शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
3
फक्त किराणाच नाही तर मॉलमध्ये शॉपिंगपासून ते सिनेमापर्यंत या गोष्टींवर भरघोस बचत; पाहा यादी
4
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर
5
काय आहे विमानाच्या टायरजवळची 'ती' जीवघेणी जागाा, जिथे बसून १३ वर्षांचा मुलगा अफगाणिस्तानातून भारतात आला
6
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
7
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
8
GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'
9
Kuttu Atta: नवरात्री उपवासाचं कुट्टूचं पीठ ठरलं विषारी; १५० हून अधिक लोक आजारी, रुग्णालयाबाहेर रांगा!
10
Navratri 2025: नवरात्रीत मंगळवारी किंवा शुक्रवारी देवीला पारिजाताची फुलं वाहिल्याने होणारे लाभ 
11
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
12
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
13
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
14
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
15
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
16
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
17
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
18
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
19
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
20
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका

जलयुक्त शिवारची दीड हजार कामे अजूनही अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१७ कामे प्रस्तावित करण्यात आली. ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देपावसाळ्यामुळे कामे थांबली । चार वर्षात १५ हजार कामे झाली पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ व्हावी, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरू केली आहेत. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांमध्ये सुमारे १६ हजार २६२ कामे मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ८१७ कामे पूर्ण झाली आहेत. जवळपासा १ हजार ४०० कामे अजूनही शिल्लक आहेत.गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. एका पाण्याने धान करपते, अशी स्थिती आहे. जंगल असल्याने मोठे सिंचन प्रकल्प बांधणे शक्य नाही. त्यामुळे सिंचनाची व्यक्तीगत साधने बांधून देण्यावर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भर देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात प्राधान्याने कामे मंजूर करण्यात आली.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१७ कामे प्रस्तावित करण्यात आली. ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर सुमारे ७० कोटी ३० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. २०१६-१७ मध्ये १२२ गावांची निवड झाली. यावर्षी ४ हजार ४२३ कामे मंजूर करण्यात आली. ही सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ७७ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.२०१७-१८ मध्ये १६९ गावांची निवड करण्यात आली. ३ हजार ७०३ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३ हजार ५०७ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ४० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. २०१८-१९ या वर्षात १७२ गावांची निवड झाली. ४ हजार ५१९ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३ हजार २७० कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ मधील प्रस्तावित सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. मात्र २०१७-१८ व २०१८-१९ मधील कामे शिल्लक आहेत.जलयुक्त शिवार अभियान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. या अभियानांतर्गत सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री स्वत: या योजनेचा नियमितपणे आढावा घेत असल्याने या योजनेला निधीची कमतरता भासत नाही. तसेच प्रशासकीय मान्यता व इतरही कामे वेळेवर पार पडतात. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गतची कामे इतर योजनांच्या तुलनेत गतीने होत असल्याचे दिसून येते.अभियान बोड्यांसाठी ठरले वरदानधानापिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मामा तलाव व बोड्या बांधल्या आहेत. कालपरत्वे या बोड्यांची दुरूस्ती करणे आवश्यक होते. अनेक बोड्यांमध्ये गाळ साचल्याने बोड्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. बोड्या व मामा तलावांच्या पाळी फुटल्याने पाणी राहत नव्हते. त्यामुळे अडचणीच्या वेळी सिंचन न झाल्याने धानपीक करपत होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मामा तलाव व बोड्यांच्या नूतनीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे अनेक तलाव व बोड्या दुरूस्त झाल्या आहेत. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. शेततळे मात्र निकामी ठरत असल्याचे दिसून येते. ज्या वेळेवर पाऊस राहते, त्याचवेळी शेततळ्यांमध्ये पाणी राहते. पाऊस गेल्यास शेततळे कोरडे पडत असल्याचे चित्र दिसून येते. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार