शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी व आदिवासींना सरकारने बनवले लढाईतील कोंबडे- पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:36 IST

गडकरी आणि फडणविसांनी सत्तेत येण्याआधी पेसा कायदा रद्द करू असे सांगून ओबीसी समाजाला चुचकारले, पण पेसा कायद्यात कोणतीही सुधारणा केली नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही. सरकार ओबीसी आणि आदिवासींना लढाईतील कोंबडे बनवून एकमेकांविरूद्ध लढवत आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचा मेळावा : संविधान संपवण्याचा डाव हाणून पाडण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडकरी आणि फडणविसांनी सत्तेत येण्याआधी पेसा कायदा रद्द करू असे सांगून ओबीसी समाजाला चुचकारले, पण पेसा कायद्यात कोणतीही सुधारणा केली नाही. ओबीसी समाजाला न्याय मिळाला नाही. सरकार ओबीसी आणि आदिवासींना लढाईतील कोंबडे बनवून एकमेकांविरूद्ध लढवत आहे. पण ही वेळ भांडायची नाही. शोषित, पीडित समाजातील माणूस मुख्य प्रवाहात आला पाहीजे हे संविधानाचे मूळ असताना सरकारला ते नको आहे, असे सांगत संविधान संपवण्याचा या सरकारचा डाव हाणून पाडा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शेतकरी-शेतमजूर सेलचे अध्यक्ष, माजी खा.नाना पटोले यांनी केले.जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पटोले बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष तथा माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी होते. यावेळी मंचावर प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी सुरेश भोयर, प्रदेश सचिव रविंद्र दरेकर, माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आ.आनंदराव गेडाम, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, जि.प.सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश ईटनकर, डॉ.नामदेव किरसान, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, युवक काँग्रेसचे पंकज गुड्डेवार, डॉ.नितीन कोडवते, पेंटाराम तलांडी आदींसह अनेक पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.यावेळी नाना पटोले म्हणाले, भाजप सरकार आल्यापासून राज्यात सतत दुष्काळ पडत आहे. हे सरकार अपशकुनी आहे. शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देत नाही पण सामान्य लोकांच्या खिशातून वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून वसुली केली जाते. गोरगरीबांची मुले शिकू नये म्हणून विविध अभ्यासक्रमांची भरमसाठ फी वाढ केली आहे. बहुजन नेत्यांना संपवण्याचे काम ब्राह्मणवादी विचारसरणी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी डॉ.उसेंडी यांनी भाजपवर टिका करताना स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे काय योगदान होते, ते तर आयत्या बिळात नागोबा झाले असे सांगितले. काँग्रेससोबत भाजपेतर पक्षांनी मिळून लढावे. सोबतच काँग्रेसच्या लोकांनी थोडे जमिनीवर येऊन काम करण्याची गरज आहे, असा चिमटाही त्यांनी काढला. यावेळी इतरही नेत्यांची भाषणे झाली.कार्यक्रमाचे संचालन विनोद खोबे आणि प्रा.दौलत धुर्वे यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेवक सतीश विधाते यांनी केले. मेळाव्याला किशोर वनमाळी, मनोहर पाटील पोरेटी, जयंत हरडे, संजय चरडुके, रवी शहा, मनिषा डोनारकर, राजू जिवानी, हरिश मोटवानी, संजय पंदीलवार, प्रभाकर तुलावी, प्रल्हाद खराटे, महेंद्र ब्राह्मणवाडे, अधिर इंगोले, वैभव कडस्कर, अमोल भडांगे, जीवन नाट, रहीम शेख, नेताजी गावतुरे, पी.टी.मसराम, पांडुरंग घोटेकर, सी.बी.आवळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.सुरजागड तारक तर मेडीगड्डा मारकयावेळी नाना पटोले यांनी जिल्ह्यातील लोहखनिजाची विपुलता पाहता सुरजागडच्या खाणींमध्ये जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलण्याची ताकद आहे. लोहखनिजाची वाहतूक इतर जिल्ह्यात न करता जिल्ह्यातच प्रक्रिया प्रकल्प तातडीने उभारावा अशी मागणी त्यांनी केली. मात्र तेलंगणा सरकारकडून उभारल्या जात असलेला मेडीगड्डा प्रकल्प जिल्हावासियांसाठी मारक असल्याने त्याला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले. या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हाणी होत आहे. जंगलाची कटाई झाली, लोक विस्थापित झाले, पण पाण्याचा उपयोग या जिल्हावासियांना होणार नाही, याचा जाब नागरिकांनी विचारावा असे आवाहन त्यांनी केले.ज्येष्ठांचा सत्कार आणि जीआरची होळीयावेळी कार्यक्रमाला विशेष निमंत्रित असलेल्या जिल्ह्यातील वयोवृद्ध काँग्रेस नेत्यांचा नाना पटोले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यासाठी मंचावरील सर्व पदाधिकारी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या त्या ज्येष्ठ नेत्यांजवळ गेले. या कार्यक्रमानंतर ओबीसींवर अन्याय करणाऱ्या शासनाच्या जीआरची होळी करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले.विविध संघटनांच्या वतीने सत्कारअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शेतकरी-शेतमजूर सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच गडचिरोलीत आल्याबद्दल नाना पटोले यांचा जिल्हा काँग्रेस कमिटी, जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तसेच विविध संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला.