शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या चुका शिक्षकांच्या मुळावर

By admin | Updated: May 14, 2017 01:52 IST

समायोजन व पदोन्नतीच्या याद्या तयार करताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : समायोजन व पदोन्नतीच्या याद्या तयार करताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील कर्मचारी व अधिकारी विशेष काळजी घेत नसल्याने सदोष याद्या तयार केल्या जात आहेत व या याद्यांना उच्च न्यायालयात आव्हान देऊन न्यायालयाच्या स्थगितीनंतर बदल्यांची प्रक्रिया थांबविली जात आहे. शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे बदल्या रखडत असल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांच्या कार्यकाळात सन २०१४ मध्ये बोगस शिक्षक बदली प्रकरण घडले होते. या प्रक्रियेला न्यायालयात आव्हान दिल्यानंतर बदली प्रक्रिया थांबली होती. २०१५ मध्ये न्यायालयाच्या निर्देशानंतर बदल्या करण्यात आल्या. २०१६ मध्ये पेसा गावांची अंतिम यादी तयार झाली नव्हती. त्यामुळे मागील वर्षीसुद्धा बदल्या झाल्या नाही. फेब्रुवारी महिन्यात विषय शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली. तर शिक्षक व केंद्रप्रमुख यांचे समायोजन करण्यात आले. मात्र विषय शिक्षकांच्या पदोन्नतीची यादी योग्य पद्धतीने बनविण्यात आली नाही. त्यामुळे याही शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. परिणामी न्यायालयाने समायोजनाला स्थगिती दिली आहे. २०१७ मध्ये बदल्या होतील, अशी अपेक्षा शिक्षक वर्ग बाळगून होता. मात्र समायोजनच रखडल्याने यावर्षीसुद्धा बदल्या होणार नाही, असे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी दरवर्षी चुकीच्या पद्धतीने समायोजन व पदोन्नतीच्या याद्या तयार करीत आहेत. याचा फटका शिक्षकांना बसत चालला आहे. बदल्या रद्द होत असल्याने दुर्गम भागात कार्यरत असलेले शिक्षक कासावीस झाले आहेत. त्यांनी ९ मे पासून जिल्हा परिषदेसमोर उपोषणही सुरू केले आहे. या शिक्षकांनी विज्ञान पदवीधारक झालेल्या शिक्षकांच्या पदवीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी विज्ञान पदवीधारकांच्या पदवीची चौकशी करण्याचे आश्वासन दुर्गम भागातील अन्यायग्रस्त शिक्षक संघटनेला दिले होते. यावर विज्ञान पदवीधारक शिक्षकांनी केवळ विज्ञान पदवीधारकांची चौकशी न करता सर्व प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्याही शैक्षणिक अर्हतेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावरून शिक्षकांमध्येच बदल्यांवरून वादविवाद व मतभेद असल्याचे दिसून येत आहे. बदल्यांची प्रक्रिया दरवर्षी रखडत असल्याने दुर्गम व नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेले शिक्षक मागील अनेक वर्षांपासून त्याच भागात खितपत पडले आहेत. हा त्यांच्यावरील एकप्रकारचा अन्याय आहे. दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये तीव्र संतापाची लाट शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधात निर्माण झाली आहे. दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.