शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानमधील एका एक्सप्रेसवेवर ५० हून अधिक वाहनांची टक्कर, एकाचा मृत्यू; २६ जण जखमी
2
भयंकर! पंतप्रधान आवास योजनेचा मिळाला नाही लाभ; पेट्रोल टाकून थेट ग्रामपंचायतीला लावली आग
3
Nitish Kumar : Video - मुख्यमंत्री नितीश कुमारांच्या ताफ्यातील कारची DSP ना धडक; थोडक्यात वाचला जीव
4
दररोज करा छोटी बचत, मिळतील १७ लाख रुपये; पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम करेल मालामाल, पटापट पाहा डिटेल्स
5
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
6
मित्रपक्षाच्या ३ माजी नगरसेवकांवरही भाजपाचा गळ, ९०हून अधिक सक्षम उमेदवार असल्याचा दावा
7
औटघटकेची ठरली तिसऱ्या आघाडीची चर्चा! निलंबित नेत्यांची होणार घरवापसी, नागपुरात घेतली वरिष्ठांची भेट
8
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
9
तूळ राशीसाठी नवीन वर्ष 2026 नियोजन आणि स्वप्नपूर्तीचे वर्ष; 'या' एका चुकीमुळे होऊ शकते मोठे नुकसान!
10
पिंपरीत आम्ही १२५ जागा जिंकू, अजित पवारांना फक्त तीनच जागा मिळणार', भाजपा आमदाराचा दावा
11
फोननंतर विजयकुमारांचा बंडाचा झेंडा; गोरे, तडवळकर मुंबईकडे, उमेदवारीवरून रणकंदन
12
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
13
आता कॅब बुक करताना मिळणार महिला ड्रायव्हर निवडण्याचा पर्याय, महिलांच्या सुरक्षेसाठा सरकारचा मोठं पाऊल
14
Salman Khan Birthday: मध्यरात्री पनवेलच्या फार्महाऊसवर सलमानने केलं वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन, व्हिडीओ व्हायरल
15
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
16
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
18
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
19
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
20
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारची दीड हजार कामे अजूनही अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१७ कामे प्रस्तावित करण्यात आली. ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देपावसाळ्यामुळे कामे थांबली । चार वर्षात १५ हजार कामे झाली पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ व्हावी, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरू केली आहेत. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांमध्ये सुमारे १६ हजार २६२ कामे मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ८१७ कामे पूर्ण झाली आहेत. जवळपासा १ हजार ४०० कामे अजूनही शिल्लक आहेत.गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. एका पाण्याने धान करपते, अशी स्थिती आहे. जंगल असल्याने मोठे सिंचन प्रकल्प बांधणे शक्य नाही. त्यामुळे सिंचनाची व्यक्तीगत साधने बांधून देण्यावर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भर देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात प्राधान्याने कामे मंजूर करण्यात आली.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१७ कामे प्रस्तावित करण्यात आली. ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर सुमारे ७० कोटी ३० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. २०१६-१७ मध्ये १२२ गावांची निवड झाली. यावर्षी ४ हजार ४२३ कामे मंजूर करण्यात आली. ही सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ७७ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.२०१७-१८ मध्ये १६९ गावांची निवड करण्यात आली. ३ हजार ७०३ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३ हजार ५०७ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ४० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. २०१८-१९ या वर्षात १७२ गावांची निवड झाली. ४ हजार ५१९ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३ हजार २७० कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ मधील प्रस्तावित सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. मात्र २०१७-१८ व २०१८-१९ मधील कामे शिल्लक आहेत.जलयुक्त शिवार अभियान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. या अभियानांतर्गत सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री स्वत: या योजनेचा नियमितपणे आढावा घेत असल्याने या योजनेला निधीची कमतरता भासत नाही. तसेच प्रशासकीय मान्यता व इतरही कामे वेळेवर पार पडतात. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गतची कामे इतर योजनांच्या तुलनेत गतीने होत असल्याचे दिसून येते.अभियान बोड्यांसाठी ठरले वरदानधानापिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मामा तलाव व बोड्या बांधल्या आहेत. कालपरत्वे या बोड्यांची दुरूस्ती करणे आवश्यक होते. अनेक बोड्यांमध्ये गाळ साचल्याने बोड्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. बोड्या व मामा तलावांच्या पाळी फुटल्याने पाणी राहत नव्हते. त्यामुळे अडचणीच्या वेळी सिंचन न झाल्याने धानपीक करपत होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मामा तलाव व बोड्यांच्या नूतनीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे अनेक तलाव व बोड्या दुरूस्त झाल्या आहेत. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. शेततळे मात्र निकामी ठरत असल्याचे दिसून येते. ज्या वेळेवर पाऊस राहते, त्याचवेळी शेततळ्यांमध्ये पाणी राहते. पाऊस गेल्यास शेततळे कोरडे पडत असल्याचे चित्र दिसून येते. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार