमिनीला जलसिंचन होते. चामोर्शी तालुक्यासाठी दिना धरण वरदान ठरले आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे सदर तलाव पूर्णपणे भरला नाही. त्याचबरोबर धानशेतीला नियमित कालावधीच्या अगोदरच पाणी सोडावे लागले. जवळपास एक महिन्यापासून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जलसाठा कमी होत चालला आहे. सद्य:स्थितीत तलावात केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.चामोर्शी तालुक्यातील बहुतांश शेतकरी जड धानाची लागवड करतात. जड धानाला आणखी जवळपास एक महिना पाणी द्यावे लागणार आहे. यानंतर पाऊस न झाल्यास जलसाठ्यात वाढ होणार नाही. त्यामुळे पुन्हा एक महिना पाणी पुरणे अशक्य आहे. परिणामी एका पाण्याने धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकºयांनी काटकसरीने नियोजनबद्ध पाण्याचा वापर केल्यास सर्व शेतीला शेवटपर्यंत पाणी उपलब्ध होईल.पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन सिंचन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने शेतीला पाणी देणे सुरू केले आहे. सिंचन विभागाच्या नियोजनाला शेतकºयांनीही सहकार्य करावे, अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, असे आवाहन दिना प्रकल्पाचे शाखा अभियंता दि.वी. लांडगे यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.दिना धरणात केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शेवटपर्यंत धानपिकाला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी शेतकºयांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, अन्यथा धानपीक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.- आर.एन. ढुमणे, सहायक अभियंता, दिना प्रकल्प सिंचन विभाग