शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

जलयुक्त शिवारची दीड हजार कामे अजूनही अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2019 06:00 IST

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१७ कामे प्रस्तावित करण्यात आली. ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत.

ठळक मुद्देपावसाळ्यामुळे कामे थांबली । चार वर्षात १५ हजार कामे झाली पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिंचनाची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच भूजल पातळीत वाढ व्हावी, यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरू केली आहेत. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१५-१६ ते २०१८-१९ या चार वर्षांमध्ये सुमारे १६ हजार २६२ कामे मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १४ हजार ८१७ कामे पूर्ण झाली आहेत. जवळपासा १ हजार ४०० कामे अजूनही शिल्लक आहेत.गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र सिंचनाच्या सुविधा उपलब्ध नाहीत. एका पाण्याने धान करपते, अशी स्थिती आहे. जंगल असल्याने मोठे सिंचन प्रकल्प बांधणे शक्य नाही. त्यामुळे सिंचनाची व्यक्तीगत साधने बांधून देण्यावर जलयुक्त शिवार अभियानांतर्गत भर देण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात प्राधान्याने कामे मंजूर करण्यात आली.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वाधिक शेततळ्यांचे बांधकाम करण्यात आले. त्यानंतर सिंचन विहिरी, बोडी, तलावांची दुरूस्ती, त्यांच्यामधील गाळ उपसणे आदी कामे करण्यात आली. २०१५-१६ या वर्षात १५२ गावांची निवड करण्यात आली. यावर्षी विविध यंत्रणांमार्फत ३ हजार ६१७ कामे प्रस्तावित करण्यात आली. ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर सुमारे ७० कोटी ३० लाख रुपयांचा खर्च झाला आहे. २०१६-१७ मध्ये १२२ गावांची निवड झाली. यावर्षी ४ हजार ४२३ कामे मंजूर करण्यात आली. ही सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ७७ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.२०१७-१८ मध्ये १६९ गावांची निवड करण्यात आली. ३ हजार ७०३ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३ हजार ५०७ कामे पूर्ण झाली आहेत. या कामांवर ४० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. २०१८-१९ या वर्षात १७२ गावांची निवड झाली. ४ हजार ५१९ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ३ हजार २७० कामे पूर्ण झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ मधील प्रस्तावित सर्वच कामे पूर्ण झाली आहेत. मात्र २०१७-१८ व २०१८-१९ मधील कामे शिल्लक आहेत.जलयुक्त शिवार अभियान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना आहे. या अभियानांतर्गत सिंचनाची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री स्वत: या योजनेचा नियमितपणे आढावा घेत असल्याने या योजनेला निधीची कमतरता भासत नाही. तसेच प्रशासकीय मान्यता व इतरही कामे वेळेवर पार पडतात. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियान अंतर्गतची कामे इतर योजनांच्या तुलनेत गतीने होत असल्याचे दिसून येते.अभियान बोड्यांसाठी ठरले वरदानधानापिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मामा तलाव व बोड्या बांधल्या आहेत. कालपरत्वे या बोड्यांची दुरूस्ती करणे आवश्यक होते. अनेक बोड्यांमध्ये गाळ साचल्याने बोड्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. बोड्या व मामा तलावांच्या पाळी फुटल्याने पाणी राहत नव्हते. त्यामुळे अडचणीच्या वेळी सिंचन न झाल्याने धानपीक करपत होते. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मामा तलाव व बोड्यांच्या नूतनीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यामुळे अनेक तलाव व बोड्या दुरूस्त झाल्या आहेत. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्याने उत्पादन वाढण्यास मदत झाली आहे. शेततळे मात्र निकामी ठरत असल्याचे दिसून येते. ज्या वेळेवर पाऊस राहते, त्याचवेळी शेततळ्यांमध्ये पाणी राहते. पाऊस गेल्यास शेततळे कोरडे पडत असल्याचे चित्र दिसून येते. 

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवार