शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

२४४ पैकी केवळ १८ गावांना मिळाले पाेलीस पाटील

By दिगांबर जवादे | Updated: September 26, 2023 20:44 IST

गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे. गावातील स्थिती पाेलिसांना कळविण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे.

गडचिराेली : एटापल्ली उपविभागांतर्गत येणाऱ्या भामरागड व एटापल्ली तालुक्यातील २४४ गावांमध्ये पाेलीस पाटलाची पदे भरण्यासाठी जाहीरात काढण्यात आली हाेती. मात्र केवळ १८ गावांना पाेलीस पाटील मिळाले आहेत. पुन्हा तब्बल २२६ जागा रिक्त आहेत. शासनाकडून मासिक जवळपास सहा हजार रूपये मानधन दिले जात असतानाही अर्ज का आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

गावात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे. गावातील स्थिती पाेलिसांना कळविण्याची महत्त्वाची जबाबदारी पाेलीस पाटलाची आहे. या पदाचे महत्त्व लक्षात घेऊन प्रत्येक गावात पाेलीस पाटलाची नियुक्ती केली जाते. यासाठी गावातीलच व्यक्तीची नेमणूक केली जाते. आपली कामे सांभाळून पाेलीस पाटील पदाची सहज जबाबदारी सांभाळता येते. त्यामुळे हे पद मिळविण्यासाठीसुद्धा गावात फार माेठी स्पर्धा राहत असल्याचे दिसून येते. मात्र याला एटापल्ली उपविभाग याला अपवाद ठरला असल्याचे दिसून येते.

एटापल्ली तालुक्यात १४२ व भामरागड तालुक्यात १०२ अशा एकुण २४४ पोलीस पाटलांची पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली. पहिल्या टप्प्यात पुरेस अर्ज प्राप्त न झाल्याने, अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. मात्र याचा फारसा फरक पडला नाही. एटापल्ली तालुक्यात १४२ जागांसाठी केवळ ७१ अर्ज पात्र झाले. ४८ जागा महिलांकरिता राखीव हाेत्या. केवळ ९ महिलांनी अर्ज केले. ९ पैकी २ महीला उत्तीर्ण हाेऊन पोलीस पाटील बनल्या.

भामरागड तालुक्यात १०२ जागांसाठी फक्त २६ अर्ज आले, यापैकी २४ अर्ज पात्र ठरले. २४ पैकी फक्त ०५ पास झाले. ०४ महिलांनी परीक्षा दिली. परंतु चारही महीला नापास झाल्या.

८१ पैकी केवळ २ महिला पाेलीस पाटील- एटापल्ली तालुक्यात महिला पाेलीस पाटील पदासाठी ४८ जागा हाेत्या. त्यासाठी केवळ ९ महिलांनी अर्ज केले. ९ पैकी २ महिला उत्तीर्ण हाेऊन पोलीस पाटील बनल्या. भामरागड तालुक्यात एकूण ३३ जागा महिलांसाठी राखीव हाेत्या. केवळी चारच अर्ज प्राप्त झाले. या चारही महिला अनुत्तीर्ण झाल्या. त्यामुळे या तालुक्यातील महिलांची सर्वच पदे रिक्त आहेत.

- दुर्गम भागातील नागरिकांकडे दाखले राहत नाही. त्यामुळे ते अर्ज करू शकत नाही. तर काही उमेदवार परीक्षा उत्तीर्ण हाेऊ शकले नाहीत. मात्र काही गावांमध्ये अर्जच आले नाही. भरती प्रक्रिया राबवूनही सुमारे २२६ गावांमधील पाेलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. नेमक्या काेणत्या कारणामुळे नागरिक पाेलीस पाटील पदासाठी अर्ज करत नाही, त्याचा शाेध घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Policeपोलिस