शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

दिना धरणात केवळ ४५ टक्केच जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:52 IST

जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील दिना धरणात सद्य:स्थितीत केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

ठळक मुद्देकाटकसरीने वापर करा : सिंचन विभागाकडून पाण्याचे नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील दिना धरणात सद्य:स्थितीत केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शेतकºयांनी पाण्याचा जपून वापर न केल्यास धानपीक अडचणीत येण्याची शक्यता आहे.दिना धरणातील पाण्याने चामोर्शी तालुक्यातील सुमारे ४० किमी अंतरावरील शेतजमिनीला पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणाच्या पाण्याने हजारो हेक्टर शेतजमिनीला जलसिंचन होते. चामोर्शी तालुक्यासाठी दिना धरण वरदान ठरले आहे. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे सदर तलाव पूर्णपणे भरला नाही. त्याचबरोबर धानशेतीला नियमित कालावधीच्या अगोदरच पाणी सोडावे लागले. जवळपास एक महिन्यापासून पाणी सोडले जात आहे. त्यामुळे जलसाठा कमी होत चालला आहे. सद्य:स्थितीत तलावात केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.चामोर्शी तालुक्यातील बहुतांश शेतकरी जड धानाची लागवड करतात. जड धानाला आणखी जवळपास एक महिना पाणी द्यावे लागणार आहे. यानंतर पाऊस न झाल्यास जलसाठ्यात वाढ होणार नाही. त्यामुळे पुन्हा एक महिना पाणी पुरणे अशक्य आहे. परिणामी एका पाण्याने धानपीक करपण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेतकºयांनी काटकसरीने नियोजनबद्ध पाण्याचा वापर केल्यास सर्व शेतीला शेवटपर्यंत पाणी उपलब्ध होईल.पाण्याचा तुटवडा लक्षात घेऊन सिंचन विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने शेतीला पाणी देणे सुरू केले आहे. सिंचन विभागाच्या नियोजनाला शेतकºयांनीही सहकार्य करावे, अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, असे आवाहन दिना प्रकल्पाचे शाखा अभियंता दि.वी. लांडगे यांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना केले आहे.दिना धरणात केवळ ४५ टक्के जलसाठा शिल्लक आहे. शेवटपर्यंत धानपिकाला पाण्याचा पुरवठा होण्यासाठी शेतकºयांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा, अन्यथा धानपीक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.- आर.एन. ढुमणे, सहायक अभियंता, दिना प्रकल्प सिंचन विभाग