शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

महिला व बालकल्याणसाठी यावर्षी एक कोटीची तरतूद

By admin | Updated: July 1, 2017 01:25 IST

गेल्यावर्षीचा निधी खर्च करण्यात माघारलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला नवीन आर्थिक वर्षात

गतवर्षीचा निधी खर्चच नाही : अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे कारभार ढेपाळला लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गेल्यावर्षीचा निधी खर्च करण्यात माघारलेल्या जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला नवीन आर्थिक वर्षात विविध योजना व कामांसाठी वेगवेगळ्या लेखाशिर्षातून एक कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षी तरी वेळेत हा निधी खर्च होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्ष २०१७-१८ मध्ये जि.प.महिला व बालविकास विभागाला १० टक्के सेस फंडातून ४२ लाख, आदिवासी उपयोजनेअंतर्गत २७ लाख, ७ टक्के वन महसूल अनुदान १८ लाख आणि जिल्हा नियोजन समितीकडून १३.२० लाख अशी एकूण १ कोटी २० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जि.प.च्या १० टक्के सेस फंडातून अंगणवाडी इमारत दुरूस्त करणे व प्रत्येक तालुक्यात एक आदर्श अंगणवाडी तयार करण्यासाठी १८ लाख, दशसुत्री बचत गटांच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी १२ लाख, दशसुत्री बचत गटांच्या महिलांना स्वयंरोजगारासाठी साहित्य पुरविणे ३ लाख, बारावी पास मुलींना स्पर्धा परीक्षेकरिता प्रशिक्षण देणे ९ लाख असे एकूण ४२ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. आदिवासी उपयोजनेअंतर्गत महिला व मुलींना संगणक टायपिंग प्रशिक्षणासाठी ६ लाख ५० हजार, महिला व मुलींना एचएस-सीआयटी प्रशिक्षणासाठी ३ लाख, अंगणवाडीसाठी इमारत/भाड्यासाठी ४ लाख, प्रशिक्षित महिला व मुलींना शिलाई मशिन पुरविण्यासाठी १० लाख ५० हजार, अंगणवाडीकरिता प्लास्टिक खुर्च्या पुरविण्यासाठी ३ लाख असे एकूण २७ लाखांची तरतूद केली आहे. ७ टक्के वन महसूल अनुदानातून मिळालेल्या १८ लाख १ हजार रुपयांत दशसुत्री महिला बचत गटांच्या महिलांना स्वयंरोजगार साहित्य पुरविण्यासाठी ९ लाख, आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सौर कंदील पुरविण्यासाठी १ हजार, तसेच अंगणवाडी केंद्रांना आवश्यक साहित्य पुरविणे व प्रत्येक तालुक्यात एक आदर्श अंगणवाडी बनविण्यासाठी ९ लाख रुपयांची तरतूद केली आहे. जिल्हा नियोजन समितीतून सर्वसाधारण तरतूद १३ लाख २० हजार करण्यात आली. त्यात अंगणवाड्यांचे बांधकाम केले जाणार आहे. १० पैकी केवळ ४ सीडीपीओ रुजू जिल्ह्यात महिला व बालविकास विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी तालुका मुख्यालयी असणाऱ्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या १२ पैकी ११ जागा रिक्त होत्या. ‘लोकमत’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित करताच राज्य शासनाने ११ पैकी १० जागांवर अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचे आदेश काढले. मात्र १५ दिवस झाले तरी त्यातील केवळ ४ अधिकारी रुजू झाले आहेत. ४ रूजू झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये देसाईगंज येथे निर्मला कुचिक, चामोर्शी येथे गजानन चाटे, एटापल्ली येथे कालिदास बडे आणि आरमोरी येथे नागेश ठोमरे हे रुजू झाले आहेत. गडचिरोली, अहेरी, धानोरा, कुरखेडा, मुलचेरा, कोरची या सहा ठिकाणचे अधिकारी अजून रुजूच झाले नाहीत. सिरोंचा येथील पदावर कोणाचीही नियुक्ती केलेली नाही. त्यांच्या नियुक्तीसाठी तातडीने हालचाल करण्याची मागणी होत आहे.