शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

जिमलगट्टा परिसरात २० टक्केच रोवणी

By admin | Updated: August 17, 2014 23:10 IST

यंदा सुरूवातीपासूनच जिमलगट्टा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सुरूवातीस पेरणी केली होती. परंतु पावसाने वेळेवर दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला

जिमलगट्टा : यंदा सुरूवातीपासूनच जिमलगट्टा परिसरात अत्यल्प पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी सुरूवातीस पेरणी केली होती. परंतु पावसाने वेळेवर दगा दिल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पाऊस सुरू झाला. मात्र रोवणीचा हंगाम अल्पावधीपर्यंतच चालला. जिमलगट्टा परिसरात यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने शेतकऱ्यांची केवळ २० टक्केच रोवणी झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे काम ठप्प पडले आहेत. परिणामी परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत.जिमलगट्टा परिसरातील शेतकऱ्यांनी कसे-बसे रोवणी आटोपली आहेत. पंरतु ८० टक्के शेतकऱ्यांचे हंगाम अजुनपर्यंत अर्धवटच आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत आहेत. जवळपास मागील २० दिवसांपासून पावसाने जिमलगट्टा परिसरात हजेरी लावली नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे धानपऱ्हे करपले आहेत. जिमलगट्टा परिसरात बहुतांश आदिवासी समाज अस्तित्वात आहे. त्यामुळे या समाजाचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. खरीप पिकातील उत्पन्नातून शेतकरी वर्षभर आपली उपजीविका करतात. शेतकऱ्यांनी धानपिकास सोयाबीन, कापूस व इतर पिकाचीही लागवड आपल्या शेतात केली आहे. परंतु अल्प पावसामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. त्या परिसरातील तलाव, बोड्या, नाले व इतर जलसाठे अजुनही अर्धवट स्थितीतच भरलेले आहेत. परिसरात जोरदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांना जोरदार पावसाची अजुनही प्रतीक्षा आहे. अनेक युवक कामाच्या शोधात बाहेरगावी जात आहेत. (वार्ताहर)