शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एकता नसल्याने ओबीसी प्रत्येक क्षेत्रात पिछाडीवर

By admin | Updated: April 24, 2017 01:09 IST

गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून अनेक जातीत विखुरला आहे.

ओबीसी युवा महोत्सव : योगीता भांडेकर यांचे प्रतिपादनगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी समाज मोठ्या संख्येने असून अनेक जातीत विखुरला आहे. ओबीसींमध्ये एकतेची भावना नसल्याने ओबीसी प्रत्येक क्षेत्रात मागे पडत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले.ओबीसी युवा महोत्सवाचे उद्घाटन गोकुलनगर येथील शिवाजी हायस्कूलच्या सभागृहात रविवारी करण्यात झाले. यावेळी उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक प्रा. शेषराव येलेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील मुनघाटे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दादाजी चापले, युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष रूचित वांढरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना योगीता भांडेकर म्हणाल्या, देशात ५२ टक्के ओबीसी असताना ओबीसीमध्ये एकतेची भावना नाही. त्यामुळे संघटन कमी पडत आहे. एकाच शाळेत एकाच बेंचवर बसणाऱ्या एससी, एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गणवेश दिल्या जाते. मात्र ओबीसी विद्यार्थ्यांना या साहित्यापासून वंचित केले जाते. त्यामुळे खऱ्या अर्थाने येथूनच जातीभेदाची सुरूवात होते. जि.प. अध्यक्ष या नात्याने आपण जिल्ह्यातील ओबीसींच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके व गणवेश शासनाकडून मिळण्याकरिता आपण प्रयत्न करणार, असे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार डॉ. देवराव होळी म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या प्रश्नांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना राज्यात झाल्यामुळे ओबीसींच्या विविध समस्या मार्गी लागणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्या गावांमध्ये ओबीसींची संख्या जास्त आहे. मात्र चुकीच्या सर्वेक्षणाने संबंधित गाव पेसा क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तेथील ओबीसींवर अन्याय झाला आहे. या संदर्भात आमसभा व ग्रामसभांचे प्रस्ताव आमच्याकडे पोहोचले आहेत. सदर प्रस्तावाला घेऊन शासन दरबारी अशा गावांना पेसा क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रयत्न करणार असे डॉ. होळी यांनी सांगितले. प्रा. शेषराव येलेकर म्हणाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या रेट्यामुळेच राज्यात ओबीसी मंत्रालय स्थापन झाले.मात्र या मंत्रालयाला लोकसंख्येच्या प्रमाणात पर्याप्त निधी उपलब्ध न झाल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर पुन्हा मोठे आंदोलन करावे लागेल, असेही प्रा. येलेकर यांनी सांगितले. याप्रसंगी अरूण मुनघाटे, दादाजी चापले यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक बांदूरकर, संचालन अक्षय ठाकरे यांनी केले तर आभार नयन कुनघाडकर यांनी मानले. कार्यक्रमाला नगरसेवक रमेश भुरसे, श्याम वाढई, प्राचार्य सुरेश डोंगे, पांडुरंग घोटेकर, दादाजी चुधरी, पी. पी. म्हस्के, त्र्यंबक करोडकर, राजेंद्र उरकुडे, पी. टी. देशमुख, प्राचार्य मने, देव्हारे, हरीभाऊ बुरडकर, मत्ते, तुषार वैरागडे, राहूल भांडेकर, अतुल वाढई, शुभम बांगरे, चेतन शेंडे, शिवानी मोहुर्ले आदी उपस्थित होते. उद्घाटनानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळच्या सुमारास कबड्डी स्पर्धा घेण्यात आली. २४ एप्रिल रोजी सोमवारला या ठिकाणी बुध्दीबळ स्पर्धा घेतली जाणार असून सायंकाळी समुह नृत्य स्पर्धा होईल.