शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

एकाची रक्कम दुसऱ्याच्या खात्यात

By admin | Updated: June 23, 2014 23:50 IST

मागील वर्षी पावसाळ्यादरम्यान झालेल्या शेतीच्या नुकसानीची मदत तब्बल एक वर्षानंतर मिळायला लागली आहे. मात्र सदर रक्कम दुसऱ्याच्याच खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड

शेतकऱ्यांमध्ये गोंधळ : पावसाळ्यातील पीक बुडीची शासनाची मदतगडचिरोली : मागील वर्षी पावसाळ्यादरम्यान झालेल्या शेतीच्या नुकसानीची मदत तब्बल एक वर्षानंतर मिळायला लागली आहे. मात्र सदर रक्कम दुसऱ्याच्याच खात्यामध्ये जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. यासाठी जबाबदार असलेल्या तलाठ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे हजारो हेक्टरमधील धानाचे पीक वाहून गेले होते. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना तीन ते चार वेळा धानाचे पऱ्हे भरावे लागले. तेही न उगविल्याने शेतजमीन पडित ठेवण्याची पाळी आली होती. शेतकऱ्यांना दोन ते तीन वेळा धानाची बिजाई खरेदी करावी लागली. शेतीच्या उत्पादन खर्चात प्रचंड वाढ झाली असली तरी त्या मानाने उत्पन्नात मात्र घट झाली. पुरामुळे रोवलेले धान वाहून गेले. तर काही शेतकऱ्यांचे धान पीक शेतातच कुजले. या शेतकऱ्यांना तर धान लागवडीचा खर्चही सहन करावा लागला. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी समाजाच्या विविधस्तरातून होऊ लागली. शासनाने यासाठी केंद्र शासनाकडून मदत मागितली.मदतीची रक्कम एक वर्ष लोटल्यानंतर प्राप्त झाली आहे. मदतीची रक्कम बँक खात्यातच जमा होत असल्याने तलाठ्यांनी शेतकऱ्यांकडून बँक खाते क्रमांक मागितले. मात्र तलाठ्यांच्या चुकीमुळे खाते क्रमांक चुकले असून एका शेतकऱ्याची रक्कम दुसऱ्याच शेतकऱ्याच्या नावावर जमा होणे सुरू झाले आहे. ही स्थिती संपूर्ण जिल्ह्यात कमी-जास्त प्रमाणात आहे. इतर शेतकऱ्यांची रक्कम जमा झाली असतांना आपली रक्कम का जमा झाली नाही, याबद्दल विचारणा करण्यासाठी शेतकरीवर्ग बँकेत गेला असता, झालेला गोंधळ लक्षात आला. अगोदरच मदतीची रक्कम मिळण्यास अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. त्यातच बँक खात्यांच्या क्रमांकातील गोंधळामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शेती हंगामाला सुरूवात झाली आहे. मदतीची रक्कम मिळाली असती तर खते, बी-बियाणे खरेदी करण्यास मदत झाली असती. बँक खात्यातील क्रमांक चुकण्यासाठी तलाठी की बँक कर्मचारी जबाबदार आहेत. हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.बहुतांश शेतकरी जमा झालेली रक्कम तत्काळ काढून घेतात. दुसऱ्या शेतकऱ्याची जमा झालेली रक्कमही काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे भलत्याच व्यक्तीचा फायदा होत असला तरी ज्या शेतकऱ्याच्या नावाने शासनाने मदत दिली, ज्या शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान झाले, तो शेतकरी मात्र मदतीपासून वंचित राहणार आहे. तलाठ्यांच्या अशा कारभारामुळे शेतकरीवर्गाला प्रचंड त्रास सहन करावा लागत असून तलाठ्यांप्रती संतापाची भावना निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)